शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
‘ऑनलाइन गेमिंग’मध्ये उच्चशिक्षित शेतकऱ्याला चुना, ३० लाखांची फसवणूक!
3
माणसाचं वय 150 वर्षांपर्यंत करेल AI, वैज्ञानिकांनी सांगितली अशी गोष्ट की तुम्हीही खुश व्हाल!
4
दिल्ली स्फोटात नाव आल्याची बतावणी, ७१ वर्षीय वृद्धाला २९ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल
5
"प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप
6
'या' स्मॉलकॅप कंपनीत रोहित शर्माची मोठी गुंतवणूक, खरेदी केले शेअर; इंट्रा-डेमध्ये स्टॉक बनला रॉकेट
7
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानला महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
8
महिंद्राने लाँच केली जगातील पहिली फॉर्म्युला ई-थीम एसयूव्ही, फ्यूचरिस्टिक डिझाइन अन् वर्ल्ड क्लास फीचर्स; जाणून घ्या किंमत
9
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
10
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
11
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
12
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
13
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
14
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
15
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
16
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
17
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
18
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
19
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
20
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदीची घोषणा फसवी

By admin | Updated: November 15, 2014 22:43 IST

यावर्षी दुबार, तिबार पेरणी करूनही सोयाबीनला उतारी नाही व दरही नाही. त्यामुळे रोखीचे समजले जाणारे कापूस उत्पादन बऱ्यापैकी होत आहे. परंतु सध्या कापसाला अत्यल्प दर मिळत असल्याने

अच्छे दिन गेले कुठे ? : अत्यल्प दरामुळे कापूस उत्पादक संकटातप्रवीण खिरटकर - वरोरायावर्षी दुबार, तिबार पेरणी करूनही सोयाबीनला उतारी नाही व दरही नाही. त्यामुळे रोखीचे समजले जाणारे कापूस उत्पादन बऱ्यापैकी होत आहे. परंतु सध्या कापसाला अत्यल्प दर मिळत असल्याने लागवडीपासून विक्रीपर्यंतचा खर्चही निघत नाही. त्यामुळे कापूस उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. गतवर्षीची सोयाबीनची नापिकी व यावर्षीचा कापसाचा अत्यल्प दर यामुळे शेतकऱ्यांच्या माथ्यावरचा कर्जाचा डोंगर वाढणार आहे. विशेष म्हणजे, शासनाने १५ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीची घोषणा केली. परंतु आज या दृष्टीने कुठलीही तयारी दिसून आली नाही. त्यामुळे ही घोषणा हवेत विरली आहे. चालु हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना कपाशीची लागवड दोन-तीनदा करावी लागली. त्यानंतर निंदण, फवारणी, बियाणे, खत देणे, वेचाई व कापूस घरून बाजारपेठेत नेईपर्यंतचा खर्च सध्याच्या वाढत्या महागाईने शेतकऱ्यांच्या हाताबाहेर गेला आहे. सध्या कापसाला चार हजार ५० रुपये प्रति क्विंटल भाव दिला जात आहे. यामध्ये उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे यावर्षीचे कर्ज कसे फेडावे, हा प्रश्न हंगामाच्या मधातच शेतकऱ्यांना भेडसावीत आहे. कर्ज फेडले नाही तर पुढील हंगाम कसा करायचा, या विवंचनेत शेतकरी सापडले आहे. सोयाबीन पाठोपाठ कापसाच्या भावानेही शेतकऱ्यांना दगा दिल्याने कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात आला आहे. कापूस वेचाईचा दर आठ ते दहा रुपये किलो, त्यातही मजूर मिळत नाही. कापूस शेतात फुटून जास्त दिवस राहिल्यास तेही एक मोठी जोखीम शेतकऱ्यावर आली आहे.सहा हजार प्रति क्विंटल भाव मागणारे सत्तेत आले. भाजपाने काही दिवसांपूर्वी कापसाला सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे, अशी घोषणा केल्याने सध्या भाजपा सरकार राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे आज ना उद्या सध्याचे सरकार सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देतील, या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरात भरून ठेवला. त्यानंतरही कापूस निघणे सुरू असल्याने कापूस घरात कसा ठेवावा हा प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा ठाकला आहे. परंतु भाजपा सरकारमधील कापूस दरवाढीबाबत कुणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे सध्या असलेल्या दरात शेतकरी कापूस तोट्यात विकत असल्याचे दिसून येत आहे. विरोधकही कापूस दर वाढीबाबत बोलत नाही. दिवाळी अधिवेशनात कापूस दरवाढीची घोषणाही झाली व त्याची अंमलबजावणी होईपर्यंत शेतकऱ्याजवळील कापूस संपलेला असेल. त्यामुळे कापूस उत्पादकाची विवंचना वाढली आहे. शासनाने कापसाला सध्या सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देऊन शेतकऱ्यांना अच्छे दिन दाखवावे, अशी रास्त अपेक्षा कापूस उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत.