शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

धरण आटले, पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:18 IST

गतवर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे यावर्षी अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या उन्हाचा पारा ४७ अंशावर पोहोचला असून नदी, नाले कोरडे पडत आहेत. यातच जिल्ह्यातील चार जलाशये पूर्णत: कोरडे पडले असून पाणी समस्या बिकट झाली आहे. पाण्यासाठी अनेक गावात हाहाकार सुरू असून नदी, नाले, जलाशये आटल्याने अनेक गावांची पाणीपुरवठा व्यवस्थाच कोलमडली आहे.

ठळक मुद्देचार जलाशये कोरडी : अनेक गावांची पाणी पुरवठा व्यवस्था कोलमडली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गतवर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे यावर्षी अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या उन्हाचा पारा ४७ अंशावर पोहोचला असून नदी, नाले कोरडे पडत आहेत. यातच जिल्ह्यातील चार जलाशये पूर्णत: कोरडे पडले असून पाणी समस्या बिकट झाली आहे. पाण्यासाठी अनेक गावात हाहाकार सुरू असून नदी, नाले, जलाशये आटल्याने अनेक गावांची पाणीपुरवठा व्यवस्थाच कोलमडली आहे.जिल्ह्यातील १० धरणांपैकी चार धरण हे पूर्णत: कोरडे पडले आहेत. यात नलेश्वर, चंदई, चारगाव, लभानसराड या धरणांचा समावेश आहे. या धरणात संकल्पीत उपयुक्त पाणीसाठ्या व्यतीरिक्त आता एकही पाणीसाठा उपलब्ध नाही. तर असोलामेंढा, घोडाझरी, चारगाव, अमलनाला, पकडीगुड्डम, डोंगरगाव, इरई या धरणातही सध्या अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे हे धरणेसुद्धा काही दिवसांत कोरडे पडण्याची शक्यता आहे.सध्या सूर्य आग ओकत आहे. जिल्ह्याचे तापमान ४७ अंशाच्या पार गेले असून या तीव्र उन्हामुळे घसा कोरडा पडून पाण्याची सतत गरज भासत आहे. मात्र पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणा ज्या ठिकाणी कार्यरत आहेत, त्या ठिकाणी पाणीच वाहत नसल्याने या यंत्रणाही निकामी ठरल्या आहेत.धरणातील पाणीसाठा लगतच्या गावातील नागरिकांसाठी व जनावरांसाठी उपयोगी येत होते. तर काही गावातील पाणी पुरवठा योजनाही धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र धरणच कोरडे पडल्याने या पाणी पुरवठा योजना आता कुचकामी पडल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ११४२ एवढे आहे. मात्र गतवर्षी सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाल्याने यावर्षी पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे.अनेक गावात पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असून प्रशासनाने काही गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. तर काही गावात अद्यापही टँकर पोहोचले नसल्याने गावकºयांत रोष पसरला आहे.ग्रामीण भागात पाण्यासाठी जीवघेणा संघर्षगतवर्षी पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे जलाशये, नदी, तलाव-बोड्या पुर्णपणे भरल्या नाही. आता तर तप्त उन्हामुळे पाण्याचे स्रोत आटत चालले आहे. ग्रामीण भागातील अनेक बोअरवेल्स बंद आहेत. विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोरपना, जिवती तालुक्यात तर पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. असे असले तरी प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाही.धरणातील उपलब्ध पाणीसाठा७ मेच्या नोंदीनुसार सध्यास्थितीत आसोलामेंढा धरणात १४.२५ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. घोडाझरी तलावात २४.९६ टक्के, अमलनाला धरणात १३.४० टक्के, पकडीगुड्डम धरणात ९.७० टक्के, डोंगरगाव धरणात १७.७२ टक्के तर इरई धरणात केवळ १५.५० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. लभानसराड धरण कोरडे पडले असून नलेश्वर धरणात १.२० टक्के तर चारगाव धरणात ६.६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.