शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ जखमी वाघाचा अखेर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 21:48 IST

भद्रावती तालुक्यातील चारगाव खुल्या कोळसा खाणीलगत असलेल्या शिरणा नदीच्या पुलाखाली जखमी अवस्थेतील वाघाचा वनविभागाच्या डोळ्यादेखत तब्बल १९ तासानंतर दुर्दैवी मृत्यू झाला.

विनायक येसेकर/राजेश रेवते ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती (चंद्रपूर) : तालुक्यातील चारगाव खुल्या कोळसा खाणीलगत असलेल्या शिरणा नदीच्या पुलाखाली जखमी अवस्थेतील वाघाचा वनविभागाच्या डोळ्यादेखत तब्बल १९ तासानंतर दुर्दैवी मृत्यू झाला.सदर वाघाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो पुलाखाली नदीच्या पात्रात पडला. डोक्याला गंभीर दुखापत होऊन मेंदूतून रक्तस्राव वाढला. अशातच वाघाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. जखमी वाघाला बाहेर काढण्यात वनविभाग कमी पडल्याने वाघावर उपचार होऊ शकले नाही. या बाबीला वनविभागाने पद्धतशीर फाटा देत बचावात्मक पवित्रा घेतल्याचे दिसून येते. सदर वाघ हा नर असून पाच वर्षांचा होता.तालुक्यातील तेलवासा, कुन्हाळा, चारगाव, ढोरवासा या जुन्या कोळसा खाणीच्या परिसरात या वाघाने आपले वास्तव्य निर्माण केले होते. बुधवारी हा वाघ शिरणा नदीच्या पात्रात एका दगडाखाली असल्याचे तेथील काही नागरिकांना दिसला. या वाघाला मंगळवारी रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो नदीपात्रात पडला. त्याच्या मेंदूला जबर मार असल्याने तो तिथून इतरत्र जाऊ शकला नाही. माहिती होताच घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसेकर आपल्या ताफ्यासह दाखल झाल्या. बुधवारी सकाळी ८ वाजतापासून त्या वाघाला जिवंत बाहेर काढण्यासाठी वनविभाग तसेच इको प्रो संघटनेचे शर्थीचे प्रयत्न चालू होते. नदीपात्रातील ज्या दगडाखाली वाघ होता त्या परिसरात जाणे कठीण असल्याने वेकोलिच्या माध्यमातून त्या परिसरात रस्ता तयार करून क्रेन उतरविण्यात आली व त्याच्या सहाय्याने पिंजरा त्या वाघाच्या समोर ठेवण्यात आला. मात्र वाघ सदर पिंजऱ्यात आला नाही. तो पाण्यातच बराच वेळ फिरत होता. वन कर्मचाऱ्यांनी त्याच्याजवळ फटाके फोडून हुसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु जबर जखमी असल्याने तो पाण्यातून बाहेर निघू शकला नाही. रेस्क्यूदरम्यान घटनास्थळी डीएफओ सोनकुसरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. वाघ जखमी व नदीपात्रात असल्याने वनाधिकाऱ्यांना वाघाला रेस्क्यू करता आले नाही. दरम्यान, रात्री १ वाजताच्या सुमारास वाघाचा मृत्यू झाला. त्यानंतर इको-प्रो संघटनेच्या सदस्यांमार्फत वाघाचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण खोब्रागडे, डॉ. शेडमाके, डॉ. जांभुळे यांनी वाघाचे शवविच्छेदन केले. अज्ञात वाहनाच्या धडकेने वाघाच्या डोक्याला जबर दुखापत झाली. मेंदूला मार लागून रक्तस्राव सुरू झाला. रक्तस्राव वाढल्याने वाघाचा मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.वनविभागाच्या नियोजनाअभावी वाघाचा मृत्यूगेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुली बिटात तलावाच्या बाजूला ‘येडा अण्णा’ नावाचा वाघ उपचाराअभावी तडफडून मरण पावला. वाघाचा मृत्यू झाल्यानंतर त्यावर उपचार करण्याची अनुमती आली होती; तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या घटनेची पुनरावृत्ती शिरणा नदीत जखमी अवस्थेत असलेल्या वाघाच्या घटनेवरून झाली आहे. हा वाघही वनविभाग येईल आणि आपल्यावर उपचार करेल, याची वाट पाहात होता. मात्र वनविभाग आला खरा मात्र तो केवळ वाघाच्या जखमा हेरू शकला नाही. उपचार तर दूरच राहिला. जेरबंद करण्यासाठी पिंजरा सोडला. मात्र नियोजनाच्या अभावामुळे वाघ त्या पिंजवनविभागाच्या नियोजनाअभावी वाघाचा मृत्यूत जाऊ शकला नाही. वनविभाग आपल्या प्रयत्नात मश्गुल असतानाच वाघाने अखेर जगाचा निरोप घेतला.सदर वाघाला अज्ञात वाहनाने समोरून धडक दिली. यात त्याच्या मेंदूला दुखापत झाली. मेंदूतून रक्तस्राव वाढल्याने पोटातही रक्तस्राव सुरू झाला. त्यामुळे वाघाचा मृत्यू झाला. स्वाती म्हैसेकर,वनपरिक्षेत्र अधिकारी, भद्रावती.चारगाव येथील शिरणा नदीच्या पात्रात पडलेला वाघ ७ नोव्हेंबर रोजी मृत झाल्याचे दिसून आले. प्राथमिक अंदाजानुसार वाघाचा मृत्यू अंतर्गत रक्तस्रावामुळे व पाण्यात बुडाल्याने झालेला असून वाघाचे शवविच्छेदन करून दहन करण्यात आले. ए.एल. सोनकुसरे, विभागीय वन अधिकारी, चंद्रपूररेस्क्यूदरम्यान मीदेखील घटनास्थळी होतो. वाघ ज्या ठिकाणी होता, तिथे त्याला ट्रॅक्यूलाईझ करणे अवघड होते. बेशुद्ध झाल्यानंतर त्याचा पाण्यात बुडून मृत्यू निश्चित होता. वाघ आक्रमक आणि खवळलेला असल्याने त्याला जाळ्यात पकडणेदेखील शक्य नव्हते. यात एखाद्याचा बळी जाण्याची शक्यता होती. त्यामुळे वनाधिकाऱ्यांसमोर त्याला पिंजऱ्यात पकडण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रकाश कामडेअध्यक्ष, सार्ड संस्था, चंद्रपूर.वाघ जखमी होता आणि ज्या ठिकाणी होता, तिथून त्याला पिंजऱ्यात पकडणे हाच एकमेव मार्ग होता. त्याच मार्गाने वाघाला रेस्क्यू करण्यात येत होते. मात्र याला वाघाने प्रतिसाद दिला नाही. वाघाला जाळ्यात पकडणे शक्य नव्हते. ट्रॅक्यूलाईझ केल्यानंतर वाघ १५ मिनिटानंतर बेशुद्ध होतो. तो पाण्याजवळ असल्याने त्याला ट्रॅक्यूलाईझ करणेही शक्य नव्हते.बंडू धोतरे,मानद वन्यजीव रक्षक तथा अध्यक्षइको प्रो, चंद्रपूर.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यू