शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

सोशल मीडियावर अवमानकारक संदेश

By admin | Updated: May 24, 2014 23:30 IST

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका विशिष्ट समुदायाबाबत अवमानकारक मजकूर पाठविला जात होता. याबाबतची तक्रार पोलिसात देताच पोलिसांनी तिघांना अटक केली.

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका विशिष्ट समुदायाबाबत अवमानकारक मजकूर पाठविला जात होता. याबाबतची तक्रार पोलिसात देताच पोलिसांनी तिघांना अटक केली. या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. सध्या तिघेही तुरुंगाची हवा खात आहेत.

सध्या शहरापासून तर, ग्रामीण भागातही व्हॉट्सअँपवरून संदेश पाठविण्याचा प्रकार वाढला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांसह युवक मोठय़ा प्रमाणात व्हॉट्सअँपचा वापर करीत आहेत. व्हॉट्सअँपचा वापर चांगला केल्यास तो फायदेशीर आहे. मात्र त्याचा दुरुपयोग केल्यास तुरुंगाची हवाही खावी लागते. असाच प्रकार चंद्रपुरात घडला आहे.

अवमानकारक मजकूर पाठविण्यात आला. याची तक्रार पोलिसात मोहसीन शेख रफीक शेख यांनी दिली. या प्रकरणात प्रफुल सुनील गिर्‍हे (२१), विनोद आबाजी सोनटक्के आणि शक्ती हरपालसिंग ठाकूर (३१) यांना पोलिसांनी अटक केली. ही घटना गुरुवारी रात्री घडली. यापूर्वीही असे प्रकार जिल्ह्यात घडले आहेत.

सोशल मीडियावरुन विशिष्ट समुदायाबाबत धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश पाठविले जात आहेत. सोशल मीडियाचा गैरवापर होताना दिसत आहे. अशा कृत्यांमुळे अनेकदा वाद निर्माण होताना दिसते. यात संदेशवहनामध्ये १६ मे नंतर अचानक वाढ झाली आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपींविरुद्ध कलम २९५ (अ) आयपीसी तथा आयटी कलम ६६ (अ) या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील एका आरोपीने दोन्ही आरोपींना या मजकुराचा संदेश पाठविला. त्यानंतर या दोन्ही आरोपींनी स्वत:च्या ग्रुपमध्ये हा संदेश टाकला. या संदेशामध्ये एका विशिष्ट समुदायाबाबत अत्यंत अवमानकारक भाषेचा वापर करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये यावर्षी मोठय़ा प्रमाणात सोशल मिडीयाचा वापर केला गेला. व्हॉट्सअँपवरून अनेकांनी आपला मित्रपरिवार जोडला आहे. मात्र त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्याने अनेकांना पोलीसहवाही खावी लागत आहे. (नगर प्रतिनिधी)