शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कापूस व सोयाबीनची उतारी घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:37 IST

सध्याच्या हंगामात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला. त्यात कापूस व सोयाबीन पीक तग धरून आहे. शेंगा व पात्या लागणे सुरू झाले.

ठळक मुद्देवरूणराजा कोपला : शेतकºयांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर

प्रवीण खिरटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : सध्याच्या हंगामात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला. त्यात कापूस व सोयाबीन पीक तग धरून आहे. शेंगा व पात्या लागणे सुरू झाले. परंतु पाऊस नाही व उष्णता वाढत असल्याने जमिनीत भेगा पडून सोयाबीनच्या शेंगात दाणे भरणार नाही व कापसाच्या पात्या गळून पडू लागल्याने यावर्षी कापूस व सोयाबीन पिकाची उतारी घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भात पीक हातून गेल्याने शेतकरी संकटात सापडला असल्याचे दिसून येत आहे.हंगामात रोखीचे पीक म्हणून कापूस व सोयाबीन, तुर या पिकाकडे शेतकरी बघत असतात. सोयाबीन पीक कमी खर्चात होऊन लवकर उत्पादन हातात येत असल्याने शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळले आहे. यावर्षीसुद्धा सोयाबीन, कपाशी, तूर या पिकाची लागवड करण्यात आली आहे. हंगामाच्या सुरूवातीला पाऊस पडल्याने पिकाची पेरणी करण्यात आली. अधेमधे पाऊस पडत असल्याने व पिकांची मशागत शेतकºयांनी चांगल्याप्रकारे केल्याने पिकाची स्थिती चांगली आहे. आता कपाशीला पात्या लागणे, सोयाबीनला शेंगा लागत आहे. अशातच पावसाने दडी मारली आहे. उष्णतेमध्ये भर पडत असल्याने जमिनीला भेगा पडत आहे. त्यामुळे कपाशीच्या पात्या गळून पडत आहे तर सोयाबीनच्या शेंगामध्ये दाणे भरत नाही.येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर कपाशी व सोयाबीन पिकाच्या उतारीत घट होवून त्यावर लागलेला खर्चही निघणे कठीण होणार आहे. त्यामुळे शेतकºयांच्या मनात धडकी भरली आहे.धानाला सर्वाधिक फटकाधान पीक घेण्याकरिता पºहे टाकावे लागते. शेतकºयांनी पºहे टाकले. पाऊस अचानक बेपत्ता झाला. जवळच्या पाण्याने पºहे वाचविण्याची धावपळ सुरू झाली. परंतु बांध्यामध्ये रोवणी करता आली नाही. त्यामुळे शेतकºयांनी आता भात पिकाऐवजी चना व गहु पिकासाठी आपली जमीन सज्ज करून ठेवल्याचे दिसून येत आहे.जनावरांना घरीच पाजावे लागते पाणीपावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने शेताच्या परिसरात असलेले नाले, बोड्या याध्ये पाणीसाठा नाही. त्यामुळे शेतकºयांना आपली पाळीव जनावरे आजही पावसाळ्यात घरी आणून पाणी पाजावे लागत आहे.शेतकºयांमध्ये पाण्यासाठी भांडणेसध्याचा हंगाम पावसाळ्याच्या हंगाम म्हणून ओळखला जातो. काही धरणातील पाणी सध्या कॅनलने सोडले जात आहे. आता पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने ओलिताच्या पाण्यावरून शेतकºयांमध्ये भांडणे होवून पोलिसात तक्रारीही दाखल झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.कापूस व सोयाबीन वाढीच्या अवस्थेत आहे. पावसाची आवश्यकता आहे. भात पिकाची रोवणी पावसाअभावी रखडलेली आहे.- व्ही. आर. प्रकाश, तालुका कृषी अधिकारी, वरोरापाऊस नसल्याने उष्णतेमध्ये वाढ झाली. त्यामुळे शेंगामध्ये दाणे भरणे प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. पात्या गळत आहे. जमिनीला भेगा पडणे सुरू आहे. पावसाअभावी गंभीर समस्या निर्माण झाली आहे.- मधुकर भलमे, प्रगतशील शेतकरी, चारगाव (खु)