शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:23 IST

मागील १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने खरीप हंगामातील उत्पादन घटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सद्य:स्थितीत सोयाबीन पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र जमिनीतील ओलावा संपत असल्याने याच पिकाला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देदोन आठवड्यांपासून पाऊस बेपत्ता : सोयाबीनला सर्वाधिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने खरीप हंगामातील उत्पादन घटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सद्य:स्थितीत सोयाबीन पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र जमिनीतील ओलावा संपत असल्याने याच पिकाला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यामध्ये यंदा कापूस आणि सोयाबीन लागवड क्षेत्र वाढले. राजुरा, गोंडपिपरी जिवती, बल्लारपूर, कोरपना, भद्रावती, वरोरा आदी सात तालुक्यांमध्ये कापसासोबतच हजारो शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड केली. बहुतेक शेतकºयांनी गतवर्षीचे बियाणे टाळून नव्या संकरित बियाण्यांचा वापर केला. सोयाबीन झाड जोमाने बहरले. सध्या हे पीक दाणे भरण्याची अवस्थेत आहे. याच अवस्थेमध्ये सोयाबीनला पाण्याची अत्यंत गरज असते. परंतु दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने दाणे भरणार की नाही, अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहे. कापूस पिकावरही विविध कीडींनी आक्रमण केले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव कमी आहे. अनेक शेतकºयांनी बोंड अळीची लक्षणे दिसायला लागण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना केली होती. याचा बºयापैकी फायदा झाला आहे. हे पीक बोंड अळीपासून वाचले. पण पाण्याअभावी उत्पादनात घट होण्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत. उत्पन्न झाले नाही तर आर्थिक संकटांना सामोरे जाण्याची वेळ येणार आहे.जमिनीतील ओलावा संपू लागलासोयाबीनवर चार प्रकारच्या किडींचा प्रादूर्भाव झाला आहे. यासाठी जमिनीतील कमी झालेला ओलावा कारणीभूत असल्याचे कृषी अधिकाºयांनी सांगितले. पाने खाणारी अळी, उंट अळी, पाणे गुंडाळणारी अळी आणि चक्री भुंगेरे कीड्यांनी सोयाबीन झाडांवर आक्रमण केले. १० ते १५ दिवसांत पुरेसे पाणी मिळाले नाही तर या कीडींमुळे सोयाबीन फस्त होण्याचा धोका वर्तविला जात आहे.कृषी विभागाचा पीक अंदाज निघालाच नाहीयंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन कापूस व अन्य कडधान्यांचे हेक्टरी किती उत्पन्न होऊ शकते, याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून तीन टप्प्यांमध्ये काढला जातो. मात्र पहिल्या टप्प्यातीलच अंदाज अद्याप जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे यंदा नेमके किती उत्पन्न होणार, याविषयी कृषी विभागातच मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती