शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

By admin | Updated: November 22, 2015 00:54 IST

यंदा निसर्गाने साथ न दिल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

निसर्गाची अवकृपा : वेचणीच्या दरात वाढ, भाव मात्र जैसे थेराजुरा : यंदा निसर्गाने साथ न दिल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने हमी भावात प्रसाद रूपात फक्त ५० रुपये वाढ केली. वेचणीसाठी मजुराची कमतरता असल्यामुळे नाईलाजास्तव ८ रुपये दराने वेचणी करावी लागत आहे. निसर्गाची अवकृपा झाली, पावसाने साथ दिली नाही. अती उष्णतेमुळे कापूस झाडाची वाढ झाली नाही. झाडांना बोंडाची लागण नाही. उच्च प्रतीचे बियाणे व फवारणी औषधीचा वापर करून सुद्धा उत्पादनाची जैसे थे स्थिती असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.यावर्षी सरासरी पेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला. पावसाने दडी मारली व सूर्याने आग ओकणे सुरू केले. त्यामुळे जमिनीतील ओलावा संपुष्टात आला. निसर्गाच्या पावसावर अवलंबून असलेले शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. मजुरांची कमतरता असल्यामुळे वेचणी झाली नाही. पहिल्या वेचणीचा कापूस झाडावर लोंबकाडत आहे. सधन व धनदांडग्या शेतकऱ्यांनी परगावातील मजुरांना ८ रुपये प्रती किलो वेचणीचा दर व येण्याजाण्यासाठी वाहन उपलब्ध करून घरातून घेणे व घरात पोहोचविणे अशा अटीवर कापसाची वेचणी करून घ्यावी लागत आहे. याचा परिणाम उत्पादन खर्चावर मोठी वाढ झाली आहे. त्या मोबदल्यात हमी भावात फक्त ५० रुपये वाढ दिली आहे. त्यातही अद्याप पावतो शासनाचे कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेपोटी खाजगी व्यापारीस पडत्या दरात ३ हजार ८०० रुपयात कापूस विकून गरज भागवावी लागत आहे.बियाणे व औषधी, खत यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली. मजुरांच्या मजुरीत वाढ झाली त्या तुलनेत कापसाच्या भावात वाढ झाली नाही. शासनकर्त्यांनी निवडणुकीत शेतकऱ्यांना व शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे सांगून उत्पादन खर्चानुसार दरात वाढ करण्याचे म्हटले होते. परंतु, प्रत्यक्षात तसे केले नाही. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे.पुरेसा पाऊस न पडल्यामुळे खरीप पीक संकटात आहे. जमिनीत ओलावा नाही. सूर्य आग ओकत आहे. शेतीचा पिकावर जीवन जगणारे शेतकरी हतबल झाला आहे. काय करावे, कसे करावे, कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, बँकेच्या कर्जाची परतफेड कशाने करावी असे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. एकरी ८-१० क्विंटल होणारा कापूस २-३ क्विंटलवर आला आहे. यंदा कापसाचे उत्पादन ५० टक्के पेक्षा कमी झाले आहे. कापसाची ४-५ वेळा वेचणी करणारे २ वेळा वेचणीवर आले आहे. ओलीताअभावी व उष्णतेमुळे कापसाची झाडे वाळून चालली आहे. शेतात जावून कापसाकडे पाहण्याची शक्ती संपुष्टात आली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल होवून वर्ष कसे काढावे अशी चिंता त्यांना सतावत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. घरचा कर्तापुरूष नापिकीमुळे संकटात सापडल्याने घरची मंडळी धिर देत आहे. शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचा शत्रु बनत असल्याने ज्या शेतकऱ्याकडे पैसा आहे, ओलिताचे साधन आहे तोच शेतकरी निसर्गाच्या संकटावर मात करून शेती पिकवू शकतो, असे शेतकरी बोलत आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांची दखल घेऊन कापूस व धानाचे दर वाढविण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)