शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

CoronaVirus Live Updates : चंद्रपूर जिल्ह्यात 1160 कोरोनामुक्त, 370 पॉझिटिव्ह तर 26 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 19:00 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 78 हजार 509 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 68 हजार 835 झाली आहे.

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासांत 1160 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 370 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 26 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 78 हजार 509 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 68 हजार 835 झाली आहे. सध्या 8 हजार 373 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 39 हजार 35 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 57 हजार 584 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर वार्ड येथील 70 वर्षीय पुरुष, नेहरू नगर येथील 62 वर्षीय पुरुष, सिव्हिल लाईन परिसरातील 65 वर्षीय पुरुष, पडोली येथील 45 वर्षीय पुरुष, तुकूम परिसरातील 56 वर्षीय महिला, नगीनाबाग येथील 69 वर्षीय महिला, 49 वर्षीय महिला. देवाडा येथील 70 वर्षीय पुरुष, कोकेवाडा येथील 43 वर्षीय पुरुष. किटाळी-शिदूर येथील 61 वर्षीय महिला, पांढरकवडा येथील 42 वर्षीय महिला.

बल्लारपूर तालुक्यातील 82 वर्षीय महिला, विसापूर येथील 52 वर्षीय महिला. राजुरा तालुक्यातील 55 व 65 वर्षीय महिला. मूल तालुक्यातील 68 व 76 वर्षीय पुरुष. भद्रावती तालुक्यातील 68 व 75  वर्षीय पुरुष. गोंडपिपरी तालुक्यातील 37 वर्षीय पुरुष. कोरपना तालुक्यातील 23 वर्षीय पुरुष.  चिमूर तालुक्यातील 60 वर्षीय महिला, अडेगाव येथील 60 वर्षीय महिला. नागभीड तालुक्यातील 60 वर्षीय महिला तर वणी येथील 61 वर्षीय पुरुष व 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1301 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1204, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 35, यवतमाळ 44, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे. आज बाधीत आलेल्या 370  रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 127, चंद्रपूर तालुका 33, बल्लारपूर 27, भद्रावती 06, ब्रम्हपुरी 16, नागभिड 19, सिंदेवाही 12, मूल 25, सावली 16, पोंभूर्णा 07, गोंडपिपरी 19, राजूरा 16, चिमूर 03, वरोरा 21, कोरपना 15, जिवती 03 व इतर ठिकाणच्या 05 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसchandrapur-acचंद्रपूर