शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कापूस वेचणीसाठी शेतमजुरांची वाणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:21 IST

कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने लाखमोलाचा कापूस झाडावरच फुटून लोंबकळू लागला आहे. यावर्षी दिवाळीत परप्रांतीय मजूर कापूस वेचणीसाठी येतील, अशी अपेक्षा होती.

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त : परजिल्ह्यांतून शेतमजुरांची आयात

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने लाखमोलाचा कापूस झाडावरच फुटून लोंबकळू लागला आहे. यावर्षी दिवाळीत परप्रांतीय मजूर कापूस वेचणीसाठी येतील, अशी अपेक्षा होती. मात्र मजूर न आल्याने शेतातील चांगल्या दर्जाचा कापूस फुटून नुकसान होत असल्याचे परिसरात दिसून येत आहे.गोवरी परिसरात यंदा कापूस लागवड क्षेत्र वाढले. मागील वर्षीही कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले होते. या कारणांमुळे चंद्रपूर जिल्हा कापूस उत्पादनात अग्रेसर मानला जातो. कापूस शेतकºयांचे नगदी पीक आहे. गेल्यावर्षी कापसाला बºयापैकी भाव होता. त्यामुळे शेतकºयांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात या पिकांची लागवड केली. दिवाळीच्या दिवसातच यावर्षी चांगला दर्जाचा कापूस फुटला. कापूस पिकांचेलागवड क्षेत्र मोठे असल्याने मजुरांशिवाय कापूस वेचणीला पर्याय उरला नाही. ५ ते ६ रुपये किलोप्रमाणे शेतमजूर कापूस वेचणी करत आहते. परंतु, यावर्षी मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने कापूस कसा वेचावा हा प्रश्न पुढे आला. मजुरांअभावी शेतातील कापूस फुटून लोंबकळायला लागला आहे. कापूस वेचणीसाठी मजुरांच्या शोधात घरून निघालेला शेतकरी रात्री उशिरापर्यंत घरी परतत आहेत. मात्र, मजूर मिळत नसल्याने शेतकरी आता हतबल झाला आहे.कापूस हा शेतकºयांसाठी नगदी पीक आहे. कापूस पिकांवर होणार खर्च मोठा असूनही शासनाने दिलेला हमीभाव अतिशय अल्प आहे. राज्य शासनाने ४ हजार ३५० रुपये हमीभाव जाहीर केला. या भावात शेतकºयांनी केलेला खर्चही भरून निघत नाही. या तोकड्या भावात शेतकरी कसा तग धरणार हा प्रश्न विचारला जात आहे. दिवस-रात्र हाडाची काडे करून शेती पिकविणाºया शेतकºयांच्या हाती शेवटी काहीच उरत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. कष्टकरी बापाला त्याने केलेल्या घामाचे दाम मिळत नाही. शेतकºयांच्या पाठीशी आज उभे राहायला सरकार तयार नाही. कापसाला यावर्षी कमी दर मिळाल्याने कवडीमोल भावात कापूस विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.यंदा विविध कीडरोगांनी कापसावर हल्ला केला होता. परिणामी, उत्पादनात मोठी घट होऊ शकते. त्यातच मजुरांची समस्या भेडसावू लागल्याने शेतीसाठी लावलेला खर्च निघणार की नाही, या प्रश्न परिसरातील शेतकरी धास्तावला आहे. शासनाने हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.खरेदीवर व्यापाºयांचे वर्चस्वशासनाने यावर्षी कापसाला ४ हजार ३५० रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र, खरेदीवर व्यापाºयांचे वर्चस्व असल्याने शेतकºयांची लूट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हमीभाव अतिशय तोकडा आहे. यातून लागवडीचा खर्चही भरून निघत नाही. शासनाने व्यापाºयांवर कारवाई केली पाहिजे.