शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कापसाच्या अत्यल्प भावामुळे शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:28 IST

सध्या कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकºयांना मजुरांसाठी शोधाशोध करावी लागत आहे. ...

ठळक मुद्देउत्पादन खर्चही निघेना : शासनाचे हमी भावही कमीच

लोकमत न्यूज नेटवर्कआवारपूर : सध्या कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकºयांना मजुरांसाठी शोधाशोध करावी लागत आहे. अशातच शासनाने कापसाला जाहीर केलाला हमी भाव अत्यंत कमी व खासगी व्यापारीही अल्पदर देत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.एकरी कापसाच्या पिकाला वेचण्यापर्यंतचा उत्पादनाचा खर्च अंदाजे २५ हजार रूपयाच्या आसपास आहे. यात उत्पादन ५ ते ७ क्विंटल होत असते. मात्र सध्या प्रति क्विंटल ४३५० व ४४०० इतका कापसाला दर मिळत आहे. याची आकडेवरी काढली तर शेतकºयांच्या हाती काही लागत नाही. त्यामुळे शेतकरी संतापला असून कापसाला कमीत-कमी ५ हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणी होत आहे.मजुरांचा अभावपरिसरात मजुरांचा अभाव असल्याने बाहेर गावातून कापूस वेचणीसाठी मजूर आणावे लागत आहे. त्यांना प्रती ७ रुपये किलोदराने भाव द्यावा लागत आहे. मजुरांना आणणाºया गाडीच्या खर्चाचा अधिकचा भर पडत असल्याने पुढील वर्षी कापसाचे पीक घ्यावे की नाही, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.वन्यप्राण्यांचा हैदोसएकीकडे अस्मानी संकटाना तोड द्यावे लागत असताना वन्यप्राण्यांच्या हैदोसाने शेतकºयांना हैराण केले आहे. रोही, डुकर, हरीण हे वन्यप्राणी कापूस पिकाला जमीनदोस्त करीत आहेत. त्यामुळे उभे पीक खाली पाडून नासधुस असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.दलाल सक्रियशेतकºयांच्या थेट दरवाजापर्यंत जाऊन त्यांना फूस लावून व्यापाºयांकडून शेतकºयांची मोठ्या प्रमाणात लूटमार होत आहेत. शेतकºयांची दिशाभूल करीत हमीभावापेक्षा कवडीमोल दराने कापसाची खरेदी व्यापारी करीत असून यात अनेक दलाल सक्रिय आहेत. अशा प्रकारची खरेदी न करण्याचे आदेश सरकारने दिले होते. मात्र त्याला न जुमानता व्यापारी वर्गाने आपला व्यवसाय चालू ठेवला आहे.शासनाने जाहीर केलेल्या भावात उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे मोठी नामुष्की ओढावली आहे. शासनाने विचार करून कमीतकमी ५ हजार रुपये भाव द्यावा.- शिवराम खेकारे, शेतकरी खर्डी.