शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

अंत्ययात्रेलाही जाण्यासाठी भोगाव्या लागतात मरणयातना

By admin | Updated: December 21, 2014 22:56 IST

राजुरा तालुक्यातील विरूर (स्टे.) येथील स्मशानभूमी समस्यांच्या विळख्यात असून आठ वर्षांपासून त्या स्मशानभूमीत एकही अंतिम संस्कार झाला नाही. आठ वर्षापूर्वी बांधण्यात

विरुर स्टेशन : राजुरा तालुक्यातील विरूर (स्टे.) येथील स्मशानभूमी समस्यांच्या विळख्यात असून आठ वर्षांपासून त्या स्मशानभूमीत एकही अंतिम संस्कार झाला नाही. आठ वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या त्या स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली असून शासनाचा लाखोचा निधी व्यर्थ गेला आहे. सदर स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांना अंतिम संस्कार करण्यासाठी दोन किमी अंतरावर असलेल्या नदीवर जावे लागते. त्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना व मृताच्या आप्तेष्टांनाही मरणयातना भोगाव्या लागत आहे. शासनाने गाव तेथे स्मशानभूमी या उद्देशाने बहुतांश गावात स्मशानभूमीचे बांधकाम केले. परंतु स्मशानभूमीचे बांधकाम करताना भौगोलक परिस्थिती किंवा जागेची निवड करताना कोणतेच निकष पाळल्या गेले नाही. मिळेल त्या ठिकाणी स्मशानभूमीचे बांधकाम केल्यामुळे अनेक ठिकाणच्या स्मशानभूमी निरर्थक ठरत असून त्यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा निधी व्यर्थ ठरत आहे.आंध्र सीमेलगत असलेल्या विरूर गावात आठ वर्षापूर्वी नदीच्या काठावर स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले. या ठिकाणी पाण्याच्या व्यवस्थेकरिता बोअरवेलसुद्धा बसविण्यात आलेली नाही. अंतिम संस्कार करण्यासाठी स्मशानभूमीकडे जाण्याकरिता योग्य रस्ता नाही. या ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर अनेक काटेरी झुडपे आहेत. तसेच पावसाळ्यात तर या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्या स्मशानभूमीत आठ वर्षांपासून एकही अंतिम संस्कार झाला नाही. स्मशानभूमीकडे कुणीही येत नसल्याने सध्या या स्मशानभूमीवरील छप्पर, लोखंडी शवदाहिनीसुद्धा गायब झाल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नाल्यावरील पाण्याचा ठणठणाट असतो. बोअरवेल नसल्याने जिथे पाणी उपलब्ध राहील तिथे अंतीम संस्कार होत असते. स्मशानभूमीचे बांधकामही निकृष्ट दर्जाचे झाल्याने स्मशानभूमीला भेगा पडल्याचे दिसून येत आहे. स्मशानभूमीच्या अनेक समस्येमुळे नागरिक येथे जाणे पसंत करीत नाही. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. (वार्ताहर)