शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
4
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
5
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
6
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
7
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
8
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
9
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
10
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
11
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
12
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
13
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
14
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
15
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
16
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
17
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
18
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
19
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

वेकोलिच्या रेती वाहतुकीमुळे पिके करपली

By admin | Updated: November 23, 2015 01:00 IST

चंद्रपूर वेकोलि क्षेत्रातील माना व नांदगाव कोळसा खाणीसाठी वर्धा नदीच्या कोलगाव घाटावरुन मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक केली जाते.

शेतकऱ्यांचे नुकसान : विसापूरकर आंदोलनाच्या पवित्र्यातबल्लारपूर : चंद्रपूर वेकोलि क्षेत्रातील माना व नांदगाव कोळसा खाणीसाठी वर्धा नदीच्या कोलगाव घाटावरुन मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक केली जाते. यामुळे नांदगाव (पोडे) विसापूर ते नदी घाटापर्यंतच्या रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वेकोलि प्रशासनाने शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी रेतीची वाहतूक बंद करण्याची मागणी विसापूर ग्रामपंचायतीने केली आहे.विसापूर ते कोलगाव नदी घाट मार्ग कच्चा असून तीन किमीचा ग्रामीण मार्ग आहे. या मार्गावर वेकोलिच्या माना खुली कोळसा व नांदगाव इनक्वालाईन कोळसा खाणीला लागणारी रेती जडवाहनाच्या माध्यमातून वाहतूक केली जाते. परिणामी ८ ते १० टन क्षमतेचा मार्ग दुप्पट टनाच्या वाहतुकीमुळे खाचखळग्याचा झाला आहे. यामार्गाने दररोज २५ ते ३० जडवाहने रेतीची अहोरात्र वाहतूक करतात. यामुळे रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांचे शेतातील पीक धुळीने करपले जात आहे.मागील सात-आठ वर्षापासून वेकोलि प्रशासन कंत्राटदाराच्या माध्यमातून वर्धा नदीच्या कोलगाव घाटाच्या नदीच्या पात्रातून रेतीचे उत्खनन करीत आहे. तेव्हापासून विसापूर ग्रामपंचायतीने वेकोलि व जिल्हा प्रशासनाकडे विसापूर ते कोलगाव वर्धा नदीपर्यंत रस्त्याला डांबरीकरण करुन मजबुतीकरणाची सातत्याने मागणी करीत आहे. निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाचा उंबरठा झिजवत आहे. मात्र गावकऱ्यांच्या मागणीकडे आजतागायत दुर्लक्ष करण्याचे धोरण प्रशासनाने अवलंबिले आहे. आता तर विसापूरकरांनी आंदोलन करुन रेती वाहतूक बंद करण्याचा सज्जड इशारा प्रशासनाला दिला आहे.विशेष म्हणजे, चंद्रपूरच्या वेकोलि प्रशासनाने माना कोळसा खाणीला सुराणा नामक कंत्राटदाराच्या माध्यमातून रेतीचा पुरवठा केला जातो. नांदगाव कॉलरीला मुलचंद नावाचा कंत्राटदार रेतीची वाहतूक करतो. सदर कंत्राटदारांनी नियमाला डावलून जेसीबी मशिनद्वारे वर्धानदीच्या पात्रातून रेतीचे उत्खनन सुरु केले आहे. आजघडीला कोलगाव घाटावर दोन जेसीबी मशीन उत्खननासाठी तैनात असून नदीच्या पात्रात ठिकठिकाणी खोल खड्डे करण्याचे पातक कंत्रासदार करीत आहेत. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.विसापूर ते वर्धा नदी कोलगाव घाट रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण झाल्याशिवाय आणि लगतच्या शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीबाबत भरपाई वेकोलि व महसूल प्रशासनाने दिल्याशिवाय रेतीचे वाहतूक करु दिली जाणार नाही, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, विसापूरच्या सरपंच रिता जिलटे, उपसरपंच सुनिल रोंगे, सदस्य अशोक थेरे, नांदगाव (पोडे) येथील सरपंच प्रमोद देठे, माजी सरपंच गोविंदा पोडे, उपसरपंच मल्लेश कोडारी यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे. (शहर प्रतिनिधी)