शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

सायक्लोस्टाईल बुलेटिनने चंद्रपुरात ब्रिटिशांची झोप उडविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:29 IST

गोंडपिपरी (चंद्रपूर) : स्वातंत्र्य संग्रामात वृत्तपत्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. चंद्रपुरात वृत्तपत्रांचा जन्म व्हायचा होता. स्वातंत्र्य चळवळीतील सेनानींनी सर्वसामान्यात ...

गोंडपिपरी (चंद्रपूर) : स्वातंत्र्य संग्रामात वृत्तपत्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. चंद्रपुरात वृत्तपत्रांचा जन्म व्हायचा होता. स्वातंत्र्य चळवळीतील सेनानींनी सर्वसामान्यात स्वातंत्र्याची ज्योत पेटविण्यासाठी सायक्लोस्टाईल बुलेटिन काढले. ब्रिटिशविरोधी मतप्रवाह निर्माण करणाऱ्या या बुलेटिनच्या शोधासाठी ब्रिटिशांनी गुप्तहेर लावलेत. मध्यरात्री वेष बदलवून कार्यकर्त्यांपर्यंत गुप्तपणे बुलेटिन पोहचविले जायचे. शेवटपर्यंत या बुलेटिनचा थांगपत्ता ब्रिटिशांना लागला नाही. या बुलेटिनचे आजही चंद्रपूरकरांना कुतूहल आहे.

ब्रिटिश साम्राज्याची सत्ता उलथवून टाकण्यासाठी देशभरात स्वातंत्र्य सेनानींनी आंदोलन छेळले. या आंदोलनाची धग चंद्रपूरपर्यंत येऊन पोहचली होती. ब्रिटिशांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या वीर बाबुराव शेडमाके यांनी चांदाभुमीत ब्रिटिश विरोधी आवाज बुलंद केला. त्यानंतर अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला झोकून दिले. स्वातंत्र्य संग्रामात वृत्तपत्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सामान्यजनात स्वातंत्र्याची ज्योत पेटविण्याचे महत्तम कार्य वृत्तपत्रांनी केले. सन १९१० मध्ये चंद्रपुरात वृत्तपत्रांचा जन्म व्हायचा होता. दुसरीकडे व्हाइसराॅय याने प्रेस विरोधात फतवा काढून प्रकाशन स्वातंत्र्यावर गदा आणली होती. अश्या बिकट स्थितीत चंद्रपुरातील स्वातंत्र्य संग्रामातील घडामोडींची माहिती देण्यासाठी सायक्लोस्टाईल बुलेटिन सुरू करण्यात आले होते. या बुलेटिनचा माध्यमातून ब्रिटिश विरोधी मतप्रवाह निर्मिती केल्या जात होता. वेषांतर करून अतिशय गुप्तपणे हे बुलेटिन सर्वसामान्यांपर्यंत पोहचविले जायचे. चंद्रपुरातील वानर सेनेकडून या बुलेटिनची विक्री केली जात होती. या बुलेटीनची माहिती ब्रिटिशांना होताच बुलेटिन काढणाऱ्या सेनानींचा शोध घेण्यास ब्रिटिंशानी गुप्तहेर लावलेत. मात्र अखेरपर्यंत त्यांना याचा शोध लावता आला नाही. छगनलाल खंजाजी आणि उत्तमचंद पुगलिया या दोघांनी नंतरच्या काळात अश्याच प्रकारच्या बुलेटिनचा वापर केला. चंद्रपुरातील साहित्यिक तथा जेष्ठ पत्रकार डाॅ. अ. तु. काटकर यांनी ‘चंद्रपूर : स्वातंत्र्य संग्रामातील अधोरेखिते’ या पुस्तकात सायक्लोस्टाईल बुलेटिनचा वापर स्वातंत्र्य संग्रामात चंद्रपुरात झाल्याचा उल्लेख केला आहे.

इंग्लडचा राजकुमाराचा विरोध

इंग्लंडचे राजकुमार ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ हे भारत भेटीला आले होते. ३० जानेवारी १९२२ ला राजकुमार नागपूरला आले. देशभरात राजकुमाराचा भारत भेटीचा निषेध केला जात होता. अनेक शहरात बहिष्कार टाकला गेला. चंद्रपूर जिल्ह्यातूनही विरोध उमटला. चंद्रपूर, चिमूर, नागभिड, ब्रम्हपुरी, वरोरा येथे भेटी विरोधात बहिष्कार टाकला गेला.