शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जीवघेण्या विषारी धुराने दुर्गापुरात काळोख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 23:03 IST

दुर्गापूर परिसरात स्वयंपाकाकरिता मोठ्या प्रमाणात दगडी कोळशाच्या शेगड्या पेटविल्या जात आहेत. यातून सर्वत्र पसरणाऱ्या धुराने आसमंत काळवंडले आहे. त्यात नागरिकांचा जीव घुटमळत असून आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून दुर्गापूर शेगडीमुक्त करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देआजारांचा धोका : उपाययोजना करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदुर्गापूर : दुर्गापूर परिसरात स्वयंपाकाकरिता मोठ्या प्रमाणात दगडी कोळशाच्या शेगड्या पेटविल्या जात आहेत. यातून सर्वत्र पसरणाऱ्या धुराने आसमंत काळवंडले आहे. त्यात नागरिकांचा जीव घुटमळत असून आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून दुर्गापूर शेगडीमुक्त करणे गरजेचे आहे.शेगड्यांमध्ये दगडी कोळसा जाळून त्यावर स्वयंपाक केला जातो. मात्र त्यातून निघणाऱ्या विषारी धुराचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊन नागरिकांचे आयुर्मान कमी होते. दुर्गापूर परिसरातील काही नागरिक दररोज सकाळी व सायंकाळी दगडी कोळशाच्या शेगड्या पेटवत आहेत. या शेकडो शेगड्यातून धुराच्या स्वरूपात निघणारे विषारी वायु वातावरणात पसरून परिसर काळवंडत आहे.यामध्ये मनुष्यात घातक असलेला कार्बन मोनाआॅक्साईडचे प्रमाण सर्वाधिक असते. या वायुने दुर्गापूरचा परिसर व्यापून मानवाला आवश्यक असलेला प्राणवायू हरवत आहे.जीवघेण्या प्रदूषणात नागरिकांचा जीव घुटमळत आहे. या वायुचे रौद्ररूप ताडोबा मार्गावर असलेल्या मेजर स्टोअर गेट ते शक्तीनगर गेटपर्यंतच्या चौफेर भागात अनुभवाला येत आहे. काही दिवसांपासून धुराच्या प्रमाणात मोठी वाढ झाली. या प्रदूषणामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याने प्रतिबंध घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.नागरिक हैराणदुर्गापूर परिसरात मागील काही दिवसांपासून दिवसभर मोठ्या प्रमाणात धुळीचे कण पसरत आहेत. या भागात स्वयंपाकासाठी कोळशाचा वापर करणाºया नागरिकांची संख्या वाढली. आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांचा यामध्ये समावेश आहे. पण, या कोळशामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. स्वयंपाकासाठी कोळशाचा नाईलाजास्तव वापर होतो. त्यामुळे अशा कुटुंबीयांना योजनेअंतर्गत सिलिंडर देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.