शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

धान पिकाच्या संरक्षणासाठी झेंडू व बाजरीची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:32 IST

नवा प्रयोग : युवा शेतकऱ्याचा पुढाकार राजू गेडाम मूल : धान पिकाचे संरक्षण करणे हे शेतकऱ्यासाठी आव्हानात्मक असते. वातावरणात ...

नवा प्रयोग : युवा शेतकऱ्याचा पुढाकार

राजू गेडाम

मूल : धान पिकाचे संरक्षण करणे हे शेतकऱ्यासाठी आव्हानात्मक असते. वातावरणात झालेल्या बदलामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव जाणवत असतो. हे टाळण्यासाठी मूल येथील युवा शेतकऱ्याने सात एकर धानाच्या शेतात पाव एकरात झेंडूची व बाजरीची लागवड केली आहे. धानावरील किडे हे झेंडू फुलावर आकर्षित होतात. त्याचवेळी बाजरी खाण्यासाठी येणारे पक्षी बाजरी न खाता झेंडूवरील किडे खाण्यास आगेकूच करतील. त्यामुळे धान पिकाबरोबरच झेंडूची फुले व बाजरीचे देखील संरक्षण होईल. यातून तिहेरी फायदा घेण्याचा प्रयत्न मूल येथील युवा शेतकरी राहुल आगडे यांनी केला आहे.

विदर्भात धान शेतीला फार महत्त्व दिले जाते. धानशेती हा मुख्य व्यवसाय असून जास्तीत जास्त शेतकरी धानाची लागवड करीत असतात. धानाची शेती ही निसर्गावर अवलंबून असते. पावसाचे प्रमाण, वातावरण यावर धानाचे उत्पादन अवलंबून असते. वातावरणात झालेल्या बदलामुळे धान पिकावर परिणाम होऊन उत्पादन कमी होते. त्यावेळी लावलेला खर्चदेखील निघणे अवघड जात असते. हे टाळता यावे म्हणून मूल येथील युवा शेतकरी राहुल सुरेश आगडे यांनी पिकाचे किडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी नवीन तर्कशुद्ध शक्कल लढविली. जेव्हा धानाचे पीक गर्भात असते, तेव्हा किड्यांचा त्रास सुरू होतो. ते धान पिकावर बसून त्यातील रस शोषून घेतात. त्यामुळे धान उत्पादन क्षमता मंदावते व मोठे नुकसान शेतकऱ्याला सहन करावे लागते. हे टाळण्यासाठी राहुल आगडे याला नवीन कल्पना सुचली. धानाच्या शेतीलगत त्याने पाव एकरात झेंडूची लागवड केली. धानावरील किडे हे झेंडू फुलावर आकर्षित होतात. जवळच असलेली बाजरी खाण्यासाठी येणारे पक्षी बाजरी न खाता झेंडूवरील किडे खाण्याकडे आपला मोर्चा वळवितात. त्यामुळे धान पिकाचे संरक्षण करण्यास पोषक ठरते. यामुळे पिकाबरोबरच झेंडूची फुले व बाजरीच्या पिकाचे देखील संरक्षण होते.

बॉक्स

झेंडूलाही चांगली मागणी

दिवसेंदिवस झेंडूच्या फुलांना मागणी वाढली असून सणासुदीच्या दिवशी या फ़ुलांना मोठी मागणी असते. यातून आर्थिक विकासाला देखील हातभार लावता येतो. तसेच बाजरीलादेखील मागणी आहे. बाजरीच्या भाकरी पौष्टिक असल्याने ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातदेखील मागणी वाढली आहे. त्यामुळे येत्या काळात योग्य नियोजन केल्यास आर्थिक उन्नती होऊ शकते.