शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By admin | Updated: December 3, 2014 22:48 IST

कापसाला किमान सात हजार रुपये तर धानाला ३५०० रुपये भाव द्यावा व चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा व कापसाला बोनस द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर : कापसाला किमान सात हजार रुपये तर धानाला ३५०० रुपये भाव द्यावा व चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा व कापसाला बोनस द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावर्षी जिल्ह्यात तब्बल दीड महिना उशीरा पाऊस आल्यामुळे सोयाबीन व धानाच्या पऱ्हयांची उशीरा लागवड झाली तर कपाशीची लागवडसुद्धा उशीराच झाली. त्यात सोयाबीनचे पीक तर गेलेच. सोबतच पर्याप्त पाऊस न पडल्यामुळे धानाच्या व कापसाच्या उत्पन्नामध्ये बरीच घट झाली असून शेतकऱ्यांना उत्पन्न फारच कमी प्रमाणात होत आहे. त्यातच शेतमालाला भााव नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. भाजपा सरकारकडून सत्तेत आल्यास शेतकऱ्याच्या शेतीत उत्पन्नाच्या खर्चावर आधारित आणखी पन्नास टक्के वाढवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र भाव वाढवून देणे दुरच पण असलेल्या भावाच्या ३० ते ४० टक्के कमी भाव देण्यात येत आहे.कापसाला हमी भाव फक्त ४०५० रुपये देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसली जात आहे. शासनाने दिलेल्या हमी भावाचा निषेध करत कापसाला प्रति क्विंटल १५०० ते २००० हजार रुपये बोनस देण्यात यावा व ती रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेने केली आहे. उशिरा आलेल्या पावसामुळे धान व सोयाबीनच्या उत्पादनावर फार मोठा फरक पडला असून शेतकऱ्याला आपली परिस्थिती सुधारता यावी,यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे आवश्यक आहे. वीजशिवाय पाणी नाही तर पाण्याशिवाय शेती नाही. आधीच पावसाने उशीरा हजेरी लावल्यामुळे शेतकरी अर्धाअधिक खचला असून त्याला धीर देण्याकरिता शासनाने प्रभावी उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. शेतकऱ्याकडे असलेल्या कृषी पंपाच्या वीज वापराची थकबाकी वसूल करण्याकरिता महावितरणाच्या वतीने कृषी संजीवनी योजना सुरू केली. मात्र ही योजना आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर पर्यंतच होती. आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये शेतकऱ्याकडे पैसाच उपलब्ध नसतो. आता शेतकऱ्याच्या घरात उत्पन्न येण्याची वेळ असून कृषी संजीवनी योजना पुर्ववत सुरू ठेवावी. याशिवाय जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा व चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष (ग्राहक) डॉ. देव कन्नाके, जिल्हाध्यक्ष (विद्यार्थी) नितीन भटारकर, गजानन पाल, संजय पिंपळकर, प्रदीप रत्नपारखी, पूजा उईके यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)