शहरं
Join us  
Trending Stories
1
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
2
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
3
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
4
बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
5
कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ
6
‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...
7
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?
8
Helicopter Crash: गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार
9
Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा
10
"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
11
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
12
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
13
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
14
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
15
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
16
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
17
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
18
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
19
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
20
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी

पीक काळवंडले अन् जनावरही !

By admin | Updated: December 3, 2014 22:46 IST

कर्नाटका एम्टा कंपनीच्या कोळसा धुळीच्या प्रदूषणरुपी राक्षसाने कोंढा ते चालबर्डी परिसरातील शेतपिक व जनावरांनाही सोडले नाही. धुळीच्या कणांचा शेतजमिनीवर परिणाम होत असल्याने जमिनीची

सचिन सरपटवार/ गणेश ठमके - कोंढा (भद्रावती)कर्नाटका एम्टा कंपनीच्या कोळसा धुळीच्या प्रदूषणरुपी राक्षसाने कोंढा ते चालबर्डी परिसरातील शेतपिक व जनावरांनाही सोडले नाही. धुळीच्या कणांचा शेतजमिनीवर परिणाम होत असल्याने जमिनीची उत्पादन क्षमता घटली आहे. तसेच उभ्या पिकांची नासाडी होत आहे. यासोबतच जनावरांवरही वाईट परिणाम होत आहे. कोंढाफाटा ते चालबर्डी पर्यंत जवळपास ३४ शेतकऱ्यांची शेती आहे. कोळसा धुळीच्या कणांमुळे ही शेती पूर्णपणे धुळीस मिळाली आहे. ज्या शेतीत किमान हेक्टरी १५ ते २० क्विंटल कापूस उत्पादन होत होते. त्या शेतात जेमतेम पाच क्विंटलही कापूस होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कापसाचे पीक पूर्णपणे काळे झाले आहे. कापसाला भाव मिळत नाही, सोयाबिनचीही परिस्थिती तशीच आहे. जे शेतकरी फक्त शेतीवरच अवलंबून आहे, त्याची परिस्थिती दयनिय झाली असून जगावे तर कसे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. काळ्याकुट्ट शेताकडे पाहिले तर भिती वाटते, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. फक्त राजकीय नेत्यांच्या जवळच्या लोकांना नुकसानभरपाई मिळत असल्याचे कोंढवासीय सांगतात. आजपर्यंत तिघांना ही नुकसान भरपाई मिळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.धुळीच्या कणांचा वाईट परिणाम जनावरांवरही होत आहे. सतत शरीरावर जमा होत असलेल्या कोळशाच्या धुळीमुळे जनावर काळवंडले आहे. पाण्यामध्ये तसेच जनावरांच्या चाऱ्यामध्ये धुळीचे कण पसरल्याने जनावरांमध्ये विविध आजार निर्माण झाले आहे. योग्य त्या चाऱ्याअभावी जनावरांमधील प्रजजन क्षमता कमी होत आहे. जनावरांना योग्य तो औषध व चारा मिळेनासा झाला आहे. श्वसनाचे, कातडीचे आजार जनावरांमध्ये निर्माण झाले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात येथील सचिन काळे यांचा बैल जखमी झाला होता. पोपटे यांचा गोऱ्हा मरण पावला तर कृष्णा थेरे व कुशाल नागपूरे यांच्या जनावरांचा अपघात झाला होता. या गंभीर प्रकरणाकडे प्रशासन लक्ष देईल का? असा प्रश्न येथील नागरिकांचा आहे.