शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शोकांतिकाच! सर्जा-राजाला विकून त्यांनी दिली शेतमजुरांची मजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2022 16:23 IST

पुरामुळे पिके गेली सडून; शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही

बाबूराव बोंडे

तोहोगाव (चंद्रपूर) : पूर आला आणि सर्व काही घेऊन गेला. यात बळीराजा मात्र पुरता संकटात सापडला आहे. एक नाही, दोन नाही तर तब्बल चार वेळी पेरणी केलेली सोयाबीन, कापूस, मिरची पिके भुईसपाट झाली. हे बघून बळीराजाच्या डोळ्यांत पाणी आले. गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील प्रदीप आनंदराव मोरे यांचे मिरचीचे पीक पुरामुळे शेतातच सडून गेले. मात्र लागवड करताना लावलेल्या मजुरांना मजुरी देण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांना आपली बैलजोडी विकून त्या पैशाने मजुरी द्यावी लागल्याची दुर्दैवी वेळ आली.

शेतकऱ्यांनी आलेल्या परिस्थितीचा सामना खंबीरपणे व न डगमगता करावा व आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये, यासाठी शासन शेतकऱ्यांसोबत आहे, असा गाजावाजा शासन वेळोवेळी करीत आला आहे. असे असले तरी खरी परिस्थिती उलट आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने संकटात कोणीच उभे राहत नाही, हे वारंवार दिसून आले आहे.

अतिवृष्टी, पुराने नासाडी झालेल्या पिकांची व पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा होईल अशी आशा होती. पदरी मात्र सध्या तरी निराशाच आली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव परिसरात वर्धा नदी समांतर वाहत असून पुराच्या पाण्याने अनेक गावे बाधित झाली आहेत. जुलैपासून वर्धा नदीला चार वेळा पूर आले. आधी सोयाबीन,कापूस, तूर, धान पिके गेली आणि आता मिरची व मूग पिके पुरात बुडाली.

शेतकऱ्यांनी शेती करण्यासाठी पीक कर्ज घेतले, कर्जबाजारी होत बियाणे, खते व औषधी घेऊन शेतीची पेरणी केली. पिके हिरवीगार झाली अन् बळीराजा सुखावला. सोयाबीन पीक हातात येणार अशातच, पुन्हा एकदा पुराचे सावट आले नाही. होत्याचे नव्हते झाले. या संकटात शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. आपली शेती उभी करण्यासाठी बळीराजाला आपली बैलजोडी विकावी लागली आणि मजुरी द्यावी लागल्याचे दुःख समस्त शेतकऱ्याच्या डोळ्यांत पाणी आणणारे आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीLabourकामगार