शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

वन्यप्राण्यांपासून रब्बी पिकांच्या संरक्षणासाठी करडई लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST

विज्ञानाची साथ, महत्वाकांक्षी विचार आणि उत्कृष्ट कार्य या त्रिसुत्रावर आधारीत सिंदेवाही तालुक्यातील २५०० लोकसंख्या असलेल्या मिनघरी या छोट्याशा गावामध्ये वेगवेगळे यशस्वी प्रयोग काही शेतकऱ्यांनी केले. यामध्ये शेताच्या बांध्यांमध्ये प्लॉस्टिक टाकून धानाचे रोवणे असो की धानाचे रोप लागवडीसाठी विविध तंत्रज्ञान असो.

ठळक मुद्देयशस्वी प्रयोग : मिनघरी येथे ५६ शेतकऱ्यांनी घेतला पुढाकार

दिलीप मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : खरिप पिकांबरोबरच तालुक्यात रब्बी पिकही मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. जंगली प्राण्यांचा हैदोस भरपूर असल्याने पिकांची नासाडी होते. त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी कृषी मित्र विलास गुरनुले यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे करडई या काटेरी पिकांच्या बियाण्याची मागणी केली होती. ती लगेच मान्य झाल्याने मिनघरी येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.विज्ञानाची साथ, महत्वाकांक्षी विचार आणि उत्कृष्ट कार्य या त्रिसुत्रावर आधारीत सिंदेवाही तालुक्यातील २५०० लोकसंख्या असलेल्या मिनघरी या छोट्याशा गावामध्ये वेगवेगळे यशस्वी प्रयोग काही शेतकऱ्यांनी केले. यामध्ये शेताच्या बांध्यांमध्ये प्लॉस्टिक टाकून धानाचे रोवणे असो की धानाचे रोप लागवडीसाठी विविध तंत्रज्ञान असो. असे अनेक प्रयोग येथे झाले आहेत. धानाचे उत्पादन व संपूर्ण पीक घरी येईपर्यंत येणारा खर्च यात बरीच तफावत असल्याने काही शेतकरी आत्महत्येकडे वळतात. मात्र कृषी मित्र विलास गुरनुले यांनी स्वत:च्या शेतामध्ये विविध नवनवीन प्रयोग करून जिल्हा कृषी अधिकारी यांच्यापासून वरिष्ठ कृषी क्षेत्रातील अधिकारी यांना मिनघरी गावाला भेट देण्यास प्रवृत्त केले, हे विशेष. अलिकडेच सर्वत्र मागणी असलेल्या ब्लॉक राईसची श्री पद्धतीने मंडल कृषी अधिकारी पि. के. मोतीकर आणि कृषीसेवक कोल्हापुरे यांच्या मार्गदश्रनात लागवड केली आणि ती यशस्वीही झाली.यासोबतच अलिकडे रब्बी पिकाच्या लागवडीला सुरूवात झाली असून परिसरात जंगली प्राण्यांचे वास्तव्य भरपूर असल्याने पिकाच्या नासाडीचा प्रश्न निर्माण झाला. मात्र ते प्रमाण कमी करायचे असेल तर इतर पिकांच्या सभोवताल करडई या काटेरी पिकाची लागवड केल्यास जंगली प्राण्यांपासून इतर पिकांचे संरक्षण होऊ शकते. ही संकल्पना समोर आल्यानंतर समृद्ध शेतकरी उन्नत शेती रब्बी पीक प्रयोगशाळा मेळाव्यात कृषी मित्र विलास गुरनुले यांनी जिल्हा कृषी अधिकारी उदय पाटील यांच्याकडे करडई पिकाचे बियाणे उपलब्ध करण्याची मागणी केली. आणि काही दिवसातच ती मान्य झाल्याने मिनघरी येथील ५६ शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासन, तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनात पेरणीसाठी तयारी केली आहे. यातून शेतकऱ्यांनी खचून न जाता कृषी तंत्रज्ञान पद्धतीने शेती केल्यास नक्कीच शेतकऱ्यांना उत्पादन खर्चामध्ये बचत करता येऊन उत्पन्न वाढीस हातभार लागणार असल्याचे कृषी मित्र विलास गुरनुले लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती