शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

शेतकरी सन्मान योजनेतून कर्जाची रक्कम केली कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:35 IST

सिंदेवाही : शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे, यासाठी केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना वर्षभरात तीन टप्प्यात सहा हजार रुपये शेतकरी सन्मान अनुदान योजनेतून ...

सिंदेवाही : शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे, यासाठी केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना वर्षभरात तीन टप्प्यात सहा हजार रुपये शेतकरी सन्मान अनुदान योजनेतून दिले जात आहेत. पण हा सन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याऐवजी तो कर्ज खात्यात जमा करून कर्ज कपात केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हाच काय आमचा सन्मान असा प्रश्न पडला आहे.

अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांना मदत व्हावी, या हेतूने केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेद्वारे वर्षभरात तीन टप्प्यात दोन हजार प्रति टप्प्यानुसार सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देणे सुरू केले. केवळ शेतीवर जास्त उदरनिर्वाह आहे तेच शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. नेहमीच आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना ही मदत कमी असली तरी उपयोगी ठरत आहे. यातून शेतकरी पिकांना वेळेवर खते देऊन उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करतो. पण सन्मान निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात, त्या शेतकऱ्यावर बँकेचे कर्ज आहे त्याच्याकडून बँक प्रशासन कर्ज कपात करते. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. याचा विचार शासन व बँकांनी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.