शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

मामा तलावांच्या अस्तित्वावर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:56 IST

तंटामुक्त गाव समित्यांना आर्थिक बळ द्यावे नागभीड : महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावातील वातावरण विकासाभिमुख होऊ शकते. मात्र, ...

तंटामुक्त गाव समित्यांना आर्थिक बळ द्यावे

नागभीड : महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावातील वातावरण विकासाभिमुख होऊ शकते. मात्र, या समित्यांमध्ये राजकारण शिरायला नको. कोरोनाच्या पार्श्वभूमीव अनेक गावातील तंटामुक्त गाव समित्यांनी चांगले कार्य केले. त्यामुळे गृह विभागाने या समित्यांना आर्थिक व कायदेशीर बळ देण्याची मागणी नागरिकांनी केली.

सहकारी संस्थांसमोर कर्ज वसुलीचा प्रश्न

वरोरा : सहकारी संस्था बँकांनी कर्ज वितरण केले. मात्र, कोरोनामुळे वसुलीवर अनिष्ट परिणाम झाला. वसुलीच होत नसल्याने सहकारी संस्थांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशावेळी सरकारकडून निधीची आवश्यकता आहे. राज्य सरकारने धोरण तयार करून आर्थिक पॅकेज देण्याची मागणी सहकारी संस्थांनी निवेदनातून केली आहे.

नागभीड-वडसा मार्गावर नियमांचे उल्लंघन

ब्रह्मपुरी : नागभीड ते वडसा मार्गावर दररोज शेकडो आॅटो चालतात. नियमांचे उल्लंघन करून प्रवाशांना कोेंबून नेण्याच्या घटना सतत वाढत आहेत. मात्र, पोलिसांचे याकडे दुर्लक्ष असल्याने आॅटो चालकांची मनमानी वाढली. ब्रह्मपुरी येथून विविध कामांसाठी वडसा येथे जाणाºया नागरिकांची संख्या वाढली. परिवहन महामंडळाने या मार्गावर जादा बसेस सोडल्यास समस्या दूर होवू शकते.

दुर्गापूर-ऊर्जानगर मार्गावरगतिरोधक बनवा

चंद्रपूर : दुर्गापूर-ऊर्जानगर परिसरातून चंद्रपूर-ताडोबा मार्ग आहे. मात्र या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक बांधावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

जळाऊ लाकूड उपलब्ध करून द्यावे

सिंदेवाही : जंगल परिसरात असणारे ग्रामीण भागातील नागरिक स्वयंपाकासाठी जळाऊ लाकडांचा उपयोग करतात. पण, वनकायद्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. बºयाच कुटुंबांकडे सिलिंडर नाही. कोरोनामुळे श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेच्या निधीत कपात करण्यात आला. परिणामी, सिलिंडर वाटपाची योजना सध्या थंडबस्त्यात आहे. वन विभागाने नागरिकांची अडचण लक्षात घेऊन जळाऊ लाकूड उपलब्ध करून देण्याची मागणी तालुक्यातील वन परिसरातील नागरिकांनी केली आहे.

स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी

कोरपना : तालुक्यामध्ये बेरोजगारांची संख्या वाढली आहे. हाताला काम नसल्याने अनेक बेरोजगार वाम मार्गाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनामुळे नोकरभरती बंदी झाली. यातूनही बेरोजगारांची संख्या पुन्हा वाढणार वाढणार आहे. अशा कठीण काळात परिसरातील उद्योगांनी स्थानिक बेरोजगार युवकांनाच कामे देण्याची मागणी तालुक्यातील सरपंचांनी जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडे केली आहे.