शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

मामा तलावातील जलसाठ्यात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:21 IST

अनुदान न मिळाल्याने शेतकरी हैराण भद्रावती : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी विहिरीचे बांधकाम पूर्ण केले आहे. शासनाने विहिरीसाठी अनुदान जाहीर ...

अनुदान न मिळाल्याने शेतकरी हैराण

भद्रावती : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी विहिरीचे बांधकाम पूर्ण केले आहे. शासनाने विहिरीसाठी अनुदान जाहीर केले होते. शेतकऱ्यांनी विहिर बांधल्याची कागदपत्रे प्रशासनाकडे सादर करूनही अनुदान मिळाले नाही. शेतकऱ्यांनी उधारीवर बांधकामाचे साहित्य विकत घेतले. पं. स. कडे वारंवार पाठपुरावा करूनही अनुदान मिळाले नाही. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्वच्छता कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित

वरोरा : नगर परिषदअंतर्गत कार्यरत असलेल्या स्वच्छता कामगारांची शैक्षणिक पात्रता असूनही त्यांना पदोन्नती देण्यात आली नाही. अर्हताधारक सफाई कामगारांची पदोन्नती करावी, अशी मागणी महाराष्ट्र सफाई कामगार संघटनेने केली आहे.

कचरा पेट्यांची स्वच्छता करावी

चिमूर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. चौकातील कचरा पेट्याही तुंबल्या आहेत. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन नगरपंचायतने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कृषिपंपाच्या बिलात दुरुस्ती करावी

गोंडपिपरी : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना चुकीचे वीज बिल देण्यात आले. काही शेतकऱ्यांच्या कृषिपंप वीज जोडणीची प्रक्रियाही प्रलंबित आहे. यासंदर्भात संबंधित विभागाकडे निवेदन देण्यात आले होते. याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील कृषिपंपधारक शेतकऱ्यांनी केली आहे.

दुर्गापूर मार्गावरील अतिक्रमण हटवा

चंद्रपूर : येथील निर्माणनगर, तुकूम प्रभाग क्र. १ येथे दुर्गापूर रोडपासून निर्माण नगर रोड, यशोगंगा लॉनपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुने अतिक्रमण वाढले आहे. दुर्गापूर रोडपासून ते निर्माणनगरचा रोड हा ६० फुटाचा आहे. परंतु दोन्ही बाजूच्या रहिवाशांनी यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तो मार्ग अरुंद झाला आहे. पाण्याची पाईपलाईन व नालीकरिता जागा शिल्लक नाही. त्यामुळे या मार्गावरुन वाहनचालकांना वाहन चालविताना अडचण येत आहेत.

बोटेझरी, कोळसा येथे मूलभूत सुविधांचा अभाव

चंद्रपूर : शासनाने बोटेझरी व कोळसा या गावांचे २००७ ला भगवानपूर येथे पुनर्वसन केले. मात्र, अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींही येथील समस्या जिल्हा प्रशासनाकडे प्रभावीपणे मांडत नाही. परिणामी, समस्या जैसे-थे आहेत, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेवर अनिष्ट परिणाम

चिमूर : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मूलभूत आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना खासगी डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली आहे़ बहुतांश जनता शेतीवर अवलंबून आहे़ यंदा अल्प उत्पन्न झाल्याने शेतकरी हैराण झाला़ कुटुंबाच्या गरजा भागविताना ओढाताण होत आहे़ त्यामुळे आरोग्यासाठी खासगी रुग्णालयात जाणे शक्यच नाही़ त्यामुळे रिक्त पदे भरण्याची मागणी नागरिक करीत आहेत.