शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

९२ ग्रामपंचायतींसाठी पार पडले शांततेत मतदान; आज मतमोजणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2022 10:51 IST

सरपंचाची थेड निवडणूक असल्याने सर्वांचे लक्ष

चंद्रपूर : जिल्ह्यातील भद्रावती, चिमूर, मूल, जिवती, कोरपना, राजुरा आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील ९२ ग्रामपंचायतींसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार ६१.५० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, जिवती तालुक्यातील दोन ग्रामपंचायती अविरोध निवडून आल्या आहेत.

यावेळी थेट जनतेतून सरपंचाची निवड होणार असल्याने जिल्ह्यातील नागरिकांचे याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, सोमवारी तालुकास्थळी मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी तहसील कार्यालय परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आज मतमोजणी

९२ ग्रामपंचायतींची निवडणूक रविवारी शांततेत पार पडली. दरम्यान, सोमवारी मतमोजणी होणार आहे. यासाठी तालुका प्रशासनांनी तयारी केली आहे. या निवडणुकीची प्रचंड उत्सुकता असून थेट सरपंचाची निवडणूक होत असल्याने मोठी रंगत आली आहे. त्यामुळे आता सर्वांचे निकालाकडे लक्ष लागले आहे.

दोन ग्रामपंचायती बिनविरोध

जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. यातील दोन ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध पार पडली. यामध्ये जिवती तालुक्यातील पिटीगुटी नं. २ आणि चिमूर तालुक्यातील नवीन जामनी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

२८१ मतदान केंद्र

जिल्ह्यातील ९२ ग्रामपंचायतींसाठी २८१ मतदान केंद्र होती. यासाठी १ लाख १३ हजार ६९१ मतदार होते. दरम्यान, दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६१.५० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

बिबीत मतदान यंत्राची गती मंदावली

कोरपना तालुक्यातील गट ग्रामपंचायत बिबी येथे मतदान यंत्राची गती मंदावल्याची स्थिती होती. सायंकाळी ५:३० वाजल्यानंतरही जवळपास २०० मतदार रांगेत उभे होते. दरम्यान, बिबी येथे वॉर्ड क्र.२ मध्ये माजी सरपंच व उपसरपंच राहिलेले शेतकरी संघटनेचे संतोषकुमार पावडे व माजी उपसरपंच तसेच युवक काॅंग्रेसचे प्रा. आशिष देरकर या मामा-भाचाने एकमेकांविरुद्ध निवडणूक लढविली. यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक