शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

धरण आटले, पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:18 IST

गतवर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे यावर्षी अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या उन्हाचा पारा ४७ अंशावर पोहोचला असून नदी, नाले कोरडे पडत आहेत. यातच जिल्ह्यातील चार जलाशये पूर्णत: कोरडे पडले असून पाणी समस्या बिकट झाली आहे. पाण्यासाठी अनेक गावात हाहाकार सुरू असून नदी, नाले, जलाशये आटल्याने अनेक गावांची पाणीपुरवठा व्यवस्थाच कोलमडली आहे.

ठळक मुद्देचार जलाशये कोरडी : अनेक गावांची पाणी पुरवठा व्यवस्था कोलमडली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गतवर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे यावर्षी अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या उन्हाचा पारा ४७ अंशावर पोहोचला असून नदी, नाले कोरडे पडत आहेत. यातच जिल्ह्यातील चार जलाशये पूर्णत: कोरडे पडले असून पाणी समस्या बिकट झाली आहे. पाण्यासाठी अनेक गावात हाहाकार सुरू असून नदी, नाले, जलाशये आटल्याने अनेक गावांची पाणीपुरवठा व्यवस्थाच कोलमडली आहे.जिल्ह्यातील १० धरणांपैकी चार धरण हे पूर्णत: कोरडे पडले आहेत. यात नलेश्वर, चंदई, चारगाव, लभानसराड या धरणांचा समावेश आहे. या धरणात संकल्पीत उपयुक्त पाणीसाठ्या व्यतीरिक्त आता एकही पाणीसाठा उपलब्ध नाही. तर असोलामेंढा, घोडाझरी, चारगाव, अमलनाला, पकडीगुड्डम, डोंगरगाव, इरई या धरणातही सध्या अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे हे धरणेसुद्धा काही दिवसांत कोरडे पडण्याची शक्यता आहे.सध्या सूर्य आग ओकत आहे. जिल्ह्याचे तापमान ४७ अंशाच्या पार गेले असून या तीव्र उन्हामुळे घसा कोरडा पडून पाण्याची सतत गरज भासत आहे. मात्र पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणा ज्या ठिकाणी कार्यरत आहेत, त्या ठिकाणी पाणीच वाहत नसल्याने या यंत्रणाही निकामी ठरल्या आहेत.धरणातील पाणीसाठा लगतच्या गावातील नागरिकांसाठी व जनावरांसाठी उपयोगी येत होते. तर काही गावातील पाणी पुरवठा योजनाही धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र धरणच कोरडे पडल्याने या पाणी पुरवठा योजना आता कुचकामी पडल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ११४२ एवढे आहे. मात्र गतवर्षी सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाल्याने यावर्षी पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे.अनेक गावात पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असून प्रशासनाने काही गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. तर काही गावात अद्यापही टँकर पोहोचले नसल्याने गावकºयांत रोष पसरला आहे.ग्रामीण भागात पाण्यासाठी जीवघेणा संघर्षगतवर्षी पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे जलाशये, नदी, तलाव-बोड्या पुर्णपणे भरल्या नाही. आता तर तप्त उन्हामुळे पाण्याचे स्रोत आटत चालले आहे. ग्रामीण भागातील अनेक बोअरवेल्स बंद आहेत. विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोरपना, जिवती तालुक्यात तर पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. असे असले तरी प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाही.धरणातील उपलब्ध पाणीसाठा७ मेच्या नोंदीनुसार सध्यास्थितीत आसोलामेंढा धरणात १४.२५ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. घोडाझरी तलावात २४.९६ टक्के, अमलनाला धरणात १३.४० टक्के, पकडीगुड्डम धरणात ९.७० टक्के, डोंगरगाव धरणात १७.७२ टक्के तर इरई धरणात केवळ १५.५० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. लभानसराड धरण कोरडे पडले असून नलेश्वर धरणात १.२० टक्के तर चारगाव धरणात ६.६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.