शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

शहर व गावाच्या स्वच्छतेसाठी युवकांचे गट तयार करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 22:29 IST

शहर व गावात खऱ्या अर्थाने स्वच्छता निर्माण करायची असेल तर, प्रत्येकाने जागृत राहिले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने विविध शाश्वत उपक्रम राबविण्यासाठी युवक व युवतींनी गट निर्माण करून सक्रिय कार्यासाठी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. जयश्रीया क्लबमध्ये पार पडलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देजितेंद्र पापळकर : स्वच्छता सर्वेक्षण कार्यशाळा
<p>लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहर व गावात खऱ्या अर्थाने स्वच्छता निर्माण करायची असेल तर, प्रत्येकाने जागृत राहिले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने विविध शाश्वत उपक्रम राबविण्यासाठी युवक व युवतींनी गट निर्माण करून सक्रिय कार्यासाठी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. जयश्रीया क्लबमध्ये पार पडलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) ओमप्रकाश यादव, उपक्रमाचे राज्य समन्वयक महेश कोडगीरे आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा शाश्वत स्वच्छता आराखडा निर्मिती व स्वच्छता सर्व्हेक्षण ग्रामीण या विषयातील विविध पैलुंविषयी विचारमंथन करण्यात आले. आराखड्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी चार पथक गठित करण्याचा निर्णयही योवळी घेण्यात आला़याशिवाय उपस्थितांच्या सुचनांना आराखड्यात स्थान देण्यात आले.कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण २०१८ ही मोहीम जिल्ह्यातील प्रत्येक गावात यशस्वी करण्यासाठी पीपीटीद्वारे सादरीकरण झाले़ मुख्य कार्यकारी अधिकारी पापळकर म्हणाले, शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना प्रोत्साहन दिल्यास उपक्रमात सहजपणे सहभागी होतात़याकरिता विविध सामाजिक संस्था, महिला बचतगट व युवक मंडळ व लोकप्रतिनिधींनी नागरिकांना प्रोत्साहन द्यावे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले़ उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी सर्वेक्षणाच्या प्रत्येक टप्प्याची माहिती दिली़ जिल्हा स्वच्छता सर्वेक्षणात अधिकाधिक गुण कसे प्राप्त करता येईल, याविषयीही मार्गदर्शन केले.दीर्घकालिन धोरण निश्चित करणारजि़ प़ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे म्हणाले, स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण ही मोहीम यशस्वी करायची असेल तर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनी लोकसहभागाकडे लक्ष द्यावे़ जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील सर्व सल्लागारांनी या मोहिमेत सहभागी होऊन गावकऱ्यांचा उत्साह वाढविला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले़ या कार्यशाळेच्या माध्यमातून शहर व सर्व गावे शाश्वत स्वच्छ करण्याची दिशा मिळाली़ याविषयीचे धोरण निश्चित करण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे़ दोन दिवशीय कार्यशाळेला जिल्ह्यातील ग्रामसेवक, सरपंच, विस्तार अधिकारी, बीआरसी,गटविकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी, सहायक गट विकास अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.