शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यामुळे पाण्याची समस्या सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

उमरवाही उमा नदी घाटावरून पर्यायी उपाय करण्यात आला. रत्नापूर या गावासाठी एकमेव पाणी पुरवठ्याचे साधन आहे. आठ हजार लोकसंख्या असलेल्या गावात हातपंप व-विहिरी असल्यातरी सर्व ठिकाणी खाणे पाणी आहे. गावाशेजारी शेतामध्ये विहिरी आहेत. त्याठिकाणी गोडे पाणी आहे. संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी या विहिरी सक्षम नाहीत. त्यामुळे सर्व भार हा नळ योजनेवरच अवलंबून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर व शिवणी मार्गावरील उमा नदीवर बंधारा बांधून पाणी अडविल्याने नदीतीले पाण्याचा मोठा साठा उपलब्ध झाला. त्यामुळे यंदा पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावणार नाही, अशी शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे.उमा नदीवरून रत्नापूर गावासाठी नळयोजनेद्वारे गावाला पाणी पुरवठा केला जातो. त्याचबरोबर शिवणी व काही प्रमाणात नवरगावला नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा होते. मात्र नदीचे पात्र दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच कोरडे पडत असल्याने या तिन्ही गावांना दरवर्षी पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. नवरगावला पाणी पुरवठ्यासाठी धुमणखेडा या ठिकाणी बोरवेल आहे. अलीकडे उमरवाही उमा नदी घाटावरून पर्यायी उपाय करण्यात आला. रत्नापूर या गावासाठी एकमेव पाणी पुरवठ्याचे साधन आहे. आठ हजार लोकसंख्या असलेल्या गावात हातपंप व-विहिरी असल्यातरी सर्व ठिकाणी खाणे पाणी आहे. गावाशेजारी शेतामध्ये विहिरी आहेत. त्याठिकाणी गोडे पाणी आहे. संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी या विहिरी सक्षम नाहीत. त्यामुळे सर्व भार हा नळ योजनेवरच अवलंबून आहे.दरवर्षी निर्माण होणारी पाण्याची समस्या लक्षात घेवून रत्नापूर ग्रामपंचायतने बंधारा बांधण्याची मागणी केली असता प्रशासनाने मान्यता दिली. गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी नदी पात्रात विहिरी बांधल्या आहेत. त्याच्या खालच्या भागाला नदी पात्रात मोठा बंधारा बांधण्यात आला आहे.ग्रामपंचायतने त्याठिकाणी प्लेट लावून पाणी अडविले. त्यामुळे बंधाºयाच्या वरच्या भागाला नदीपात्रात चार-पाच किमी अंतरापर्यंत जलसाठा उपलब्ध झाला. रत्नापूरवासींना सदर पाणी एप्रिल-मे महिन्यापर्यंत पुरवठा होऊ शकतो.बंधाºयामुळे उपलब्ध झालेले पाणी शेतकऱ्यांना वापरता येत नाही. परंतू याच नदी पात्राच्या दोन्ही भागाला काही प्रमाणात शेती आहे. काही शेतकरी भाजीपाल्याची लागवड करतात. वीज पंपाच्या सहाय्याने नदी पात्रातील पाणी वापरण्याचा प्रयत्न करतात. अशा शेतकºयांवर वेळीच कार्यवाही करण्याची गरज आहे. यासाठी ग्रामपंचायत, वीज वितरण कंपणी तसेच तहसील कार्यालयाने लक्ष देण्याची गरज आहे.नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने हा परिसर आता सौंदर्याने खुलून दिसत येत आहे. जंगलाचा परिसर लागून असल्याने वन्यप्राण्यांनाही उन्हाळ्यात पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे.

टॅग्स :Waterपाणी