शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

भिमलकुंड पसिरात पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 06:00 IST

या मार्गावर असलेली हिरवळ व धबधब्याचे सौंदर्य सर्वांनाच मोहीत करीत आहेत. सभोवताल हिरवे रान त्यामध्ये असलेल्या डोंगरमाथ्यावरून कोसळणारा धबधबा विलोभनीय आहे. पक्ष्यांचा किलबिलाट अन् खळाळणारा धबधबा मनाला भूरळ घालत आहे.

ठळक मुद्देनिसर्गरम्य स्थळ : यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटकांची पसंती

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना तालुक्यातील ‘सावलहिरा’ गावापासून चार किलोमीटर अंतरावर डोंगररांगात १५० फुट उंचीचा ‘भिमलकुंड’ धबधबा आहे. हा धबधबा आता ओसंडून वाहू लागला असून पर्यटनप्रेमी व ट्रेकर्ससाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मागील काही दिवसांमध्ये परिसर गर्दीने फुलला असून चंद्रपूरसह यवतमाळ जिल्ह्यातील पर्यटक येथे येत आहेत. या पर्यटन स्थळाचा विकास करून सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पर्यटकांनी केली आहे.येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. डोंगररांगातील हिरव्याकंच वनराईतून पायदळ वारी करत स्थळ गाठावे लागते. डोंगरदऱ्यांमुळे येथे एखादा व्यक्ती रस्ता सोडून भटकण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावर असलेली हिरवळ व धबधब्याचे सौंदर्य सर्वांनाच मोहीत करीत आहेत. सभोवताल हिरवे रान त्यामध्ये असलेल्या डोंगरमाथ्यावरून कोसळणारा धबधबा विलोभनीय आहे. पक्ष्यांचा किलबिलाट अन् खळाळणारा धबधबा मनाला भूरळ घालत आहे. येथील रानफुल सुगंधाची मुक्त हस्ताने उधळण करीत असतात. निसर्गाच्या या शावरखाली आंघोळ करण्याची मजा घेण्यासाठी पर्यटक येथे हजेरी लावत आहे.सुमारे १५० फुट उंच कडावरून कोसळणाऱ्या पाण्यांमुळे खाली जमिनीवर कुंड तयार झाला. या कुंडाला ‘भिमलकुंड’ म्हणून संबोधले जाते. या कुंडाचे रूप हे भीमासारखे भासत असल्यानेच याचे नाव ‘भिमलकुंड’ पडल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र येथील कडा उतरणे व चढणे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळेच या धबधब्याचा पर्यटनाचा दृष्टीने विकास करणे महत्त्वाचे आहे.या डोंगरावर विविध वनऔषधी वनस्पती आहे. येथील रस्त्याच्या कडेला आवळ्याच्या रांगा आहे. या धबधब्यालगतच्या परिसरात भस्म नागाची खोरी, रोहिणीमुंडा, जांभूळधराची झिरणे, बोदबोधी आदी पर्यटनस्थळेही असून येथेही पर्यटक जात असून निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटत आहेत.लालपहाडीपर्यंतच आहे रस्ताभिमलकुंड धबधबा येथे जाण्यासाठी दोन मार्ग आहे. पहिला सावलहिरा आणि दुसरा टांगाळा. यातील सावलहिरावरून जाताना येल्लापूर रस्त्यावर पहाड आहे. तिथून गोल घुमटांच्या दिशेने रस्त्यावरच दुचाकी ठेऊन पायदळ वारी करीत डोंगरमाथातून स्थळापर्यंत पोहचता येते. टांगाळा येथून नाल्या-नाल्याने सरळ दिशेने वर चढत जावे लागते. दोन्ही मार्गाने वाहनांने जाता येत नाही. ही वाहने लाल पहाडी किंवा टांगाळा येथेच ठेऊन पायदळ मार्गक्रमण करावे लागते.विकासाअभावी पर्यटकांची गैरसोयमाणिकगड पहाडालगत असलेल्या कोरपना व जिवती तालुक्यात अनेक पर्यटनस्थळे आहे. मात्र ती उपेक्षित असून शासन दरबारी नोंदसुद्धा नाही. या स्थळांवर लक्ष केंद्रीत करून विकास करावा अशी मागणी पर्यटकांनी केली आहे. चौपाटी गुफा, काराई गोराई, कपिलाई भुयार, बानकदेवी आदी स्थळांचा विकास केल्यास पर्यटकांना दिलासा मिळेल.

टॅग्स :tourismपर्यटन