शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

मनपातील सत्ताधाऱ्यांच्या तेरवीने होणार आंदोलनाची सांगता

By admin | Updated: March 20, 2016 00:51 IST

करवाढीविरोधात सुरू असलेले साखळी उपोषण रविवारी २० मार्चला महानगर पालिकेतील सत्ताधाऱ्यांची तेरवी करून समाप्त केले जाईल, ...

नरेश पुगलियांची माहिती : समितीच्या अहवालाची प्रतीक्षा करणारचंद्रपूर : करवाढीविरोधात सुरू असलेले साखळी उपोषण रविवारी २० मार्चला महानगर पालिकेतील सत्ताधाऱ्यांची तेरवी करून समाप्त केले जाईल, अशी माहिती शनिवारी माजी खासदार तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी उपोषणस्थळी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.१८ मार्चला महानगर पालिकेया विशेष आमसभेत करवाढ स्थगित करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. सत्ताधारी गटाने यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय घेतला. ही जनविरोधी निती असून त्याचा मी निषेध करतो, असे पुगलिया यावेळी म्हणाले. मनपाने गठित केलेल्या समितीचा जोपर्यंत अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यंत नागरिकांनी मनपाचा कर भरू नये, असे आवाहनही पुगलिया यांनी यावेळी केले. जर समितीचा अहवाल समाधानकारक नसेल तर करवाढ विरोधात आपण न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.वेळ पडल्यास उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयाची दारेही ठोठावू असे, नरेश पुगलिया म्हणाले.भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष वेगळेच काही बोलतात आणि दोन्ही मंत्री वेगवेगळी मते व्यक्त करतात. मनपाने केलेल्या करवाढीच्या विरोधातील लढाई न्यायपालिकेत आणि विधिमंडळात पोहचविली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. या लढ्यात नागरिकांनी सहभागी होण्याची अपेक्षा त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. दरम्यान, शनिवारच्या साखळी उपोषणात चंद्रशेखर पोडे, बाबा मून, कैलास रामटेके, दयानंद राखुंडे, सतीश महाजन, रितेश पंजाबी, सुरेश रोहरा सहभागी झाले होते. रविवारी या आंदोलनाची सांगता होणार आहे. (प्रतिनिधी)