जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २५ हजार १२८ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ७४९ झाली आहे. सद्यस्थितीत ९७३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात दोन लाख ३७ हजार ८२१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन लाख नऊ हजार ९०५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आज मृत झालेल्यांमध्ये सुरक्षानगर भद्रावती येथील ६२ वर्षीय महिला व कोरपना तालुक्यातील नांदफाटा येथील ७० वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४०६ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील ३६७, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
२४ तासातील तालुकानिहाय रूग्ण
आज बाधित आढळलेल्या १६४ रूग्णांमध्ये चंद्रपूर क्षेत्रातील ८८, चंद्रपूर तालुका १४, वरोरा २१, भद्रावती १७, बल्लारपूर व ब्रह्मपुरी तालुका प्रत्येकी दोन, नागभीड चार, सिंदेवाही तीन, मूल दोन, पोंभुर्णा एक, गोंडपिपरी एक, राजुरा एक, चिमूर चार, कोरपना दोन व इतर ठिकाणच्या दोन रूग्णांचा समावेश आहे.