शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

शेतकरी सन्मान योजनेतून कर्जाची रक्कम केली कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:35 IST

सिंदेवाही : शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे, यासाठी केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना वर्षभरात तीन टप्प्यात सहा हजार रुपये शेतकरी सन्मान अनुदान योजनेतून ...

सिंदेवाही : शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे, यासाठी केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना वर्षभरात तीन टप्प्यात सहा हजार रुपये शेतकरी सन्मान अनुदान योजनेतून दिले जात आहेत. पण हा सन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याऐवजी तो कर्ज खात्यात जमा करून कर्ज कपात केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हाच काय आमचा सन्मान असा प्रश्न पडला आहे.

अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांना मदत व्हावी, या हेतूने केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेद्वारे वर्षभरात तीन टप्प्यात दोन हजार प्रति टप्प्यानुसार सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देणे सुरू केले. केवळ शेतीवर जास्त उदरनिर्वाह आहे तेच शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. नेहमीच आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना ही मदत कमी असली तरी उपयोगी ठरत आहे. यातून शेतकरी पिकांना वेळेवर खते देऊन उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करतो. पण सन्मान निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात, त्या शेतकऱ्यावर बँकेचे कर्ज आहे त्याच्याकडून बँक प्रशासन कर्ज कपात करते. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. याचा विचार शासन व बँकांनी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.