शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST

अन्नधान्याच्या सुविधा उपलब्ध करणे व शेतकऱ्यांना उपलब्ध परिस्थितीत नव्या हंगामासाठी सिद्ध करणे, अशी तिहेरी लढाई प्रशासन लढत आहे. याला जनतेचे उत्तम पाठबळ मिळत आहे. त्यामुळे शासन, प्रशासन व सामान्य जनता जिल्ह्यात एकजुटीने काम करीत असल्याने कोरोनाचा शिरकाव होणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीविजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी येथे केले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची ग्वाही : मात्र सर्वांनी एकजुटीने काम करा'

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण व शहरी भागात मोठया प्रमाणात वैद्यकीय तपासणी, जिल्हास्तरावर कोविड-१९ वैद्यकीय प्रयोग शाळेची उभारणी, वैद्यकीय यंत्रणेला आधुनिक सुविधा उपलब्ध करणे, ग्रामीण भागातील नागरिकांना अन्नधान्याच्या सुविधा उपलब्ध करणे व शेतकऱ्यांना उपलब्ध परिस्थितीत नव्या हंगामासाठी सिद्ध करणे, अशी तिहेरी लढाई प्रशासन लढत आहे. याला जनतेचे उत्तम पाठबळ मिळत आहे. त्यामुळे शासन, प्रशासन व सामान्य जनता जिल्ह्यात एकजुटीने काम करीत असल्याने कोरोनाचा शिरकाव होणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीविजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी येथे केले.चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते व वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत त्यांनी आढावा घेतला.त्यानंतर नागरिकांना प्रशासनाच्या निर्देशाचे पुढील ३ मेपर्यंत पालन करण्याचे आदेश दिले. ३ मेपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी तथा साथरोग कायद्याअंतर्गत निर्बंध लागू राहतील. मात्र यामधून जीवनावश्यक सेवा व त्यासाठीची होणाºया वाहतुकींना सुरू ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.बँकेऐवजी सेतू केंद्रातून काढा पैसेजिल्हाधिकाऱ्यांनी पुढील ३ तारखेपर्यंत जिल्ह्यात काय सुरू राहील व काय बंद राहील यासंदर्भात आदेश जारी केले आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तू तसेच शेतीची सर्व कामे सुरळीतरित्या सुरू राहतील, याकडे शासनाने लक्ष वेधले आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा येथील मजुरांना तेंदूपत्ता गोळा करण्याचे काम करण्यास मान्यता दिली आहे. बँकांनी याकाळात शेतकऱ्यांना पीक कर्ज नियमितपणे उपलब्ध करावे. तसेच संचारबंदी असताना गाव पातळीवर सेतू केंद्रातून नागरिकांना आवश्यक रक्कम योग्य प्रकारे वितरीत व्हावी, याकडे लक्ष देऊन असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले.'कार्डधारकांना किराना साहित्याचे वाटपप्रत्येक नागरिकाला सुरक्षित ठेवण्यासाठी शासन म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी गरिबी रेषेखालील व अंत्योदय कार्डधारकांना खनिज विकास निधीतून किराना साहित्याचे वाटप करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. नागरिकांनीदेखील या परिस्थितीत स्थानिक स्तरावर सुरू करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी मदत निधी व राज्य स्तरावरील मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मोठया प्रमाणात मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.नव्या ६५ पैकी ५० नमुने निगेटिव्हजिल्हयात गुरुवारी कोरोना संसर्ग संशयित म्हणून ७३ नागरिकांची नोंद करण्यात आली. ६५ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ५० नमुने निगेटिव्ह निघाले आहेत. १५ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे.

२,९४० संशयित निगराणीखालीजिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या २८ हजार ७६ आहे. यापैकी दोन हजार ९४० नागरिक निगराणीखाली आहेत. तर १४ दिवसांच्या होम क्वारंटाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या २५ हजार १३६ आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये सध्या ५९ जण आहेत. जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नसणे ही अतिशय सकारात्मक बाब आहे.आयसोलेशनसाठी १२ हॉस्पिटल ताब्यातजिल्ह्यात १२ हॉस्पिटल आयसोलेशनसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. १८ शासकीय इमारतीमध्ये जवळपास १२०० बेड उपलब्ध आहेत. उद्रेकाच्या कालावधीत करायच्या उपचाराचे प्रशिक्षण कर्मचाºयांना देण्यात आले असून जिल्ह्यातील यंत्रणा कोणत्याही प्रसंगाला सामना देण्यासाठी तत्पर आहे.

तीन महिने पुरेल एवढा धान्यसाठावैद्यकीय यंत्रणा बळकट करत असतानाच ग्रामीण व शहरी भागातील सर्व नागरिकांना आवश्यक अन्नधान्याचा पुरवठा व्हावा, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. पुढील तीन महिने पुरेल इतका मुबलक धान्य पुरवठा जिल्ह्यात आहे. याशिवाय महानगर पालिकेमार्फत कम्युनिटी किचन व जिल्ह्यात शिवभोजन व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने निराधार, निराश्रित लोकांना मदत केली जात आहे. शिवभोजन थाळीची संख्या दोन हजार ४०० गेली आहे. अन्य राज्यातील अडकलेल्या नागरिकांनादेखील योग्यप्रकारे निवारा व भोजन दिल्या जात आहे.

टॅग्स :Socialसामाजिक