शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

पीक काळवंडले अन् जनावरही !

By admin | Updated: December 3, 2014 22:46 IST

कर्नाटका एम्टा कंपनीच्या कोळसा धुळीच्या प्रदूषणरुपी राक्षसाने कोंढा ते चालबर्डी परिसरातील शेतपिक व जनावरांनाही सोडले नाही. धुळीच्या कणांचा शेतजमिनीवर परिणाम होत असल्याने जमिनीची

सचिन सरपटवार/ गणेश ठमके - कोंढा (भद्रावती)कर्नाटका एम्टा कंपनीच्या कोळसा धुळीच्या प्रदूषणरुपी राक्षसाने कोंढा ते चालबर्डी परिसरातील शेतपिक व जनावरांनाही सोडले नाही. धुळीच्या कणांचा शेतजमिनीवर परिणाम होत असल्याने जमिनीची उत्पादन क्षमता घटली आहे. तसेच उभ्या पिकांची नासाडी होत आहे. यासोबतच जनावरांवरही वाईट परिणाम होत आहे. कोंढाफाटा ते चालबर्डी पर्यंत जवळपास ३४ शेतकऱ्यांची शेती आहे. कोळसा धुळीच्या कणांमुळे ही शेती पूर्णपणे धुळीस मिळाली आहे. ज्या शेतीत किमान हेक्टरी १५ ते २० क्विंटल कापूस उत्पादन होत होते. त्या शेतात जेमतेम पाच क्विंटलही कापूस होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कापसाचे पीक पूर्णपणे काळे झाले आहे. कापसाला भाव मिळत नाही, सोयाबिनचीही परिस्थिती तशीच आहे. जे शेतकरी फक्त शेतीवरच अवलंबून आहे, त्याची परिस्थिती दयनिय झाली असून जगावे तर कसे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. काळ्याकुट्ट शेताकडे पाहिले तर भिती वाटते, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. फक्त राजकीय नेत्यांच्या जवळच्या लोकांना नुकसानभरपाई मिळत असल्याचे कोंढवासीय सांगतात. आजपर्यंत तिघांना ही नुकसान भरपाई मिळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.धुळीच्या कणांचा वाईट परिणाम जनावरांवरही होत आहे. सतत शरीरावर जमा होत असलेल्या कोळशाच्या धुळीमुळे जनावर काळवंडले आहे. पाण्यामध्ये तसेच जनावरांच्या चाऱ्यामध्ये धुळीचे कण पसरल्याने जनावरांमध्ये विविध आजार निर्माण झाले आहे. योग्य त्या चाऱ्याअभावी जनावरांमधील प्रजजन क्षमता कमी होत आहे. जनावरांना योग्य तो औषध व चारा मिळेनासा झाला आहे. श्वसनाचे, कातडीचे आजार जनावरांमध्ये निर्माण झाले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात येथील सचिन काळे यांचा बैल जखमी झाला होता. पोपटे यांचा गोऱ्हा मरण पावला तर कृष्णा थेरे व कुशाल नागपूरे यांच्या जनावरांचा अपघात झाला होता. या गंभीर प्रकरणाकडे प्रशासन लक्ष देईल का? असा प्रश्न येथील नागरिकांचा आहे.