शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

वन्यप्राण्यांपासून रब्बी पिकांच्या संरक्षणासाठी करडई लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST

विज्ञानाची साथ, महत्वाकांक्षी विचार आणि उत्कृष्ट कार्य या त्रिसुत्रावर आधारीत सिंदेवाही तालुक्यातील २५०० लोकसंख्या असलेल्या मिनघरी या छोट्याशा गावामध्ये वेगवेगळे यशस्वी प्रयोग काही शेतकऱ्यांनी केले. यामध्ये शेताच्या बांध्यांमध्ये प्लॉस्टिक टाकून धानाचे रोवणे असो की धानाचे रोप लागवडीसाठी विविध तंत्रज्ञान असो.

ठळक मुद्देयशस्वी प्रयोग : मिनघरी येथे ५६ शेतकऱ्यांनी घेतला पुढाकार

दिलीप मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : खरिप पिकांबरोबरच तालुक्यात रब्बी पिकही मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. जंगली प्राण्यांचा हैदोस भरपूर असल्याने पिकांची नासाडी होते. त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी कृषी मित्र विलास गुरनुले यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे करडई या काटेरी पिकांच्या बियाण्याची मागणी केली होती. ती लगेच मान्य झाल्याने मिनघरी येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.विज्ञानाची साथ, महत्वाकांक्षी विचार आणि उत्कृष्ट कार्य या त्रिसुत्रावर आधारीत सिंदेवाही तालुक्यातील २५०० लोकसंख्या असलेल्या मिनघरी या छोट्याशा गावामध्ये वेगवेगळे यशस्वी प्रयोग काही शेतकऱ्यांनी केले. यामध्ये शेताच्या बांध्यांमध्ये प्लॉस्टिक टाकून धानाचे रोवणे असो की धानाचे रोप लागवडीसाठी विविध तंत्रज्ञान असो. असे अनेक प्रयोग येथे झाले आहेत. धानाचे उत्पादन व संपूर्ण पीक घरी येईपर्यंत येणारा खर्च यात बरीच तफावत असल्याने काही शेतकरी आत्महत्येकडे वळतात. मात्र कृषी मित्र विलास गुरनुले यांनी स्वत:च्या शेतामध्ये विविध नवनवीन प्रयोग करून जिल्हा कृषी अधिकारी यांच्यापासून वरिष्ठ कृषी क्षेत्रातील अधिकारी यांना मिनघरी गावाला भेट देण्यास प्रवृत्त केले, हे विशेष. अलिकडेच सर्वत्र मागणी असलेल्या ब्लॉक राईसची श्री पद्धतीने मंडल कृषी अधिकारी पि. के. मोतीकर आणि कृषीसेवक कोल्हापुरे यांच्या मार्गदश्रनात लागवड केली आणि ती यशस्वीही झाली.यासोबतच अलिकडे रब्बी पिकाच्या लागवडीला सुरूवात झाली असून परिसरात जंगली प्राण्यांचे वास्तव्य भरपूर असल्याने पिकाच्या नासाडीचा प्रश्न निर्माण झाला. मात्र ते प्रमाण कमी करायचे असेल तर इतर पिकांच्या सभोवताल करडई या काटेरी पिकाची लागवड केल्यास जंगली प्राण्यांपासून इतर पिकांचे संरक्षण होऊ शकते. ही संकल्पना समोर आल्यानंतर समृद्ध शेतकरी उन्नत शेती रब्बी पीक प्रयोगशाळा मेळाव्यात कृषी मित्र विलास गुरनुले यांनी जिल्हा कृषी अधिकारी उदय पाटील यांच्याकडे करडई पिकाचे बियाणे उपलब्ध करण्याची मागणी केली. आणि काही दिवसातच ती मान्य झाल्याने मिनघरी येथील ५६ शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासन, तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनात पेरणीसाठी तयारी केली आहे. यातून शेतकऱ्यांनी खचून न जाता कृषी तंत्रज्ञान पद्धतीने शेती केल्यास नक्कीच शेतकऱ्यांना उत्पादन खर्चामध्ये बचत करता येऊन उत्पन्न वाढीस हातभार लागणार असल्याचे कृषी मित्र विलास गुरनुले लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती