शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयात गर्दी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:01 IST

लॉकडाऊनमध्ये केवळ पाच टक्के कर्मचाऱ्यांच्या भरवशावर शासकीय कार्यालयाचे कामकाज चालवण्यात येत होते. त्यामुळे कोरोनाशी संबंधित कामेच सुरू होती. इतर सर्व कामे बंद असल्याने शासकीय कार्यालये जवळपास ओस पडले होते. जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयामध्ये प्रशासकीय बैठक तसेच इतर कामे केली जात होते. मात्र फारशी रेलचेल नव्हती.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांमध्ये भीती : अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचाही फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. लॉकडाऊनच्या चवथ्या टप्प्यात प्रशासनाने काही व्यवहाराला सूट दिली आहे. अनेक आस्थापनांना सुरू करण्याची परवानगी देत शासकीय कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची टक्केवारी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह कामानिमित्त येणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. परिणामी शासकीय कार्यालयात बरीच वर्दळ सुरू झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.लॉकडाऊनमध्ये केवळ पाच टक्के कर्मचाऱ्यांच्या भरवशावर शासकीय कार्यालयाचे कामकाज चालवण्यात येत होते. त्यामुळे कोरोनाशी संबंधित कामेच सुरू होती. इतर सर्व कामे बंद असल्याने शासकीय कार्यालये जवळपास ओस पडले होते. जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयामध्ये प्रशासकीय बैठक तसेच इतर कामे केली जात होते. मात्र फारशी रेलचेल नव्हती. परंतु लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शासनाने लॉकडाऊन बऱ्यापैकी शिथील केल्यामुळे तसेच प्रशासकीय कार्यालयातही कामकाज सुरु केल्याने कार्यालयातील उपस्थिती वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय कार्यालये विशेषत: जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय एवढेच नाही तर जिल्हा परिषदेमध्येही वर्दळ वाढली आहे. सद्या सर्वाधिक गर्दी ही शहर व इतर जिल्ह्यामध्ये ये-जा करण्यासाठी पास मिळवणाऱ्यांची होत आहे. या गर्दीमुळे कार्यालयातील अधिकारी, कर्मचारीही त्रस्त झाले आहेत.अधिकारी, कर्मचारी धास्तावलेचंद्रपूर जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालय तसेच जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये पासेससाठी गर्दी वाढल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा ताण वाढला आहे. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव तर होणार नाही ना, अशी भीतीही अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये पसरली आहे. उपाययोजना म्हणून सावधगिरी बाळगली जात असून सॅनिटायझर व मास्क घालून काम केले जात आहे.

टॅग्स :Governmentसरकार