शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

By admin | Updated: November 22, 2015 00:54 IST

यंदा निसर्गाने साथ न दिल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

निसर्गाची अवकृपा : वेचणीच्या दरात वाढ, भाव मात्र जैसे थेराजुरा : यंदा निसर्गाने साथ न दिल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने हमी भावात प्रसाद रूपात फक्त ५० रुपये वाढ केली. वेचणीसाठी मजुराची कमतरता असल्यामुळे नाईलाजास्तव ८ रुपये दराने वेचणी करावी लागत आहे. निसर्गाची अवकृपा झाली, पावसाने साथ दिली नाही. अती उष्णतेमुळे कापूस झाडाची वाढ झाली नाही. झाडांना बोंडाची लागण नाही. उच्च प्रतीचे बियाणे व फवारणी औषधीचा वापर करून सुद्धा उत्पादनाची जैसे थे स्थिती असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.यावर्षी सरासरी पेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला. पावसाने दडी मारली व सूर्याने आग ओकणे सुरू केले. त्यामुळे जमिनीतील ओलावा संपुष्टात आला. निसर्गाच्या पावसावर अवलंबून असलेले शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. मजुरांची कमतरता असल्यामुळे वेचणी झाली नाही. पहिल्या वेचणीचा कापूस झाडावर लोंबकाडत आहे. सधन व धनदांडग्या शेतकऱ्यांनी परगावातील मजुरांना ८ रुपये प्रती किलो वेचणीचा दर व येण्याजाण्यासाठी वाहन उपलब्ध करून घरातून घेणे व घरात पोहोचविणे अशा अटीवर कापसाची वेचणी करून घ्यावी लागत आहे. याचा परिणाम उत्पादन खर्चावर मोठी वाढ झाली आहे. त्या मोबदल्यात हमी भावात फक्त ५० रुपये वाढ दिली आहे. त्यातही अद्याप पावतो शासनाचे कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेपोटी खाजगी व्यापारीस पडत्या दरात ३ हजार ८०० रुपयात कापूस विकून गरज भागवावी लागत आहे.बियाणे व औषधी, खत यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली. मजुरांच्या मजुरीत वाढ झाली त्या तुलनेत कापसाच्या भावात वाढ झाली नाही. शासनकर्त्यांनी निवडणुकीत शेतकऱ्यांना व शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे सांगून उत्पादन खर्चानुसार दरात वाढ करण्याचे म्हटले होते. परंतु, प्रत्यक्षात तसे केले नाही. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे.पुरेसा पाऊस न पडल्यामुळे खरीप पीक संकटात आहे. जमिनीत ओलावा नाही. सूर्य आग ओकत आहे. शेतीचा पिकावर जीवन जगणारे शेतकरी हतबल झाला आहे. काय करावे, कसे करावे, कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, बँकेच्या कर्जाची परतफेड कशाने करावी असे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. एकरी ८-१० क्विंटल होणारा कापूस २-३ क्विंटलवर आला आहे. यंदा कापसाचे उत्पादन ५० टक्के पेक्षा कमी झाले आहे. कापसाची ४-५ वेळा वेचणी करणारे २ वेळा वेचणीवर आले आहे. ओलीताअभावी व उष्णतेमुळे कापसाची झाडे वाळून चालली आहे. शेतात जावून कापसाकडे पाहण्याची शक्ती संपुष्टात आली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल होवून वर्ष कसे काढावे अशी चिंता त्यांना सतावत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. घरचा कर्तापुरूष नापिकीमुळे संकटात सापडल्याने घरची मंडळी धिर देत आहे. शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचा शत्रु बनत असल्याने ज्या शेतकऱ्याकडे पैसा आहे, ओलिताचे साधन आहे तोच शेतकरी निसर्गाच्या संकटावर मात करून शेती पिकवू शकतो, असे शेतकरी बोलत आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांची दखल घेऊन कापूस व धानाचे दर वाढविण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)