शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

अर्थार्जनासाठी घराबाहेर निघणारा तरूण वयोगट ठरला ‘कोरोना टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 05:00 IST

कोरोना विषाणूचे जिल्ह्यात धडक दिल्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असणाऱ्यांनाच सर्वाधिक धोका असल्याचे आरोग्य विभाग व या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जात होते. गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत या वयोगटातील व्यक्तींना संसर्ग झाल्याची माहिती पुढे आली. तेव्हापासून ४० ते ६० वयोगटालाच खबरदारीच्या सूचना दिल्या जात होत्या. वयोमानानुसार त्यांची प्रतिकारशक्तीही कमी असते.

ठळक मुद्देकुटुंबातील ज्येष्ठ धास्तावले : १९ ते ४० वयोगटात १६ हजार १२९ बाधित

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नोकरी, व्यवसाय, स्वयंरोजगार अथवा कुटुंबातील दैनंदिन विविध कामांसाठी घराबाहेर निघणाऱ्या १९ ते ४० वयोगटातील सर्वाधिक व्यक्ती कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आरोग्य विभागाने बुधवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार शुक्रवारपर्यंत अशा वयोगटातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६ हजार १२९ पर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असणाऱ्या बाधितांचीच संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या व्यक्तींनाच यापुढे खबरदारी घ्यावी लागणार आहे.कोरोना विषाणूचे जिल्ह्यात धडक दिल्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असणाऱ्यांनाच सर्वाधिक धोका असल्याचे आरोग्य विभाग व या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जात होते. गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत या वयोगटातील व्यक्तींना संसर्ग झाल्याची माहिती पुढे आली. तेव्हापासून ४० ते ६० वयोगटालाच खबरदारीच्या सूचना दिल्या जात होत्या. वयोमानानुसार त्यांची प्रतिकारशक्तीही कमी असते. त्यामुळे नागरिकांनीही घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेऊन घराबाहेरील दैनंदिन सर्वच कामांची जबाबदारी स्वत:कडे घेतली. कोरोनामुळे ज्येष्ठांच्या सामूहिक संपर्काला मर्यादा घालण्यात आल्या; परंतु कुटुंबातील महत्त्वाच्या कामांची जबाबदारी घेणाऱ्या १९ ते ४० वयोगटातील युवक- युवती, नोकरदार, व्यावसायिक व स्वयंरोजगार करणारेच आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित होत आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तुटली नाही, तर काही दिवसांतच कमावती तरुणाई कोरोनाच्या विळख्यात सापडून मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने चाचण्याची गती वाढविली आहे.

लसीकरण वयोगटाचा पुनर्विचार व्हावाकोरोना प्रतिबंधक लस (व्हॅक्सिन) कुणाला द्यायची, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. सद्यस्थितीत १९ ते ४० वयोगटातील नागरिक लस घेण्यास पात्र नाहीत. लसीकरण मोहिमेचे अद्याप विकेंद्रीकरण झाले नसल्याने जिल्ह्यांना राज्य सरकारकडे व राज्य सरकारला केंद्र सरकारकडे डोससाठी हात पसरावे लागत आहे.  पुरेशा डोसअभावी  केंद्र बंद ठेवाव्या लागतात. काही दिवसात हे चित्र बदलेल, अशी आशा करूया. मात्र, कमावत्या तरूण वयोगटालाच कोरोनाने टार्गेट             केल्याने व्हॅक्सिन वयोगटाचा तातडीने पुनर्विचार करावा लागणार         आहे. 

कमावत्या वयोगटामुळे घरात शिरला कोरोनाकोरोनामुळे घरातील ज्येष्ठ नागरिकांचा सार्वजनिक वावर कमी झाला. कुटुंंबातील बहुतांश कमावते सदस्य बाहेरील कामांची जबाबदारी स्वत:कडे घेतली. मात्र, चंद्रपुरातील बºयाच कुटुंबात १९ ते ४० वयोगटातील सदस्यच कोरोना बाधित झाले. त्यांच्यामुळे ज्येष्ठांवरही कोरोना संसर्गाची आपत्ती ओढवली तर काहींचा बळी गेला. त्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना आता स्वत:सोबतच कमावत्या मुलामुलींचीही चिंता सतावू लागली आहे.

संकटात आशेचे किरण१९ ते ४० वयोगटाला कोरोनाने लक्ष्य केले. मात्र, मृत्यु होण्याचे प्रमाण कमी आहे. आतापर्यंत ३० ते ४० वयोगटातील ३४ जणांचा मृत्यू झाला. ४० ते ५० वयोगटात १४२ तर ६० वयोगटात २८० जणांचा मृत्यू झाला. पण, १९ ते ४० वयोगटातील कोरोना दुरूस्ती (रिकव्हरी रेट) दर सध्या तरी चिंताजनक नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या