शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
2
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
3
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
4
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
5
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
6
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
7
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
8
गब्बर सिंगला डायलॉग शिकवल्यावरुन ट्रोल होतायेत महागुरु, नक्की काय म्हणाले होते?; पाहा Video
9
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा काढता पाय घेत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!
10
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
11
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
12
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
13
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
14
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
15
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
17
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
18
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
19
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
20
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!

चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By admin | Updated: December 3, 2014 22:48 IST

कापसाला किमान सात हजार रुपये तर धानाला ३५०० रुपये भाव द्यावा व चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा व कापसाला बोनस द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर : कापसाला किमान सात हजार रुपये तर धानाला ३५०० रुपये भाव द्यावा व चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा व कापसाला बोनस द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावर्षी जिल्ह्यात तब्बल दीड महिना उशीरा पाऊस आल्यामुळे सोयाबीन व धानाच्या पऱ्हयांची उशीरा लागवड झाली तर कपाशीची लागवडसुद्धा उशीराच झाली. त्यात सोयाबीनचे पीक तर गेलेच. सोबतच पर्याप्त पाऊस न पडल्यामुळे धानाच्या व कापसाच्या उत्पन्नामध्ये बरीच घट झाली असून शेतकऱ्यांना उत्पन्न फारच कमी प्रमाणात होत आहे. त्यातच शेतमालाला भााव नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. भाजपा सरकारकडून सत्तेत आल्यास शेतकऱ्याच्या शेतीत उत्पन्नाच्या खर्चावर आधारित आणखी पन्नास टक्के वाढवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र भाव वाढवून देणे दुरच पण असलेल्या भावाच्या ३० ते ४० टक्के कमी भाव देण्यात येत आहे.कापसाला हमी भाव फक्त ४०५० रुपये देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसली जात आहे. शासनाने दिलेल्या हमी भावाचा निषेध करत कापसाला प्रति क्विंटल १५०० ते २००० हजार रुपये बोनस देण्यात यावा व ती रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेने केली आहे. उशिरा आलेल्या पावसामुळे धान व सोयाबीनच्या उत्पादनावर फार मोठा फरक पडला असून शेतकऱ्याला आपली परिस्थिती सुधारता यावी,यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे आवश्यक आहे. वीजशिवाय पाणी नाही तर पाण्याशिवाय शेती नाही. आधीच पावसाने उशीरा हजेरी लावल्यामुळे शेतकरी अर्धाअधिक खचला असून त्याला धीर देण्याकरिता शासनाने प्रभावी उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. शेतकऱ्याकडे असलेल्या कृषी पंपाच्या वीज वापराची थकबाकी वसूल करण्याकरिता महावितरणाच्या वतीने कृषी संजीवनी योजना सुरू केली. मात्र ही योजना आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर पर्यंतच होती. आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये शेतकऱ्याकडे पैसाच उपलब्ध नसतो. आता शेतकऱ्याच्या घरात उत्पन्न येण्याची वेळ असून कृषी संजीवनी योजना पुर्ववत सुरू ठेवावी. याशिवाय जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा व चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष (ग्राहक) डॉ. देव कन्नाके, जिल्हाध्यक्ष (विद्यार्थी) नितीन भटारकर, गजानन पाल, संजय पिंपळकर, प्रदीप रत्नपारखी, पूजा उईके यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)