शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
5
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
6
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
7
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
8
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
9
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
10
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
11
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
12
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
13
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
14
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
15
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
16
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
17
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
18
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

पावसाअभावी पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:23 IST

मागील १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने खरीप हंगामातील उत्पादन घटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सद्य:स्थितीत सोयाबीन पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र जमिनीतील ओलावा संपत असल्याने याच पिकाला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देदोन आठवड्यांपासून पाऊस बेपत्ता : सोयाबीनला सर्वाधिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने खरीप हंगामातील उत्पादन घटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सद्य:स्थितीत सोयाबीन पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र जमिनीतील ओलावा संपत असल्याने याच पिकाला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यामध्ये यंदा कापूस आणि सोयाबीन लागवड क्षेत्र वाढले. राजुरा, गोंडपिपरी जिवती, बल्लारपूर, कोरपना, भद्रावती, वरोरा आदी सात तालुक्यांमध्ये कापसासोबतच हजारो शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड केली. बहुतेक शेतकºयांनी गतवर्षीचे बियाणे टाळून नव्या संकरित बियाण्यांचा वापर केला. सोयाबीन झाड जोमाने बहरले. सध्या हे पीक दाणे भरण्याची अवस्थेत आहे. याच अवस्थेमध्ये सोयाबीनला पाण्याची अत्यंत गरज असते. परंतु दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने दाणे भरणार की नाही, अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहे. कापूस पिकावरही विविध कीडींनी आक्रमण केले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव कमी आहे. अनेक शेतकºयांनी बोंड अळीची लक्षणे दिसायला लागण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना केली होती. याचा बºयापैकी फायदा झाला आहे. हे पीक बोंड अळीपासून वाचले. पण पाण्याअभावी उत्पादनात घट होण्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत. उत्पन्न झाले नाही तर आर्थिक संकटांना सामोरे जाण्याची वेळ येणार आहे.जमिनीतील ओलावा संपू लागलासोयाबीनवर चार प्रकारच्या किडींचा प्रादूर्भाव झाला आहे. यासाठी जमिनीतील कमी झालेला ओलावा कारणीभूत असल्याचे कृषी अधिकाºयांनी सांगितले. पाने खाणारी अळी, उंट अळी, पाणे गुंडाळणारी अळी आणि चक्री भुंगेरे कीड्यांनी सोयाबीन झाडांवर आक्रमण केले. १० ते १५ दिवसांत पुरेसे पाणी मिळाले नाही तर या कीडींमुळे सोयाबीन फस्त होण्याचा धोका वर्तविला जात आहे.कृषी विभागाचा पीक अंदाज निघालाच नाहीयंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन कापूस व अन्य कडधान्यांचे हेक्टरी किती उत्पन्न होऊ शकते, याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून तीन टप्प्यांमध्ये काढला जातो. मात्र पहिल्या टप्प्यातीलच अंदाज अद्याप जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे यंदा नेमके किती उत्पन्न होणार, याविषयी कृषी विभागातच मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती