शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

कापूस व सोयाबीनची उतारी घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:37 IST

सध्याच्या हंगामात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला. त्यात कापूस व सोयाबीन पीक तग धरून आहे. शेंगा व पात्या लागणे सुरू झाले.

ठळक मुद्देवरूणराजा कोपला : शेतकºयांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर

प्रवीण खिरटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : सध्याच्या हंगामात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला. त्यात कापूस व सोयाबीन पीक तग धरून आहे. शेंगा व पात्या लागणे सुरू झाले. परंतु पाऊस नाही व उष्णता वाढत असल्याने जमिनीत भेगा पडून सोयाबीनच्या शेंगात दाणे भरणार नाही व कापसाच्या पात्या गळून पडू लागल्याने यावर्षी कापूस व सोयाबीन पिकाची उतारी घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भात पीक हातून गेल्याने शेतकरी संकटात सापडला असल्याचे दिसून येत आहे.हंगामात रोखीचे पीक म्हणून कापूस व सोयाबीन, तुर या पिकाकडे शेतकरी बघत असतात. सोयाबीन पीक कमी खर्चात होऊन लवकर उत्पादन हातात येत असल्याने शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळले आहे. यावर्षीसुद्धा सोयाबीन, कपाशी, तूर या पिकाची लागवड करण्यात आली आहे. हंगामाच्या सुरूवातीला पाऊस पडल्याने पिकाची पेरणी करण्यात आली. अधेमधे पाऊस पडत असल्याने व पिकांची मशागत शेतकºयांनी चांगल्याप्रकारे केल्याने पिकाची स्थिती चांगली आहे. आता कपाशीला पात्या लागणे, सोयाबीनला शेंगा लागत आहे. अशातच पावसाने दडी मारली आहे. उष्णतेमध्ये भर पडत असल्याने जमिनीला भेगा पडत आहे. त्यामुळे कपाशीच्या पात्या गळून पडत आहे तर सोयाबीनच्या शेंगामध्ये दाणे भरत नाही.येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर कपाशी व सोयाबीन पिकाच्या उतारीत घट होवून त्यावर लागलेला खर्चही निघणे कठीण होणार आहे. त्यामुळे शेतकºयांच्या मनात धडकी भरली आहे.धानाला सर्वाधिक फटकाधान पीक घेण्याकरिता पºहे टाकावे लागते. शेतकºयांनी पºहे टाकले. पाऊस अचानक बेपत्ता झाला. जवळच्या पाण्याने पºहे वाचविण्याची धावपळ सुरू झाली. परंतु बांध्यामध्ये रोवणी करता आली नाही. त्यामुळे शेतकºयांनी आता भात पिकाऐवजी चना व गहु पिकासाठी आपली जमीन सज्ज करून ठेवल्याचे दिसून येत आहे.जनावरांना घरीच पाजावे लागते पाणीपावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने शेताच्या परिसरात असलेले नाले, बोड्या याध्ये पाणीसाठा नाही. त्यामुळे शेतकºयांना आपली पाळीव जनावरे आजही पावसाळ्यात घरी आणून पाणी पाजावे लागत आहे.शेतकºयांमध्ये पाण्यासाठी भांडणेसध्याचा हंगाम पावसाळ्याच्या हंगाम म्हणून ओळखला जातो. काही धरणातील पाणी सध्या कॅनलने सोडले जात आहे. आता पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने ओलिताच्या पाण्यावरून शेतकºयांमध्ये भांडणे होवून पोलिसात तक्रारीही दाखल झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.कापूस व सोयाबीन वाढीच्या अवस्थेत आहे. पावसाची आवश्यकता आहे. भात पिकाची रोवणी पावसाअभावी रखडलेली आहे.- व्ही. आर. प्रकाश, तालुका कृषी अधिकारी, वरोरापाऊस नसल्याने उष्णतेमध्ये वाढ झाली. त्यामुळे शेंगामध्ये दाणे भरणे प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. पात्या गळत आहे. जमिनीला भेगा पडणे सुरू आहे. पावसाअभावी गंभीर समस्या निर्माण झाली आहे.- मधुकर भलमे, प्रगतशील शेतकरी, चारगाव (खु)