शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:23 IST

मागील १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने खरीप हंगामातील उत्पादन घटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सद्य:स्थितीत सोयाबीन पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र जमिनीतील ओलावा संपत असल्याने याच पिकाला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देदोन आठवड्यांपासून पाऊस बेपत्ता : सोयाबीनला सर्वाधिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने खरीप हंगामातील उत्पादन घटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सद्य:स्थितीत सोयाबीन पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र जमिनीतील ओलावा संपत असल्याने याच पिकाला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यामध्ये यंदा कापूस आणि सोयाबीन लागवड क्षेत्र वाढले. राजुरा, गोंडपिपरी जिवती, बल्लारपूर, कोरपना, भद्रावती, वरोरा आदी सात तालुक्यांमध्ये कापसासोबतच हजारो शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड केली. बहुतेक शेतकºयांनी गतवर्षीचे बियाणे टाळून नव्या संकरित बियाण्यांचा वापर केला. सोयाबीन झाड जोमाने बहरले. सध्या हे पीक दाणे भरण्याची अवस्थेत आहे. याच अवस्थेमध्ये सोयाबीनला पाण्याची अत्यंत गरज असते. परंतु दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने दाणे भरणार की नाही, अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहे. कापूस पिकावरही विविध कीडींनी आक्रमण केले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव कमी आहे. अनेक शेतकºयांनी बोंड अळीची लक्षणे दिसायला लागण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना केली होती. याचा बºयापैकी फायदा झाला आहे. हे पीक बोंड अळीपासून वाचले. पण पाण्याअभावी उत्पादनात घट होण्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत. उत्पन्न झाले नाही तर आर्थिक संकटांना सामोरे जाण्याची वेळ येणार आहे.जमिनीतील ओलावा संपू लागलासोयाबीनवर चार प्रकारच्या किडींचा प्रादूर्भाव झाला आहे. यासाठी जमिनीतील कमी झालेला ओलावा कारणीभूत असल्याचे कृषी अधिकाºयांनी सांगितले. पाने खाणारी अळी, उंट अळी, पाणे गुंडाळणारी अळी आणि चक्री भुंगेरे कीड्यांनी सोयाबीन झाडांवर आक्रमण केले. १० ते १५ दिवसांत पुरेसे पाणी मिळाले नाही तर या कीडींमुळे सोयाबीन फस्त होण्याचा धोका वर्तविला जात आहे.कृषी विभागाचा पीक अंदाज निघालाच नाहीयंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन कापूस व अन्य कडधान्यांचे हेक्टरी किती उत्पन्न होऊ शकते, याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून तीन टप्प्यांमध्ये काढला जातो. मात्र पहिल्या टप्प्यातीलच अंदाज अद्याप जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे यंदा नेमके किती उत्पन्न होणार, याविषयी कृषी विभागातच मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती