शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अन्न सुरक्षा योजनेत घोळ

By admin | Updated: July 5, 2015 00:56 IST

अन्न सुरक्षा योजनेतून गरजुंना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे

शहरी नागरिक वंचित : ७६ टक्क्यांऐवजी १०० टक्के ग्रामीण भागातीलच लाभार्थीचंद्रपूर : अन्न सुरक्षा योजनेतून गरजुंना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या महत्त्वकांक्षी योजनेत बिपीएल कार्डधारक आणि ग्रामीण क्षेत्रातील ७६ टक्के एपीएल कार्डधारकांचा समावेश करण्यात यावा, असे शासकीय संकेत आहेत. असे असतानाही चंद्रपूर कार्यालयातील ग्रामीण पुरवठा निरीक्षकांनी कायदा धाब्यावर बसवून ग्रामीण भागातील १०० टक्के ए.पी.एल. कार्ड धारकांचा समावेश अन्न सुरक्षा योजनेत केला आहे. यासाठी प्रति कार्ड २०० रुपये स्वस्त धान्य दुकानदाराकडून वसूल करण्यात आल्याची माहिती आहे. अन्न सुरक्षा योजनेमध्ये चंद्रपूर तालुक्यातील फक्त ग्रामीण भागातील ए.पी.एल.कार्डधारकांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. वास्तविक ही योजना शहरी व ग्रामीण भागासाठी होती. परंतु शहरी भागातील एकही कार्ड या योजनेत समाविष्ट करण्यात आलेले नाही. ग्रामीण भागातील दुकानदार ए.पी.एल. कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याचे सांगून अन्न सुरक्षा योजनेतील शिल्लक राशन खुल्या बाजारात विकून खुलेआम काळा बाजार करीत आहे. सदर बाब तालुका निरीक्षक यांना माहिती असूनही ते याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा योजनेतील धान्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा करणाऱ्या ग्रामीण तालुका निरीक्षक व स्वस्त धान्य दुकानदाराची चौकशी केल्यास फार मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्यता आहे. सन २०१३ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने बीपीएल आणि एपीएल कार्डधारकांसाठी सवलतीच्या दरात धान्य पुरवठा करण्यासाठी अन्न सुरक्षा योजना सुरू केली. या महत्त्वकांक्षी योजनेत बिपीएल कार्डधारक आणि ग्रामीण क्षेत्रातील ७६ टक्के एपीएल कार्डधारकांचा समावेश करण्यात यावा, अशी स्पष्टपणे तरतूद करण्यात आली आहे. परंतु ही महत्त्वाकांक्षी योजना चंद्रपूर जिल्ह्यात काही भ्रष्ट अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदारांसाठी ‘कुरण’ ठरले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ असल्याचे समजते. ग्रामीण भागातील १०० टक्के एपीएल कार्ड अन्न सुरक्षा योजनेत नियमबाह्य समाविष्ट करण्यात आले असून यातून ग्रामीण तालुका निरीक्षकांनी मोठ्या प्रमाणात माया जमविल्याचा आरोप आर.टी.आय. कार्यकर्ते शिशुपाल रामटेके यांनी केला आहे. अन्न सुरक्षा योजनेतील समाविष्ट असलेल्या एपीएल कार्डधारकांचा धान्य साठा नियमितपणे दुकानदारांना वाटप करण्यात येतो. परंतु तो कार्डधारकांना विकण्याऐवजी जास्त दराने खुल्या बाजारात विकल्या जात असल्याने केंद्र सरकारच्या एका चांगल्या योजनेचा बट्ट्याबोळ चंद्रपूर जिल्ह्यात भ्रष्ट कर्मचाऱ्यामुळे झाला आहे. (शहर प्रतिनिधी)लाभार्थ्यांच्या धान्याची बाजारात विक्रीएपीएल कार्डधारकांचा जानेवारी २०१५ पासून धान्य कोटा थांबविण्यात आला आहे. ही बाब समोर करून ग्रामीण स्वस्त धान्य दुकानदार अन्न सुरक्षा योजनेतील एपीएल कार्डधारकांना ‘तुमच्या कार्डावरील धान्य बंद झाल्याचे सांगून त्यांच्या हक्काचे धान्य खुल्या बाजारात विकत आहेत. काही ठिकाणी एपीएल कार्डधारकांना धान्य दिले जाते. मात्र ते जादा दराने दिले जाते.