लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अधिकार कायद्यांतर्गत विविध माध्यमांच्या शाळांमध्ये दरवर्षी प्रवेश दिले जातात. १२ फेबु्रवारीपासून आरटीईच्या नोंदणीस सुरूवात करण्यात आली. ११ आणि १२ मार्चला आरटीईची सोडत काढण्यात येईल. सोमवार नोंदणीचा शेवटला दिवस होता. मात्र तांत्रिक कारणामुळे अनेक पालकांना अर्ज भरता आले नसल्याने प्रवेशाासाठी ४ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.आरटीई प्रवेशासाठी दरवर्षी स्वतंत्रपणे प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. जिल्ह्यातील १९७ शाळांनी नोंदणी केली असून एक हजार १८०७ जागांचा समावेश आहे. १२ फेबु्रवारीपासून पालकांना पाल्यांचे अर्ज नोंदविण्याच्या सुचना विभागाने दिल्या आहेत. यानुसार अर्ज भरण्यास सुरूवात झालेली आहे. आतापर्यंत चार हजार ३४२ बालकांची नोंदणी केली आहे. हे वेळापत्रक जाहीर करताना विभागाकडून ११ आणि १२ तारखेला एकमेव सोडत घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.मात्र, मागीलव वर्षी आरटीईव्दारे जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत चार फेऱ्या राबविण्यात आल्या होत्या. त्यानंतरही अनेक जागा रिक्त असल्याचे चित्र समोर आले होते. यावर्षीसुद्धा अत्यल्प बालकांच्या नोंदी झाल्यामुळे संपूर्ण जागांसाठी सोडत काढल्यानंतर प्रवेश घेणाऱ्यांची संख्या बघता, बºयाच जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.मुदतवाढीसाठी सामाजिक संघटनेचा पाठपुरावाआरटीईचा अर्ज भरण्यासाठी केवळ चार सर्व्हरवर संंपूर्ण राज्यातील प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे पालकांना अर्ज भरताना बºयाच तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे पालक त्रस्त आहेत. शिवाय गुगल मॅपिंगमध्ये बराच घोळ असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकाच घरातील दोन मुलींना वेगवेगळ्या शाळा दाखविण्यात येत आहे. त्यामुळे अर्ज भरताना बराच वेळ लागत असल्याने बºयाच पालकांचे अर्ज भरायचे असल्याचे नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी पालक आणि आरटीई अॅक्शन समितीचे शाहिद यांनी केली होती, ती मागणी पूर्ण झाली आहे.