शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

शोकांतिकाच! सर्जा-राजाला विकून त्यांनी दिली शेतमजुरांची मजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2022 16:23 IST

पुरामुळे पिके गेली सडून; शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही

बाबूराव बोंडे

तोहोगाव (चंद्रपूर) : पूर आला आणि सर्व काही घेऊन गेला. यात बळीराजा मात्र पुरता संकटात सापडला आहे. एक नाही, दोन नाही तर तब्बल चार वेळी पेरणी केलेली सोयाबीन, कापूस, मिरची पिके भुईसपाट झाली. हे बघून बळीराजाच्या डोळ्यांत पाणी आले. गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील प्रदीप आनंदराव मोरे यांचे मिरचीचे पीक पुरामुळे शेतातच सडून गेले. मात्र लागवड करताना लावलेल्या मजुरांना मजुरी देण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांना आपली बैलजोडी विकून त्या पैशाने मजुरी द्यावी लागल्याची दुर्दैवी वेळ आली.

शेतकऱ्यांनी आलेल्या परिस्थितीचा सामना खंबीरपणे व न डगमगता करावा व आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये, यासाठी शासन शेतकऱ्यांसोबत आहे, असा गाजावाजा शासन वेळोवेळी करीत आला आहे. असे असले तरी खरी परिस्थिती उलट आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने संकटात कोणीच उभे राहत नाही, हे वारंवार दिसून आले आहे.

अतिवृष्टी, पुराने नासाडी झालेल्या पिकांची व पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा होईल अशी आशा होती. पदरी मात्र सध्या तरी निराशाच आली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव परिसरात वर्धा नदी समांतर वाहत असून पुराच्या पाण्याने अनेक गावे बाधित झाली आहेत. जुलैपासून वर्धा नदीला चार वेळा पूर आले. आधी सोयाबीन,कापूस, तूर, धान पिके गेली आणि आता मिरची व मूग पिके पुरात बुडाली.

शेतकऱ्यांनी शेती करण्यासाठी पीक कर्ज घेतले, कर्जबाजारी होत बियाणे, खते व औषधी घेऊन शेतीची पेरणी केली. पिके हिरवीगार झाली अन् बळीराजा सुखावला. सोयाबीन पीक हातात येणार अशातच, पुन्हा एकदा पुराचे सावट आले नाही. होत्याचे नव्हते झाले. या संकटात शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. आपली शेती उभी करण्यासाठी बळीराजाला आपली बैलजोडी विकावी लागली आणि मजुरी द्यावी लागल्याचे दुःख समस्त शेतकऱ्याच्या डोळ्यांत पाणी आणणारे आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीLabourकामगार