शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST

३० जुलै या ४२ वर्षीय युवकाला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आल्यापासून हा रुग्ण ऑक्सिजनवर होता. शनिवारी दुपारी या रुग्णाचा मृत्यू झाला. तो चंद्रपूर शहरातील रहेमत नगर येथील रहिवासी होता. ३० जुलैला गंभीर अवस्थेत रात्री ११.३० वाजता या बाधिताला दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात बाधिताच्या परिवाराला माहिती देण्यात आली असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देनव्या २८ बाधितांची भर, जिल्हाधिकारी कार्यालयातील ११४ जणांचे स्वॅब घेतले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रुग्णात वाढ होत आहे. असे असले तरी आतापर्यंत एकाही रुग्णाचा मृत्यू कोरोनाने झाला नव्हता. ही बाब जिल्हा प्रशासनासह नागरिकांना दिलासा देणारी होती. अखेर शनिवारी चंद्रपूर येथील रहेमत नगरातील एका ४२ वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला.३० जुलै या ४२ वर्षीय युवकाला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आल्यापासून हा रुग्ण ऑक्सिजनवर होता. शनिवारी दुपारी या रुग्णाचा मृत्यू झाला. तो चंद्रपूर शहरातील रहेमत नगर येथील रहिवासी होता. ३० जुलैला गंभीर अवस्थेत रात्री ११.३० वाजता या बाधिताला दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात बाधिताच्या परिवाराला माहिती देण्यात आली असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे.जिल्ह्यामध्ये शनिवारी आणखी २८ नव्या बाधितांची नोंद झाली आहे. आता एकूण बाधितसंख्या ५५१ झाली असून त्यापैकी ३३८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९८ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना विभागातील तीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने संपर्कातील ११४ कर्मचाऱ्यांचे नमुने घेण्यात आले. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव कसा झाला, याचा शोध सुरू आहे.आठ कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने घेतलेब्रह्मपुरी पंचायत समितीमधील एक पॉझिटिव्ह कर्मचारी जिल्हा परिषदेत आल्याने शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच दोनही मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. केवळ जि. प. कर्मचाऱ्यांनाच आतमध्ये प्रवेश देण्यात आला. जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना काल दिवसभर प्रवेशद्वार ताटकळत राहावे लागले. लोकप्रतिनिधीं तर जिल्हा परिषदेकडे फिरकलेच नव्हते. अत्यावश्यक सेवेतील आरोग्य विभागातील कर्मचारी जिल्हा परिषदेत कर्तव्यावर रुजू झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी रात्री उशिरा आठ कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले.ऑनलाईन तक्रारी स्वीकारण्यावरच भरजिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाने शिरकाव केल्याने ग्रामीण भागातील येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी सुरू झाली. मात्र शक्यतो ऑनलाईन तक्रारी स्वीकारण्याकडेच शुक्रवारपासून भर दिला जात आहे. कुणीही व्यक्ती थेट कक्षात जावून संबंधित अधिकाऱ्यांना भेट घेणार नाही, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी दिल्या. आज कार्यालयीन सुटी असल्याने परिसरात शुकशुकाट होता. सोमवारपासून दैनंदिन कामकाज सुरू झाल्यानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयात विनाकारण गर्दी होणार नाही, यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या