शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

भिमलकुंड पसिरात पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 06:00 IST

या मार्गावर असलेली हिरवळ व धबधब्याचे सौंदर्य सर्वांनाच मोहीत करीत आहेत. सभोवताल हिरवे रान त्यामध्ये असलेल्या डोंगरमाथ्यावरून कोसळणारा धबधबा विलोभनीय आहे. पक्ष्यांचा किलबिलाट अन् खळाळणारा धबधबा मनाला भूरळ घालत आहे.

ठळक मुद्देनिसर्गरम्य स्थळ : यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटकांची पसंती

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना तालुक्यातील ‘सावलहिरा’ गावापासून चार किलोमीटर अंतरावर डोंगररांगात १५० फुट उंचीचा ‘भिमलकुंड’ धबधबा आहे. हा धबधबा आता ओसंडून वाहू लागला असून पर्यटनप्रेमी व ट्रेकर्ससाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मागील काही दिवसांमध्ये परिसर गर्दीने फुलला असून चंद्रपूरसह यवतमाळ जिल्ह्यातील पर्यटक येथे येत आहेत. या पर्यटन स्थळाचा विकास करून सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पर्यटकांनी केली आहे.येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. डोंगररांगातील हिरव्याकंच वनराईतून पायदळ वारी करत स्थळ गाठावे लागते. डोंगरदऱ्यांमुळे येथे एखादा व्यक्ती रस्ता सोडून भटकण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावर असलेली हिरवळ व धबधब्याचे सौंदर्य सर्वांनाच मोहीत करीत आहेत. सभोवताल हिरवे रान त्यामध्ये असलेल्या डोंगरमाथ्यावरून कोसळणारा धबधबा विलोभनीय आहे. पक्ष्यांचा किलबिलाट अन् खळाळणारा धबधबा मनाला भूरळ घालत आहे. येथील रानफुल सुगंधाची मुक्त हस्ताने उधळण करीत असतात. निसर्गाच्या या शावरखाली आंघोळ करण्याची मजा घेण्यासाठी पर्यटक येथे हजेरी लावत आहे.सुमारे १५० फुट उंच कडावरून कोसळणाऱ्या पाण्यांमुळे खाली जमिनीवर कुंड तयार झाला. या कुंडाला ‘भिमलकुंड’ म्हणून संबोधले जाते. या कुंडाचे रूप हे भीमासारखे भासत असल्यानेच याचे नाव ‘भिमलकुंड’ पडल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र येथील कडा उतरणे व चढणे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळेच या धबधब्याचा पर्यटनाचा दृष्टीने विकास करणे महत्त्वाचे आहे.या डोंगरावर विविध वनऔषधी वनस्पती आहे. येथील रस्त्याच्या कडेला आवळ्याच्या रांगा आहे. या धबधब्यालगतच्या परिसरात भस्म नागाची खोरी, रोहिणीमुंडा, जांभूळधराची झिरणे, बोदबोधी आदी पर्यटनस्थळेही असून येथेही पर्यटक जात असून निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटत आहेत.लालपहाडीपर्यंतच आहे रस्ताभिमलकुंड धबधबा येथे जाण्यासाठी दोन मार्ग आहे. पहिला सावलहिरा आणि दुसरा टांगाळा. यातील सावलहिरावरून जाताना येल्लापूर रस्त्यावर पहाड आहे. तिथून गोल घुमटांच्या दिशेने रस्त्यावरच दुचाकी ठेऊन पायदळ वारी करीत डोंगरमाथातून स्थळापर्यंत पोहचता येते. टांगाळा येथून नाल्या-नाल्याने सरळ दिशेने वर चढत जावे लागते. दोन्ही मार्गाने वाहनांने जाता येत नाही. ही वाहने लाल पहाडी किंवा टांगाळा येथेच ठेऊन पायदळ मार्गक्रमण करावे लागते.विकासाअभावी पर्यटकांची गैरसोयमाणिकगड पहाडालगत असलेल्या कोरपना व जिवती तालुक्यात अनेक पर्यटनस्थळे आहे. मात्र ती उपेक्षित असून शासन दरबारी नोंदसुद्धा नाही. या स्थळांवर लक्ष केंद्रीत करून विकास करावा अशी मागणी पर्यटकांनी केली आहे. चौपाटी गुफा, काराई गोराई, कपिलाई भुयार, बानकदेवी आदी स्थळांचा विकास केल्यास पर्यटकांना दिलासा मिळेल.

टॅग्स :tourismपर्यटन