शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

धरण आटले, पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:18 IST

गतवर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे यावर्षी अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या उन्हाचा पारा ४७ अंशावर पोहोचला असून नदी, नाले कोरडे पडत आहेत. यातच जिल्ह्यातील चार जलाशये पूर्णत: कोरडे पडले असून पाणी समस्या बिकट झाली आहे. पाण्यासाठी अनेक गावात हाहाकार सुरू असून नदी, नाले, जलाशये आटल्याने अनेक गावांची पाणीपुरवठा व्यवस्थाच कोलमडली आहे.

ठळक मुद्देचार जलाशये कोरडी : अनेक गावांची पाणी पुरवठा व्यवस्था कोलमडली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गतवर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे यावर्षी अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या उन्हाचा पारा ४७ अंशावर पोहोचला असून नदी, नाले कोरडे पडत आहेत. यातच जिल्ह्यातील चार जलाशये पूर्णत: कोरडे पडले असून पाणी समस्या बिकट झाली आहे. पाण्यासाठी अनेक गावात हाहाकार सुरू असून नदी, नाले, जलाशये आटल्याने अनेक गावांची पाणीपुरवठा व्यवस्थाच कोलमडली आहे.जिल्ह्यातील १० धरणांपैकी चार धरण हे पूर्णत: कोरडे पडले आहेत. यात नलेश्वर, चंदई, चारगाव, लभानसराड या धरणांचा समावेश आहे. या धरणात संकल्पीत उपयुक्त पाणीसाठ्या व्यतीरिक्त आता एकही पाणीसाठा उपलब्ध नाही. तर असोलामेंढा, घोडाझरी, चारगाव, अमलनाला, पकडीगुड्डम, डोंगरगाव, इरई या धरणातही सध्या अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे हे धरणेसुद्धा काही दिवसांत कोरडे पडण्याची शक्यता आहे.सध्या सूर्य आग ओकत आहे. जिल्ह्याचे तापमान ४७ अंशाच्या पार गेले असून या तीव्र उन्हामुळे घसा कोरडा पडून पाण्याची सतत गरज भासत आहे. मात्र पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणा ज्या ठिकाणी कार्यरत आहेत, त्या ठिकाणी पाणीच वाहत नसल्याने या यंत्रणाही निकामी ठरल्या आहेत.धरणातील पाणीसाठा लगतच्या गावातील नागरिकांसाठी व जनावरांसाठी उपयोगी येत होते. तर काही गावातील पाणी पुरवठा योजनाही धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र धरणच कोरडे पडल्याने या पाणी पुरवठा योजना आता कुचकामी पडल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ११४२ एवढे आहे. मात्र गतवर्षी सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाल्याने यावर्षी पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे.अनेक गावात पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असून प्रशासनाने काही गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. तर काही गावात अद्यापही टँकर पोहोचले नसल्याने गावकºयांत रोष पसरला आहे.ग्रामीण भागात पाण्यासाठी जीवघेणा संघर्षगतवर्षी पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे जलाशये, नदी, तलाव-बोड्या पुर्णपणे भरल्या नाही. आता तर तप्त उन्हामुळे पाण्याचे स्रोत आटत चालले आहे. ग्रामीण भागातील अनेक बोअरवेल्स बंद आहेत. विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोरपना, जिवती तालुक्यात तर पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. असे असले तरी प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाही.धरणातील उपलब्ध पाणीसाठा७ मेच्या नोंदीनुसार सध्यास्थितीत आसोलामेंढा धरणात १४.२५ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. घोडाझरी तलावात २४.९६ टक्के, अमलनाला धरणात १३.४० टक्के, पकडीगुड्डम धरणात ९.७० टक्के, डोंगरगाव धरणात १७.७२ टक्के तर इरई धरणात केवळ १५.५० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. लभानसराड धरण कोरडे पडले असून नलेश्वर धरणात १.२० टक्के तर चारगाव धरणात ६.६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.