शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
2
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २० नक्षली ठार
3
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
4
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
5
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!
7
पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती; 
8
तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट
9
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
10
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
11
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
12
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट
13
ओलाच्या रोडस्टर मोटरसायकलची डिलिव्हरी केव्हापासून? मालकाने जाहीर केली तारीख...
14
नौदलाला आज असे जहाज मिळणार, जगात कोणत्याही नौदलाकडे नाही; पाचव्या शतकातील आरमाराची ताकद जगभ्रमंतीला निघणार...
15
IPL 2025: जोश हेझलवूडने RCB फॅनसोबत केलं 'असं' कृत्य; Video पाहून तुम्हालाही येईल राग
16
"झावळ्यांमधून पोरांनी आम्हाला कपडे बदलताना पाहिलं आणि.."; उषा नाडकर्णींनी सांगितला भयानक अनुभव
17
"मलाच धक्का बसलाय..." परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३' सोडण्यावर सुनील शेट्टीची प्रतिक्रिया
18
आणखी एक ज्योती? १२ वर्षांच्या मुलाला सोडून नागपूरची महिला कारगिलमधून गायब, पाकिस्तानी नंबरवर झालेली फोनाफोनी
19
Akhilesh Yadav : "भाजपाची चूक नेहमीच लोकांसाठी जीवघेणी"; कोरोनाबद्दल अखिलेश यादव यांचा गंभीर इशारा
20
६ तास कसून चौकशी, अनेक बँकांत खाती; काही प्रश्नांची उत्तरे ज्योतीला देताच आली नाहीत?

डोंगरगाव प्रकल्पाच्या कामात करोडोंचा भ्रष्टाचार

By admin | Updated: March 19, 2016 00:41 IST

राजुरा तालुक्यातील सिंचन वाढविण्यासाठी तयार झालेल्या डोंगरगाव प्रकल्पाचे काम मागील अनेक वर्षापासून सुरू आहे.

शेतकरी पंढरीनाथ दोरखंडे यांचा आरोप : कॅनलचे पाणी आल्यास शेती सरकारला दान देईनराजुरा : राजुरा तालुक्यातील सिंचन वाढविण्यासाठी तयार झालेल्या डोंगरगाव प्रकल्पाचे काम मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. मात्र या प्रकल्पाच्या कामात करोडोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप धानोराचे शेतकरी पंढरीनाथ दोरखंडे यांनी केला आहे. डोंगरगाव कॅनलचे पाणी धानोऱ्याला पोहचल्यास आपली शेती सरकारला दान देईन, असे आव्हान दोरखंडे यांनी प्रशासनाला दिला आहे. डोंगरगाव प्रकल्पाचे पाणी धानोऱ्याला येऊच शकत नाही. करोडो रूपयाचे काम करूनही शासकीय निधीचा दुरुपयोग सुरू आहे. या प्रकल्पासाठी कॅनलवर जेवढा खर्च होत आहे, तेवढ्या खर्चात धानोऱ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला दोन हातपंप दिले असते तर मुबलक पाणी मिळाले असते, असे दोरखंडे यांनी म्हटले आहे.अनेक वर्षापूर्वी प्रकल्पासाठी प्रशासनाने शेती घेतली. परंतु अनेक शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही. आता चंद्रपूरचे कार्यालय मूलला गेले असून शेकडो शेतकरी मागील अनेक वर्षापासून डोंगरगाव प्रकल्पाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.धानोरा येथील तलाव खोदून तलावाची माती कॅनलसाठी वापरण्यात येत असून हजारो ब्रास माती रॉयल्टी शिवाय वापरण्यात येत असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.‘रोजगार हमी, अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही’ या उक्तीप्रमाणे डोंगरगाव प्रकल्पापासून धानोरापर्यंत पाणी यावे यासाठी डोंगरगावपासून धानोरा पर्यंतचे कॅनलचे काम सुरू आहे. धानोरा येथील शेतकऱ्याच्या विहिरी बुजवून टाकल्या असून पंढरीनाथ दोरखंडे यांच्या विहिरीत माती टाकली, शेतातील मृर्ती माती टाकून जमिनीत पुरली. याबाबत विरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती पंढरीनाथ दोरखंडे, काशिनाथ झाडे, वसंत माहुलीकर, लहु टेकाम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यांनी स्वत:च्या हक्कासाठी शेतकरी हवालदिल होत असताना शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)आत्महत्या करण्याच्या इशाराया कॅनलसाठी कवडीमोल किमतीमध्ये जमिनी घेतल्या. मात्र आता विहिरी बुजवून काम करणारे सिंचाई विभागाचे अधिकारी दादागिरी करीत असल्याचा आरोप पंढरीनाथ दोरखंडे यांनी केला आहे. कॅनलच्या कामात मोठी अफरातफर झाली असून याची चौकशी व्हावी व ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही त्यांना ३० मार्च पर्यंत रक्कम न दिल्यास या विभागाच्या पुढे आत्महत्या करण्याचा इशारा धानोऱ्याचे शेतकरी पंढरीनाथ दोरखंडे यांनी दिला आहे.