शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

खासगी व्यापाऱ्यांनी पाडले कापसाचे भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:01 IST

राजुरा, कोरपना तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही सीसीआयची कापूस खरेदी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेपोटी कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत असल्याने कापसाची प्रतवारी घसरल्याचे कारण पुढे करीत खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे दर चार हजार ५०० रुपयांपासून अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत पाडल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

ठळक मुद्देदीड हजार रुपयांची घसरण : पांढºया सोन्याची अक्षरश: लूट

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कोरोनाचे संकट अचानक उभे राहिल्याने राज्यात शासनाने संचारबंदी लागू केली. त्यामुळे मागील महिन्यांपासून सर्वच कामकाज ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला कापूस घरीच ठेवावा लागला. मात्र शासनाने ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात शेतीकामांसह शेतमाल विक्री करायला परवानगी दिली आहे. परंतु राजुरा तालुक्यात अजूनही सीसीआयची कापूस खरेदी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे खासगी व्यापारी शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात कापसाची खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे.शेतकरी नेहमीच या ना त्या कारणाने अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना कुणाचीही साथ उरली नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने कापूस खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावात विकावा लागत आहे. राजुरा, कोरपना तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही सीसीआयची कापूस खरेदी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेपोटी कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत असल्याने कापसाची प्रतवारी घसरल्याचे कारण पुढे करीत खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे दर चार हजार ५०० रुपयांपासून अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत पाडल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.खासगी व्यापारी एवढया मोठया प्रमाणात कापसाची अक्षरश: लूट करीत असल्याने कोणत्याही जबाबदार लोकप्रतनिधींनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना केली नाही.शेतकºयांचा कुणी वाली उरला नसल्याने शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळत नाही. क्विंटलमागे दोन ते तीन हजारांच्या मोठया फरकाने कमी दर देऊन शेतकऱ्यांचे पांढरे सोने अक्षरश: लुटले जात आहे. कापूस पिकावर मोठया प्रमाणात खर्च असताना तीन हजारापर्यंत एवढया कमी दरात शेतकऱ्यांनी कापूस विकला तर यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची दुर्दैवी वेळ आल्याशिवाय राहणार नाही.सीसीआय कापूस संकलन केंद्र सुरू करण्याचे शासनाचे आदेश आहे. मात्र राजुरा, कोरपना तालुक्यातील शासकीय कापूस संकलन केंद्र अद्यापही सुरू झाले नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने सीसीआयची शासकीय कापूस खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सीसीआयची कापूस खरेदी तातडीने सुरू कराखासगी व्यापारी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत कापसाची अक्षरश: कमी दरात लूट करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसावर केलेला खर्चही भरून निघत नाही. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत असून शासनाने तातडीने सीसीआयची कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.खासगी जिनींगवर कापसाला कमी दर देऊन खासगी व्यापारी कापसाची कवडीमोल भावात खरेदी करीत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. -सुधाकर गेडेकर, शेतकरी,पाचगाव.

 

टॅग्स :cottonकापूस