शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

पीक विमाचे जमा केले 296 कोटी शेतकऱ्यांना वाटणार फक्त 26 कोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 05:00 IST

विमा काढणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रीमियम म्हणून ७ कोटी ३६ लाख ७ हजार ६३० रुपयांची रक्कम विमा कंपन्यांकडे जमा केली. याशिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी  राज्य व केंद्र सरकारने प्रत्येकी १४ कोटी १२ लाख ८४ हजार ५६४ प्रमाणे २८ कोटी २५ लाख ६९ हजार १२८ आणि ग्रास प्रीमियम मिळून एकूण खरीप हंगामातील विम्याची रक्कम २९६ कोटी ५३ लाख ४२ हजार १९३ रुपये  विमा कंपन्यांकडे जमा केली आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री पीक विम्याचे वास्तव : शेतकऱ्यांना अल्प मोबदला, विमा कंपन्या मालामाल

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत जिल्ह्यात  खरीप २०२०-२१ मध्ये तब्बल २९६ कोटी ५३ लाख ४२ हजार १९३ हजारांची  रकम विमा (प्रीमियम) कंपन्यांकडे जमा करण्यात आली होती. परंतु, पीक नुकसानीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना फक्त २६ कोटी २५ लाख ८३ हजार ९२२ हजारांचीच रकम वाटण्यात येणार आहे. प्रत्यक्षात जमा आणि मोबदल्याच्या रकमेतील तफावत लक्षात घेतल्यास पीक विम्याच्या नावावर विमा कंपन्याच मालामाल होत आहेत. जिल्ह्यात भात लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. पण, दरवर्षी खरीप हंगामात कापूस, सोयाबीन व अन्य कडधान्य लागवडीचे क्षेत्र वाढताना दिसते.  शेतीवरचे संकट कायम असल्याने आर्थिक कोेंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेला पसंती                    दिली. गतवर्षी खरिपात तब्बल ९७ हजार ३४७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. कर्जदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता बँकेतूनच कापण्यात आला. पीक विमा अंतर्गत येणारे खरीप लागवडीचे क्षेत्र ६८ हजार ९५९ हेक्टरपर्यंत विस्तारले. विमा काढणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रीमियम म्हणून ७ कोटी ३६ लाख ७ हजार ६३० रुपयांची रक्कम विमा कंपन्यांकडे जमा केली. याशिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी  राज्य व केंद्र सरकारने प्रत्येकी १४ कोटी १२ लाख ८४ हजार ५६४ प्रमाणे २८ कोटी २५ लाख ६९ हजार १२८ आणि ग्रास प्रीमियम मिळून एकूण खरीप हंगामातील विम्याची रक्कम २९६ कोटी ५३ लाख ४२ हजार १९३ रुपये  विमा कंपन्यांकडे जमा केली आहे.  

५१ हजार १५० शेतकरी पीक विम्यातून बाद आतापर्यंत १० हजार ३२७ शेतकऱ्यांना ३ कोटी ४० लाख ५३ हजार ३१२ रुपयांचा विमा मोबदला वाटप करण्यात आला. जिल्ह्यातून ९७ हजार ३४७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यापैकी ४६ हजार १९७ लाभास पात्र ठरले, तर ५१ हजार १५० शेतकरी विम्यातून बाद झाले आहेत. 

केंद्र सरकारने बदलावी नियमावलीविमा कंपन्या शेतकऱ्यांकडून मोठी रकम जमा करतात. मात्र, पुरेसा मोबदला देत नाही. याबाबत राज्य सरकारने केंद्राकडे सुधारणा करण्याची मागणी केली. मात्र, अद्याप दखल घेण्यात आली नाही. केंद्राने नियमावली बदलविली तरच विमा कंपन्यांची नफेखोरी संपू शकेल, असे जाणकारांचे मत आहे.

विमा कंपनी व कृषी विभागावर शेतकऱ्यांचा रोष विम्यासाठी पात्र ठरलेले शेतकरी व मंजूर भरपाईच्या रकमेची माहिती संबंधित विमा कंपन्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला सादर केली. त्यानुसार, पीक विमा हक्काची २६ कोटी २५ लाख ८३ हजार ९२२ रुपयांची रकम ४६ हजार १९७ शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. उत्पन्नावर हक्क रक्कम अंतर्गत ४५ हजार ९९३ शेतकरी पात्र ठरले. विमा काढणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. मात्र, निकषात पात्र ठरलेल्यांनाच लाभ मिळते, असे सांगितले जाते. त्यामुळे विमा कंपनी व कृषी विभागावर शेतकरी रोष व्यक्त करतात.

२५५ शेतकऱ्यांनाच स्थानिक आपत्तींतर्गत लाभ  स्थानिक आपत्तींतर्गत पिकांचे नुकसान झालेल्या २५५ शेतकऱ्यांनाच विम्याचा लाभ मिळणार आहे. मीड टर्म नुकसान श्रेणीत १४ हजार ७० शेतकरी आणि काढणीनंतर नुकसान झालेल्या श्रेणीत ११७ शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत.   

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेती