शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

बंधाऱ्यामुळे पाण्याची समस्या सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

उमरवाही उमा नदी घाटावरून पर्यायी उपाय करण्यात आला. रत्नापूर या गावासाठी एकमेव पाणी पुरवठ्याचे साधन आहे. आठ हजार लोकसंख्या असलेल्या गावात हातपंप व-विहिरी असल्यातरी सर्व ठिकाणी खाणे पाणी आहे. गावाशेजारी शेतामध्ये विहिरी आहेत. त्याठिकाणी गोडे पाणी आहे. संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी या विहिरी सक्षम नाहीत. त्यामुळे सर्व भार हा नळ योजनेवरच अवलंबून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर व शिवणी मार्गावरील उमा नदीवर बंधारा बांधून पाणी अडविल्याने नदीतीले पाण्याचा मोठा साठा उपलब्ध झाला. त्यामुळे यंदा पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावणार नाही, अशी शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे.उमा नदीवरून रत्नापूर गावासाठी नळयोजनेद्वारे गावाला पाणी पुरवठा केला जातो. त्याचबरोबर शिवणी व काही प्रमाणात नवरगावला नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा होते. मात्र नदीचे पात्र दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच कोरडे पडत असल्याने या तिन्ही गावांना दरवर्षी पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. नवरगावला पाणी पुरवठ्यासाठी धुमणखेडा या ठिकाणी बोरवेल आहे. अलीकडे उमरवाही उमा नदी घाटावरून पर्यायी उपाय करण्यात आला. रत्नापूर या गावासाठी एकमेव पाणी पुरवठ्याचे साधन आहे. आठ हजार लोकसंख्या असलेल्या गावात हातपंप व-विहिरी असल्यातरी सर्व ठिकाणी खाणे पाणी आहे. गावाशेजारी शेतामध्ये विहिरी आहेत. त्याठिकाणी गोडे पाणी आहे. संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी या विहिरी सक्षम नाहीत. त्यामुळे सर्व भार हा नळ योजनेवरच अवलंबून आहे.दरवर्षी निर्माण होणारी पाण्याची समस्या लक्षात घेवून रत्नापूर ग्रामपंचायतने बंधारा बांधण्याची मागणी केली असता प्रशासनाने मान्यता दिली. गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी नदी पात्रात विहिरी बांधल्या आहेत. त्याच्या खालच्या भागाला नदी पात्रात मोठा बंधारा बांधण्यात आला आहे.ग्रामपंचायतने त्याठिकाणी प्लेट लावून पाणी अडविले. त्यामुळे बंधाºयाच्या वरच्या भागाला नदीपात्रात चार-पाच किमी अंतरापर्यंत जलसाठा उपलब्ध झाला. रत्नापूरवासींना सदर पाणी एप्रिल-मे महिन्यापर्यंत पुरवठा होऊ शकतो.बंधाºयामुळे उपलब्ध झालेले पाणी शेतकऱ्यांना वापरता येत नाही. परंतू याच नदी पात्राच्या दोन्ही भागाला काही प्रमाणात शेती आहे. काही शेतकरी भाजीपाल्याची लागवड करतात. वीज पंपाच्या सहाय्याने नदी पात्रातील पाणी वापरण्याचा प्रयत्न करतात. अशा शेतकºयांवर वेळीच कार्यवाही करण्याची गरज आहे. यासाठी ग्रामपंचायत, वीज वितरण कंपणी तसेच तहसील कार्यालयाने लक्ष देण्याची गरज आहे.नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने हा परिसर आता सौंदर्याने खुलून दिसत येत आहे. जंगलाचा परिसर लागून असल्याने वन्यप्राण्यांनाही उन्हाळ्यात पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे.

टॅग्स :Waterपाणी