शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

डोंगरगाव प्रकल्पाच्या कामात करोडोंचा भ्रष्टाचार

By admin | Updated: March 19, 2016 00:41 IST

राजुरा तालुक्यातील सिंचन वाढविण्यासाठी तयार झालेल्या डोंगरगाव प्रकल्पाचे काम मागील अनेक वर्षापासून सुरू आहे.

शेतकरी पंढरीनाथ दोरखंडे यांचा आरोप : कॅनलचे पाणी आल्यास शेती सरकारला दान देईनराजुरा : राजुरा तालुक्यातील सिंचन वाढविण्यासाठी तयार झालेल्या डोंगरगाव प्रकल्पाचे काम मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. मात्र या प्रकल्पाच्या कामात करोडोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप धानोराचे शेतकरी पंढरीनाथ दोरखंडे यांनी केला आहे. डोंगरगाव कॅनलचे पाणी धानोऱ्याला पोहचल्यास आपली शेती सरकारला दान देईन, असे आव्हान दोरखंडे यांनी प्रशासनाला दिला आहे. डोंगरगाव प्रकल्पाचे पाणी धानोऱ्याला येऊच शकत नाही. करोडो रूपयाचे काम करूनही शासकीय निधीचा दुरुपयोग सुरू आहे. या प्रकल्पासाठी कॅनलवर जेवढा खर्च होत आहे, तेवढ्या खर्चात धानोऱ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला दोन हातपंप दिले असते तर मुबलक पाणी मिळाले असते, असे दोरखंडे यांनी म्हटले आहे.अनेक वर्षापूर्वी प्रकल्पासाठी प्रशासनाने शेती घेतली. परंतु अनेक शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही. आता चंद्रपूरचे कार्यालय मूलला गेले असून शेकडो शेतकरी मागील अनेक वर्षापासून डोंगरगाव प्रकल्पाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.धानोरा येथील तलाव खोदून तलावाची माती कॅनलसाठी वापरण्यात येत असून हजारो ब्रास माती रॉयल्टी शिवाय वापरण्यात येत असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.‘रोजगार हमी, अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही’ या उक्तीप्रमाणे डोंगरगाव प्रकल्पापासून धानोरापर्यंत पाणी यावे यासाठी डोंगरगावपासून धानोरा पर्यंतचे कॅनलचे काम सुरू आहे. धानोरा येथील शेतकऱ्याच्या विहिरी बुजवून टाकल्या असून पंढरीनाथ दोरखंडे यांच्या विहिरीत माती टाकली, शेतातील मृर्ती माती टाकून जमिनीत पुरली. याबाबत विरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती पंढरीनाथ दोरखंडे, काशिनाथ झाडे, वसंत माहुलीकर, लहु टेकाम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यांनी स्वत:च्या हक्कासाठी शेतकरी हवालदिल होत असताना शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)आत्महत्या करण्याच्या इशाराया कॅनलसाठी कवडीमोल किमतीमध्ये जमिनी घेतल्या. मात्र आता विहिरी बुजवून काम करणारे सिंचाई विभागाचे अधिकारी दादागिरी करीत असल्याचा आरोप पंढरीनाथ दोरखंडे यांनी केला आहे. कॅनलच्या कामात मोठी अफरातफर झाली असून याची चौकशी व्हावी व ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही त्यांना ३० मार्च पर्यंत रक्कम न दिल्यास या विभागाच्या पुढे आत्महत्या करण्याचा इशारा धानोऱ्याचे शेतकरी पंढरीनाथ दोरखंडे यांनी दिला आहे.