शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

डॉक्टर व पोलीस कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाने मुलाचा मृत्यू

By admin | Updated: April 24, 2017 01:05 IST

घुग्घुस येथील अल्पवयीन मुलीच्या सामूहिक अत्याचार व हत्या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा चंद्रपूरच्या बालसुधारगृहात सहा दिवसानंतर मृत्यू झाला होता.

आरोपीच्या वडिलांचा आरोप : बालसुधारगृहातील मुलाचे मृत्यू प्रकरणचंद्रपूर : घुग्घुस येथील अल्पवयीन मुलीच्या सामूहिक अत्याचार व हत्या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा चंद्रपूरच्या बालसुधारगृहात सहा दिवसानंतर मृत्यू झाला होता. याप्रकरणात मृत्यूला बालसुधारगृहातील अधिकारी व घुग्घुस पोलिसांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा खळबळजनक आरोप मुलांच्या वडिलाने चंद्रपूर येथे शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत केला. या आरोपामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.घुग्घुसच्या अमराई वॉर्डातील एका अल्पवयीन मुलीवर त्याच परिसरातील अल्पवयीन आरोपीसह अन्य दोघांनी सामूहिक अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली होती. या प्रकरणात अल्पवयीन मुलासह प्रताप रमेश सिंग, आकाश राहुुल देवगडे याना अटक करण्यात आली होती. मात्र, यातील अल्पवयीन आरोपी याने अटकेपूर्वीच दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याला स्थानिक खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच पोलिसांनी त्याला चौकशीच्या नावाखाली ताब्यात घेतले. स्थानिक डॉक्टरांनी त्याच्यावर उपचाराची गरज असून, त्याला जिल्हा रुग्णालयात भरती करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. परंतु पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. तो अस्वस्थ असतानाही त्याला स्वत:च्या ताब्यात ठेवले. दोन दिवसानंतर त्याची बालसुधारगृहात रवानगी केली. यावेळी बालसुधारगृहातील अधिकाऱ्यांना त्याने प्रकृती ठिक नसल्याची माहिती दिली. १० एप्रिल रोजी त्यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून मुलाची प्रकृती ठिक नसल्याचे सांगितले. यानंतर तात्काळ आम्ही भेटण्यासाठी गेलो. परंतु रुग्णालयात जातात बालसुधारगृहातील अधिकाऱ्यांनी मृत्यूची बातमी दिली, असा आरोप पालकांनी केला आहे. पोलीस आणि बालसुधारगृहातील अधिकारी यांच्याा निष्काळजीपणाने मुलाचा मृत्यू झाला असे, पालकांनी यावेळी सांगितले. यावेळी आरोपीच्या पालकांसह मामा इश्वर बेले, धम्मदीप पळवेकर, योगेश ठाकरे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)