शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

धान पिकाच्या संरक्षणासाठी झेंडू व बाजरीची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:32 IST

नवा प्रयोग : युवा शेतकऱ्याचा पुढाकार राजू गेडाम मूल : धान पिकाचे संरक्षण करणे हे शेतकऱ्यासाठी आव्हानात्मक असते. वातावरणात ...

नवा प्रयोग : युवा शेतकऱ्याचा पुढाकार

राजू गेडाम

मूल : धान पिकाचे संरक्षण करणे हे शेतकऱ्यासाठी आव्हानात्मक असते. वातावरणात झालेल्या बदलामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव जाणवत असतो. हे टाळण्यासाठी मूल येथील युवा शेतकऱ्याने सात एकर धानाच्या शेतात पाव एकरात झेंडूची व बाजरीची लागवड केली आहे. धानावरील किडे हे झेंडू फुलावर आकर्षित होतात. त्याचवेळी बाजरी खाण्यासाठी येणारे पक्षी बाजरी न खाता झेंडूवरील किडे खाण्यास आगेकूच करतील. त्यामुळे धान पिकाबरोबरच झेंडूची फुले व बाजरीचे देखील संरक्षण होईल. यातून तिहेरी फायदा घेण्याचा प्रयत्न मूल येथील युवा शेतकरी राहुल आगडे यांनी केला आहे.

विदर्भात धान शेतीला फार महत्त्व दिले जाते. धानशेती हा मुख्य व्यवसाय असून जास्तीत जास्त शेतकरी धानाची लागवड करीत असतात. धानाची शेती ही निसर्गावर अवलंबून असते. पावसाचे प्रमाण, वातावरण यावर धानाचे उत्पादन अवलंबून असते. वातावरणात झालेल्या बदलामुळे धान पिकावर परिणाम होऊन उत्पादन कमी होते. त्यावेळी लावलेला खर्चदेखील निघणे अवघड जात असते. हे टाळता यावे म्हणून मूल येथील युवा शेतकरी राहुल सुरेश आगडे यांनी पिकाचे किडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी नवीन तर्कशुद्ध शक्कल लढविली. जेव्हा धानाचे पीक गर्भात असते, तेव्हा किड्यांचा त्रास सुरू होतो. ते धान पिकावर बसून त्यातील रस शोषून घेतात. त्यामुळे धान उत्पादन क्षमता मंदावते व मोठे नुकसान शेतकऱ्याला सहन करावे लागते. हे टाळण्यासाठी राहुल आगडे याला नवीन कल्पना सुचली. धानाच्या शेतीलगत त्याने पाव एकरात झेंडूची लागवड केली. धानावरील किडे हे झेंडू फुलावर आकर्षित होतात. जवळच असलेली बाजरी खाण्यासाठी येणारे पक्षी बाजरी न खाता झेंडूवरील किडे खाण्याकडे आपला मोर्चा वळवितात. त्यामुळे धान पिकाचे संरक्षण करण्यास पोषक ठरते. यामुळे पिकाबरोबरच झेंडूची फुले व बाजरीच्या पिकाचे देखील संरक्षण होते.

बॉक्स

झेंडूलाही चांगली मागणी

दिवसेंदिवस झेंडूच्या फुलांना मागणी वाढली असून सणासुदीच्या दिवशी या फ़ुलांना मोठी मागणी असते. यातून आर्थिक विकासाला देखील हातभार लावता येतो. तसेच बाजरीलादेखील मागणी आहे. बाजरीच्या भाकरी पौष्टिक असल्याने ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातदेखील मागणी वाढली आहे. त्यामुळे येत्या काळात योग्य नियोजन केल्यास आर्थिक उन्नती होऊ शकते.