शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनावर देश चालत नाही

By admin | Updated: November 29, 2014 01:08 IST

केवळ आश्वासन देत सामान्य लोकांची पिळवणूक करण्यासाठी भाजप सरकार सत्तेवर आले आहे. सरकारला खाली खेचण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे.

चंद्रपूर : केवळ आश्वासन देत सामान्य लोकांची पिळवणूक करण्यासाठी भाजप सरकार सत्तेवर आले आहे. सरकारला खाली खेचण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. केवळ आश्वासनावर हा देश चालणार नाही, दारूबंदीच्या निर्णयाचे काय झाले, असा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांना विचारला असता आम्ही एप्रिलपर्यंत करू असे उत्तर मिळत आहे. मग ज्यांनी एका महिन्यात दारू बंदी करू असे आश्वासन दिले त्यांचे काय, असे मत काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.आमदार विजय वडेट्टीवार यांची कांँग्रेसच्या उपगटनेतेपदी निवड झाल्याबद्दल व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याकरिता चंद्रपुरात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.यावेळी महिला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रांतीय उपाध्यक्षा रजनीताई हजारे, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला जिल्हाध्यक्ष संगीता अमृतकर, सभापती रामू तिवारी, काँग्रेस गटनेते संतोष लहामगे, महामंत्री इंटक के.के. सिंग, माजी जिल्हाध्यक्ष विनोद दत्तात्रय, अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष आबीद अली, अ‍ॅड. प्रमोद आनंद, रोशन पचारे, शिवाराव सचिन कत्याल, कुणाल चहारे, विकास टिपले, छोटू शेख, दुर्र्गेश कोडाम, राजेश अडूर, करीललाला काजी आदी उपस्थित होते. याप्रसंगी आमदार विजय वडेट्टीवार यांनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला. याप्रसंगी विनोद दत्तात्रेय, आबीद अली, के.के. सिंग, दिनेश चोखारे, संगीता अमृतकर, रजनीताई हजारे यांनीही मार्गदर्शन केले.आता काँगेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकत्र येण्याची वेळ आहे. गावागावातील कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले पाहिजे, असेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले. प्रास्ताविक अ‍ॅड. प्रमोद आनंद यांनी केले. संंचालन प्राचार्य नरेंद्र बोबडे तर आभार एनएसयुआय अध्यक्ष कृणाल चहारे यांनी मानले. कार्यक्रमाला चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, सावली, वरोरा, चिमूर, राजुरा, जिवती, कोरपना, पोंभूर्णा इत्यादी तालुक्यातून कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)विकास करण्याची मागणी पेंढरी (कोके) : गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या त्रिसुत्रीचा समावेश केला जातो. परंतु मागील काही वर्षांपासून एकही विकासकामे मार्गी न लागल्यामुळे नागरिकांत नाराजी आहे.