शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

संचारबंदीने व्यावसायिक हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:28 IST

शिवभोजन केंद्रांची संख्या वाढवा चंद्रपूर : कोरोना संकटामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद आहे. अशा वेळी सामान्य नागरिकांना नाहक ...

शिवभोजन केंद्रांची संख्या वाढवा

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद आहे. अशा वेळी सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने गावागावांत शिवभोजन केंद्र सुरू करावे, अशी मागणी सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

मोबाईलवर एसएमएस धडकले

चंद्रपूर : शासनाने संचारबंदी लागू करताच इंग्रजी शाळांच्या शिक्षकांनी पालकांच्या मोबाईलवर मॅसेज पाठवून निकालाची तसेच फी भरण्याची तारीख वाढवून देत आता पुढील महिन्यातील तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे काही दिवस का होईना, पालकांना दिलासा मिळाला आहे.

बांधकाम व्यावसायिक अडचणीत

चंद्रपूर : शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम केले जात आहे. दरम्यान, संचारबंदीमुळे काही मजुरांनी आपल्या गावाला जाणे पसंत केले आहे. त्यामुळे या व्यावसायिकांकडे मजूर वर्गाचा तुटवडा आहे. त्यातच कामाच्या ठिकाणीच मजुरांच्या राहण्याची व्यवस्था करावयाची असल्याने काहींना ते शक्य नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत बांधकाम व्यावसायिक अडचणीत आले आहे.

परीक्षा नसली तरी पालकांची धावपळ

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे या वर्षी पहिली ते नवव्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेताच उत्तीर्ण केले जाणार आहे. त्यामुळे आता पुढील शैक्षणिक सत्रासाठी पालकांनी तयारी सुरू केले आहे. विशेषत: नवव्या तसेच एकराव्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आता शिकवणी वर्ग शोधणे सुरू केले आहे.

स्वच्छतेअभावी नागरिक हैराण

चंद्रपूर : शहरातील पठाणपुरा, तुकूम, वडगाव परिसरांतील काही चौकांमध्ये अस्वच्छता आहे. त्यामुळे याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देऊन स्वच्छता करावी, अशी मागणी केली जात आहे.

आझाद बागेचे काम त्वरित करावे

चंद्रपूर : येथील आझाद बागेच्या सौंदर्यीकरणाचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे सदर काम त्वरित करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, मागील लाॅकडाऊनपासून ही बाग नागरिकांसाठी बंदच आहे.

पुतळ्याचे सौंदर्यीकरण करावे

चंद्रपूर : शहरात विविध चौकांमध्ये महापुरुषांचे पुतळे आहे. मात्र या पुतळ्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या पुतळ्यांचे सौंदर्यीकरण करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

जनावरांमुळे अपघाताची शक्यता

चंद्रपूर : येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे उभी राहत असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, वरोरा नाका चौक अपघातग्रस्त चौक म्हणून ओळख आहे. या चौकातही मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे राहत असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.