शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

पीक विमाचे जमा केले 296 कोटी शेतकऱ्यांना वाटणार फक्त 26 कोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 05:00 IST

विमा काढणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रीमियम म्हणून ७ कोटी ३६ लाख ७ हजार ६३० रुपयांची रक्कम विमा कंपन्यांकडे जमा केली. याशिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी  राज्य व केंद्र सरकारने प्रत्येकी १४ कोटी १२ लाख ८४ हजार ५६४ प्रमाणे २८ कोटी २५ लाख ६९ हजार १२८ आणि ग्रास प्रीमियम मिळून एकूण खरीप हंगामातील विम्याची रक्कम २९६ कोटी ५३ लाख ४२ हजार १९३ रुपये  विमा कंपन्यांकडे जमा केली आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री पीक विम्याचे वास्तव : शेतकऱ्यांना अल्प मोबदला, विमा कंपन्या मालामाल

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत जिल्ह्यात  खरीप २०२०-२१ मध्ये तब्बल २९६ कोटी ५३ लाख ४२ हजार १९३ हजारांची  रकम विमा (प्रीमियम) कंपन्यांकडे जमा करण्यात आली होती. परंतु, पीक नुकसानीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना फक्त २६ कोटी २५ लाख ८३ हजार ९२२ हजारांचीच रकम वाटण्यात येणार आहे. प्रत्यक्षात जमा आणि मोबदल्याच्या रकमेतील तफावत लक्षात घेतल्यास पीक विम्याच्या नावावर विमा कंपन्याच मालामाल होत आहेत. जिल्ह्यात भात लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. पण, दरवर्षी खरीप हंगामात कापूस, सोयाबीन व अन्य कडधान्य लागवडीचे क्षेत्र वाढताना दिसते.  शेतीवरचे संकट कायम असल्याने आर्थिक कोेंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेला पसंती                    दिली. गतवर्षी खरिपात तब्बल ९७ हजार ३४७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. कर्जदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता बँकेतूनच कापण्यात आला. पीक विमा अंतर्गत येणारे खरीप लागवडीचे क्षेत्र ६८ हजार ९५९ हेक्टरपर्यंत विस्तारले. विमा काढणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रीमियम म्हणून ७ कोटी ३६ लाख ७ हजार ६३० रुपयांची रक्कम विमा कंपन्यांकडे जमा केली. याशिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी  राज्य व केंद्र सरकारने प्रत्येकी १४ कोटी १२ लाख ८४ हजार ५६४ प्रमाणे २८ कोटी २५ लाख ६९ हजार १२८ आणि ग्रास प्रीमियम मिळून एकूण खरीप हंगामातील विम्याची रक्कम २९६ कोटी ५३ लाख ४२ हजार १९३ रुपये  विमा कंपन्यांकडे जमा केली आहे.  

५१ हजार १५० शेतकरी पीक विम्यातून बाद आतापर्यंत १० हजार ३२७ शेतकऱ्यांना ३ कोटी ४० लाख ५३ हजार ३१२ रुपयांचा विमा मोबदला वाटप करण्यात आला. जिल्ह्यातून ९७ हजार ३४७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यापैकी ४६ हजार १९७ लाभास पात्र ठरले, तर ५१ हजार १५० शेतकरी विम्यातून बाद झाले आहेत. 

केंद्र सरकारने बदलावी नियमावलीविमा कंपन्या शेतकऱ्यांकडून मोठी रकम जमा करतात. मात्र, पुरेसा मोबदला देत नाही. याबाबत राज्य सरकारने केंद्राकडे सुधारणा करण्याची मागणी केली. मात्र, अद्याप दखल घेण्यात आली नाही. केंद्राने नियमावली बदलविली तरच विमा कंपन्यांची नफेखोरी संपू शकेल, असे जाणकारांचे मत आहे.

विमा कंपनी व कृषी विभागावर शेतकऱ्यांचा रोष विम्यासाठी पात्र ठरलेले शेतकरी व मंजूर भरपाईच्या रकमेची माहिती संबंधित विमा कंपन्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला सादर केली. त्यानुसार, पीक विमा हक्काची २६ कोटी २५ लाख ८३ हजार ९२२ रुपयांची रकम ४६ हजार १९७ शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. उत्पन्नावर हक्क रक्कम अंतर्गत ४५ हजार ९९३ शेतकरी पात्र ठरले. विमा काढणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. मात्र, निकषात पात्र ठरलेल्यांनाच लाभ मिळते, असे सांगितले जाते. त्यामुळे विमा कंपनी व कृषी विभागावर शेतकरी रोष व्यक्त करतात.

२५५ शेतकऱ्यांनाच स्थानिक आपत्तींतर्गत लाभ  स्थानिक आपत्तींतर्गत पिकांचे नुकसान झालेल्या २५५ शेतकऱ्यांनाच विम्याचा लाभ मिळणार आहे. मीड टर्म नुकसान श्रेणीत १४ हजार ७० शेतकरी आणि काढणीनंतर नुकसान झालेल्या श्रेणीत ११७ शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत.   

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेती