शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
3
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
4
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
5
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
6
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
7
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
8
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
9
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
10
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
11
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
12
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
13
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
14
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
15
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
16
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
17
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
18
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
19
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
20
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने जिल्ह्यात दीड हजारांवर मृत्यू, वारसाला मिळणार 50 हजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 05:00 IST

कोविड प्रकरणात व्यक्तीचा मृत्यू चाचण्यांच्या दिनांकापासून किंवा रुग्णालयातील दिनांकापासून ३० दिवसांच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनाने झाला असे समजण्यात येणार आहे. यामध्ये रुग्णांना आत्महत्या केली असेल तरीही त्याच्या कुटुंबीयांना मदत मिळणार आहे. एखाद्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू    झाला असेल किंवा मृत्यू ३० दिवसांनंतर झाला असेल तरीही त्याचा कोविडने मृत्यू समजण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकटामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक कुटुंबांतील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या कुटुंबाची वाताहत होऊ नये, त्यांना थोडाफार दिलासा मिळावा यासाठी कुुटुंबीयांना ५० हजारांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. यासाठी आता राज्य शासनाने एक आदेश काढला असून वेबपोर्टलच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे.सद्य:स्थितीत कोरोना आटोक्यात असला तरी संकट मात्र कायम आहे. अनेक बालकांना आपल्या आई-वडिलांना गमवावे लागले तर शेकडो कुटुंबीय उघड्यावर पडले आहेत. या सर्व कुटुंबांना शासनाच्या वतीने ५० हजारांची मदत केली जाणार आहे. शासनस्तरावरून अधिकृत आदेश निघाला नव्हता. त्यामुळे मदत मिळणार की, नाही याबाबत शंका व्यक्त केली जात होती. 

असा करा अर्ज...- राज्य शासनाने विकसित केलेल्या वेबपोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी अर्जदाराला स्वत: किंवा सेतू केंद्र, ग्रामपंचायतीत सीएससी, एसपीव्हीमधून अर्ज करता येणार        आहे.

 ही कागदपत्रे हवी - अर्जदाराचा स्वत:चा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक, अर्जदाराचा स्वत:चा बँक तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ खालील मृत्यू प्रमाणपत्र, इतर निकट नातेवाइकांचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र सादर करावे लागणार आहे.

अशा असतील अटी

  1. - कोविड प्रकरणात व्यक्तीचा मृत्यू चाचण्यांच्या दिनांकापासून किंवा रुग्णालयातील दिनांकापासून ३० दिवसांच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनाने झाला असे समजण्यात येणार आहे. यामध्ये रुग्णांना आत्महत्या केली असेल तरीही त्याच्या कुटुंबीयांना मदत मिळणार आहे. एखाद्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू    झाला असेल किंवा मृत्यू ३० दिवसांनंतर झाला असेल तरीही त्याचा कोविडने मृत्यू समजण्यात येणार आहे. मेडिकल प्रमाणपत्रामध्ये कोविडमुळे मृत्यू अशी नोंद नसली तरीही अटींची पूर्तता होत असेल तर त्यांचे कुटुंबीय अनुदानास पात्र राहणार    आहेत.

मृत्यू संख्या अधिक?जिल्हा प्रशासनाने १ हजार ५४३ जणांचा मृत्यू कोरोनाने झाल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, काही रुग्णांनी इतर जिल्ह्यात तसेच राज्यामध्ये जाऊन उपचार घेतला आहे. त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. तेथे तशी नोंद आहे. तर दुसऱ्या जिल्ह्यातील काही नागरिकांनी येथे उपचार घेतला आहे. त्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा नेमका आकडा सांगणे कठीण जाणार आहे.

आठवडाभरानंतर होणार वेबपोर्टल तयार-  कोविडमुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयातील वारसांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य शासन वेबपोर्टल तयार करणार असून या पोर्टलवर अर्ज करता येणार आहे. - वेब पोर्टल कार्यान्वित झाल्यानंतर अर्जदार आपला अर्ज करू शकणार आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू