शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कापूस व सोयाबीनची उतारी घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:37 IST

सध्याच्या हंगामात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला. त्यात कापूस व सोयाबीन पीक तग धरून आहे. शेंगा व पात्या लागणे सुरू झाले.

ठळक मुद्देवरूणराजा कोपला : शेतकºयांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर

प्रवीण खिरटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : सध्याच्या हंगामात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला. त्यात कापूस व सोयाबीन पीक तग धरून आहे. शेंगा व पात्या लागणे सुरू झाले. परंतु पाऊस नाही व उष्णता वाढत असल्याने जमिनीत भेगा पडून सोयाबीनच्या शेंगात दाणे भरणार नाही व कापसाच्या पात्या गळून पडू लागल्याने यावर्षी कापूस व सोयाबीन पिकाची उतारी घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भात पीक हातून गेल्याने शेतकरी संकटात सापडला असल्याचे दिसून येत आहे.हंगामात रोखीचे पीक म्हणून कापूस व सोयाबीन, तुर या पिकाकडे शेतकरी बघत असतात. सोयाबीन पीक कमी खर्चात होऊन लवकर उत्पादन हातात येत असल्याने शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळले आहे. यावर्षीसुद्धा सोयाबीन, कपाशी, तूर या पिकाची लागवड करण्यात आली आहे. हंगामाच्या सुरूवातीला पाऊस पडल्याने पिकाची पेरणी करण्यात आली. अधेमधे पाऊस पडत असल्याने व पिकांची मशागत शेतकºयांनी चांगल्याप्रकारे केल्याने पिकाची स्थिती चांगली आहे. आता कपाशीला पात्या लागणे, सोयाबीनला शेंगा लागत आहे. अशातच पावसाने दडी मारली आहे. उष्णतेमध्ये भर पडत असल्याने जमिनीला भेगा पडत आहे. त्यामुळे कपाशीच्या पात्या गळून पडत आहे तर सोयाबीनच्या शेंगामध्ये दाणे भरत नाही.येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर कपाशी व सोयाबीन पिकाच्या उतारीत घट होवून त्यावर लागलेला खर्चही निघणे कठीण होणार आहे. त्यामुळे शेतकºयांच्या मनात धडकी भरली आहे.धानाला सर्वाधिक फटकाधान पीक घेण्याकरिता पºहे टाकावे लागते. शेतकºयांनी पºहे टाकले. पाऊस अचानक बेपत्ता झाला. जवळच्या पाण्याने पºहे वाचविण्याची धावपळ सुरू झाली. परंतु बांध्यामध्ये रोवणी करता आली नाही. त्यामुळे शेतकºयांनी आता भात पिकाऐवजी चना व गहु पिकासाठी आपली जमीन सज्ज करून ठेवल्याचे दिसून येत आहे.जनावरांना घरीच पाजावे लागते पाणीपावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने शेताच्या परिसरात असलेले नाले, बोड्या याध्ये पाणीसाठा नाही. त्यामुळे शेतकºयांना आपली पाळीव जनावरे आजही पावसाळ्यात घरी आणून पाणी पाजावे लागत आहे.शेतकºयांमध्ये पाण्यासाठी भांडणेसध्याचा हंगाम पावसाळ्याच्या हंगाम म्हणून ओळखला जातो. काही धरणातील पाणी सध्या कॅनलने सोडले जात आहे. आता पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने ओलिताच्या पाण्यावरून शेतकºयांमध्ये भांडणे होवून पोलिसात तक्रारीही दाखल झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.कापूस व सोयाबीन वाढीच्या अवस्थेत आहे. पावसाची आवश्यकता आहे. भात पिकाची रोवणी पावसाअभावी रखडलेली आहे.- व्ही. आर. प्रकाश, तालुका कृषी अधिकारी, वरोरापाऊस नसल्याने उष्णतेमध्ये वाढ झाली. त्यामुळे शेंगामध्ये दाणे भरणे प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. पात्या गळत आहे. जमिनीला भेगा पडणे सुरू आहे. पावसाअभावी गंभीर समस्या निर्माण झाली आहे.- मधुकर भलमे, प्रगतशील शेतकरी, चारगाव (खु)