शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

देशात संविधानाची संस्कृती निर्माण करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:05 IST

भारतीय संविधानाने देशातील सर्वांना समान अधिकार प्रधान केले आहेत. या संविधानामुळेच आजही देश अखंड असून प्रत्येकांचे अधिकार सुरक्षित आहेत.

ठळक मुद्देजोगेंद्र कवाडे : मालेवाडा येथे धम्म मेळावा, असंख्य बौद्ध अनुयायांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमतचिमूर : भारतीय संविधानाने देशातील सर्वांना समान अधिकार प्रधान केले आहेत. या संविधानामुळेच आजही देश अखंड असून प्रत्येकांचे अधिकार सुरक्षित आहेत. संविधान हा देशाचा ग्रंथ आहे. तेव्हा देशात संविधानाची संस्कृती निर्माण करावे, असे आवाहन प्रा जोगेंद्र कवाडे यांनी केले.आम्रवन दीक्षाभूमी सुगतकुटी भिक्खु संघ संस्था व बौद्ध पंचकमिटी मालेवाडा यांच्या वतीने सुगतकुटी येथे दोन दिवशीय धम्म मेळावा नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून आ. कीर्तीकुमार भांगडिया, राजरतन कुंभारे, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष तथा गटनेते डॉ सतीश वारजूकर, पं.स. सभापती प्रज्ञा चौधरी, जि.प सदस्य गजानन बुटके, ममता घनश्याम डुकरे, प्रा. अशोक रामटेके, वसंता वारजूकर, धर्मा पाटील, जयंत गोरकार उपस्थित होते.दोन दिवसीय धम्म मेळावा व संविधान संस्कृती संमेलनात पहिल्या दिवशी समता सैनिक दलातर्फे पथसंचालन करण्यात आले. त्यानंतर पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करून बुद्ध, धम्म, संघ वंदना घेऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. व्दितीय सत्रात बुद्ध भीम गितांचा कार्यक्रम तर तृतीय सत्रात ‘संविधान संस्कृती समोरील आव्हाने’ या विषयावर परिसवांद पार पडला. यामध्ये जिदा भगत, जावेद खान, नंदा फुकट, बी.डी. नानवट, प्रा.भगवान नन्नावरे सहभागी झाले होते. तर दुसºया दिवशी सकाळी भिक्खू संघाची धम्मदेसना आदी कार्यक्रम पार पडले.यावेळी प्रा. कवाडे पुढे म्हणाले, मालेवाडा सुगतकुटीला तीर्थ स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करावा, त्यानंतर विकासासाठी निधी उपलब्ध करण्यास सुलभ होणार. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली नसती, तर देश आजपर्यत अखंड राहला नसता. देशाचे आज पन्नास तुकडे झाले असते. संस्काराने माणूस घडतो. तेव्हा डॉ. बाबासाहेब व भगवान बुद्धांचे विचार आई-वडिलांने मुलांना दयावे. धम्म मेळाव्यात आ. कीर्तीकुमार भांगडीया यांनी या भूमीचा गोंदेडा गुंफाच्या धर्तीवर विकास करण्याचा विश्वास दिला. याप्रसंगी डॉ. वारजुकर, जि.प.सदस्य गजानन बुटके यांचीही भाषणे झालीत. संचालन प्रकाश मेश्राम तर आभार एकनाथ गोंगले यांनी मानले.