शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

धान उत्पादक शेतकºयांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:49 IST

तळोधी (बा) अप्पर तालुक्यातील धान उत्पादक शेतकºयांच्या धानपिकावर यावर्षी मोठ्या प्रमाणात मावा, तुडतुडा, बेरड, करपा, लाल्या, गाद व अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे ....

ठळक मुद्देधान उत्पादनात घट : ब्रह्मपुरी तालुक्याचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (बा) : तळोधी (बा) अप्पर तालुक्यातील धान उत्पादक शेतकºयांच्या धानपिकावर यावर्षी मोठ्या प्रमाणात मावा, तुडतुडा, बेरड, करपा, लाल्या, गाद व अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे ह्या परिसरातील शेतकºयामध्ये कृषी विभागाने धान पिकांचे सर्वेक्षण करून रोगांना विषयी माहिती उपलब्ध करून न दिल्यामुळे व त्यांच्यामध्ये प्रशासना विरोधात असंतोष उफाळला असून नुकसानग्रस्त शेतकºयांच्या धानपिकांचे सर्वेक्षण करून नुकसान मागणी जोर धरत आहे.तळोधी (बा) हे पूर्व विदर्भातील धान पिकासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती असून या ठिकाणी चिमूर, नागभीड, सिंदेवाही, मेंडकी व परिसरातील अनेक गावातून धान्य विक्रीसाठी आयात केले जाते. मात्र ह्यावर्षी या परिसरात मोठ्या प्रमाणात धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे. या परिसरातील शेतकºयांनी विविध मार्गाने धान रोवणीसाठी कर्ज घेवून रोहणी केलेले होते. मात्र ऐनवेळी हातात येणारे धान पिकावर महागड्या औषधीची फवारणी करून सुद्धा त्यांचा काहीच परिणाम होत नसून पुर्णपणे धानपिक नष्ट होत आहे. मात्र शासन शेतकºयांना दिलासा म्हणून कर्जमाफी देवू असा प्रकारचे खोटे आश्वासन देत असून अजूनपर्यंत शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीचा एक रुपया सुद्धा जमा झालेला नाही. अशा प्रकारे दुहेरी संकटात शेतकरी आहे.रामपूर : सास्ती, धोपटाळा, कोलगाव, मानोली या भागात वेकोलीच्या कोळसा खाणी आहे. मात्र वेकोली बल्लारपूर क्षेत्रामार्फत पर्यावरणाचा कुठलाही विचार केला जात असून असंख्य प्रमाणात बांभुळीचे झाडे या भागात पसरले असून जंगली डुकरांचे वास्तव्य वाढले रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात डुकरांचा कळप शेतीत घुसून शेतीला पिकांचे अतोनात नुकसान करीत असून सदर भागातील हजारो शेतकरी आर्थिक संकटात येत आहे. या अगोदर वारंवार तक्रारी देऊन सुद्धा कृषी विभाग, वन विभाग यांनी केवळ पंचनामा करुन अडीचशे ती तीनशे रुपये हेक्टरीच नुकसान भेटले. असे सांगण्यात येत असून वेकोली प्रशासन निगरगट्ट झाले आहे. ते सुद्धा ऐकून घेत नाही आहे. अर्ध्याअधिक शेती ही वेकोलीच्या प्रदूषणाच्या विखाड्यात भेटली असून अर्ध्या शेतीच्या उत्पादनावर डुकरांनी हात साफ केला आहे. येथील शेतकºयांवर उपासमारीची वेळ येत आहे. १ मे रोजी सास्ती ग्रामपंचायतीत सहा टक्के नुसार ठराव घेऊन शेतकºयांचा विचार करीत नसेल तर कोळसा खाणी बंद करण्याचा ठरव घेण्यात आला होता. त्याचबरोबर कोलगाव ग्रामपंचायतीने आठ एक नुसार ठराव घेऊन खाण बंद करण्यात ग्रामसभेचा ठराव घेतला होता. मात्र त्या ठरावाची अंमलबजावणी करण्यास शासनाने नकार दिला आहे. करिता सदर भागातील शेतकºयांवर उपासमारीची वेळ आहे.मी तीन एकरात धान लावला. यावर माझे पन्नास हजार रुपये खर्च झाले. आता धानाची फसल अंतिम टप्प्यात आलेली असताना या धानावर विविध रोगांनी आक्रमण केलेले आहे. यामुळे माझे संपुर्ण फसल नष्ट झालेली आहे. आता मी धानपिकासाठी घेतलेले कर्ज कसे फेडू याची चिंता लागली आहे.- संजय तलमले,शेतकरी, तळोधी (बा)