शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरगाव प्रकल्पाच्या कामात करोडोंचा भ्रष्टाचार

By admin | Updated: March 19, 2016 00:41 IST

राजुरा तालुक्यातील सिंचन वाढविण्यासाठी तयार झालेल्या डोंगरगाव प्रकल्पाचे काम मागील अनेक वर्षापासून सुरू आहे.

शेतकरी पंढरीनाथ दोरखंडे यांचा आरोप : कॅनलचे पाणी आल्यास शेती सरकारला दान देईनराजुरा : राजुरा तालुक्यातील सिंचन वाढविण्यासाठी तयार झालेल्या डोंगरगाव प्रकल्पाचे काम मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. मात्र या प्रकल्पाच्या कामात करोडोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप धानोराचे शेतकरी पंढरीनाथ दोरखंडे यांनी केला आहे. डोंगरगाव कॅनलचे पाणी धानोऱ्याला पोहचल्यास आपली शेती सरकारला दान देईन, असे आव्हान दोरखंडे यांनी प्रशासनाला दिला आहे. डोंगरगाव प्रकल्पाचे पाणी धानोऱ्याला येऊच शकत नाही. करोडो रूपयाचे काम करूनही शासकीय निधीचा दुरुपयोग सुरू आहे. या प्रकल्पासाठी कॅनलवर जेवढा खर्च होत आहे, तेवढ्या खर्चात धानोऱ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला दोन हातपंप दिले असते तर मुबलक पाणी मिळाले असते, असे दोरखंडे यांनी म्हटले आहे.अनेक वर्षापूर्वी प्रकल्पासाठी प्रशासनाने शेती घेतली. परंतु अनेक शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही. आता चंद्रपूरचे कार्यालय मूलला गेले असून शेकडो शेतकरी मागील अनेक वर्षापासून डोंगरगाव प्रकल्पाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.धानोरा येथील तलाव खोदून तलावाची माती कॅनलसाठी वापरण्यात येत असून हजारो ब्रास माती रॉयल्टी शिवाय वापरण्यात येत असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.‘रोजगार हमी, अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही’ या उक्तीप्रमाणे डोंगरगाव प्रकल्पापासून धानोरापर्यंत पाणी यावे यासाठी डोंगरगावपासून धानोरा पर्यंतचे कॅनलचे काम सुरू आहे. धानोरा येथील शेतकऱ्याच्या विहिरी बुजवून टाकल्या असून पंढरीनाथ दोरखंडे यांच्या विहिरीत माती टाकली, शेतातील मृर्ती माती टाकून जमिनीत पुरली. याबाबत विरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती पंढरीनाथ दोरखंडे, काशिनाथ झाडे, वसंत माहुलीकर, लहु टेकाम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यांनी स्वत:च्या हक्कासाठी शेतकरी हवालदिल होत असताना शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)आत्महत्या करण्याच्या इशाराया कॅनलसाठी कवडीमोल किमतीमध्ये जमिनी घेतल्या. मात्र आता विहिरी बुजवून काम करणारे सिंचाई विभागाचे अधिकारी दादागिरी करीत असल्याचा आरोप पंढरीनाथ दोरखंडे यांनी केला आहे. कॅनलच्या कामात मोठी अफरातफर झाली असून याची चौकशी व्हावी व ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही त्यांना ३० मार्च पर्यंत रक्कम न दिल्यास या विभागाच्या पुढे आत्महत्या करण्याचा इशारा धानोऱ्याचे शेतकरी पंढरीनाथ दोरखंडे यांनी दिला आहे.