शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST

३० जुलै या ४२ वर्षीय युवकाला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आल्यापासून हा रुग्ण ऑक्सिजनवर होता. शनिवारी दुपारी या रुग्णाचा मृत्यू झाला. तो चंद्रपूर शहरातील रहेमत नगर येथील रहिवासी होता. ३० जुलैला गंभीर अवस्थेत रात्री ११.३० वाजता या बाधिताला दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात बाधिताच्या परिवाराला माहिती देण्यात आली असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देनव्या २८ बाधितांची भर, जिल्हाधिकारी कार्यालयातील ११४ जणांचे स्वॅब घेतले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रुग्णात वाढ होत आहे. असे असले तरी आतापर्यंत एकाही रुग्णाचा मृत्यू कोरोनाने झाला नव्हता. ही बाब जिल्हा प्रशासनासह नागरिकांना दिलासा देणारी होती. अखेर शनिवारी चंद्रपूर येथील रहेमत नगरातील एका ४२ वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला.३० जुलै या ४२ वर्षीय युवकाला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आल्यापासून हा रुग्ण ऑक्सिजनवर होता. शनिवारी दुपारी या रुग्णाचा मृत्यू झाला. तो चंद्रपूर शहरातील रहेमत नगर येथील रहिवासी होता. ३० जुलैला गंभीर अवस्थेत रात्री ११.३० वाजता या बाधिताला दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात बाधिताच्या परिवाराला माहिती देण्यात आली असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे.जिल्ह्यामध्ये शनिवारी आणखी २८ नव्या बाधितांची नोंद झाली आहे. आता एकूण बाधितसंख्या ५५१ झाली असून त्यापैकी ३३८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९८ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना विभागातील तीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने संपर्कातील ११४ कर्मचाऱ्यांचे नमुने घेण्यात आले. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव कसा झाला, याचा शोध सुरू आहे.आठ कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने घेतलेब्रह्मपुरी पंचायत समितीमधील एक पॉझिटिव्ह कर्मचारी जिल्हा परिषदेत आल्याने शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच दोनही मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. केवळ जि. प. कर्मचाऱ्यांनाच आतमध्ये प्रवेश देण्यात आला. जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना काल दिवसभर प्रवेशद्वार ताटकळत राहावे लागले. लोकप्रतिनिधीं तर जिल्हा परिषदेकडे फिरकलेच नव्हते. अत्यावश्यक सेवेतील आरोग्य विभागातील कर्मचारी जिल्हा परिषदेत कर्तव्यावर रुजू झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी रात्री उशिरा आठ कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले.ऑनलाईन तक्रारी स्वीकारण्यावरच भरजिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाने शिरकाव केल्याने ग्रामीण भागातील येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी सुरू झाली. मात्र शक्यतो ऑनलाईन तक्रारी स्वीकारण्याकडेच शुक्रवारपासून भर दिला जात आहे. कुणीही व्यक्ती थेट कक्षात जावून संबंधित अधिकाऱ्यांना भेट घेणार नाही, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी दिल्या. आज कार्यालयीन सुटी असल्याने परिसरात शुकशुकाट होता. सोमवारपासून दैनंदिन कामकाज सुरू झाल्यानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयात विनाकारण गर्दी होणार नाही, यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या