शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

कोरोनाने हिरावले मुलांचे आई-बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:30 IST

चंद्रपूर : कोरोना संकट आले आणि अनेकांचे संसार उघड्यावर पडले. यामध्ये काही बालकांच्या डोक्यावरील छत्रही हरविले असून ते आता ...

चंद्रपूर : कोरोना संकट आले आणि अनेकांचे संसार उघड्यावर पडले. यामध्ये काही बालकांच्या डोक्यावरील छत्रही हरविले असून ते आता आई-वडिलाविना पोरके झाले आहेत. जिल्ह्यात अशा बालकांचा जिल्हा प्रशासनाद्वारे शोध घेतला जात आहे. यामध्ये काही बालकांचा शोध लागला असून त्यांची काळजी प्रशासन घेणार आहे.

जिल्ह्यात कोरोनामुळे अनेकांचे आईवडील दगावले. आता त्यांच्या पालनपोषणासह शिक्षण आणि आरोग्याचाही प्रश्न उभा ठाकला आहे. अशा निराधार काही मुलांचा नातेवाईकांकडून गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, काही दिवसापूर्वी मुलांना दत्तक द्यायचे आहे, अशा प्रकारचे फेक मॅसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने याची दखल घेत जिल्हा प्रशासनाला अशा बालकांचा शोध घेऊन त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने या बालकांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु केले आहे. सद्यस्थितीत प्रशासनाकडे ८ ते १० बालकांची नावे आली असल्याची माहिती मिळाली आहे.

बॅाक्स

या अनाथ मुलांचे सरकार काय करणार?

ज्या मुलांचे आई-वडील कोरोनामुळे दगावले आहे. अशा मुलांचे गावपातळीवर प्रशासन शोध घेत आहेत. यातील काहींचा शोध लागला आहे. शोध घेतल्यानंतर त्यांची परिस्थिती जाणून घेणार आहे. त्यांच्या कुटुंबातील कुणी त्यांचा सांभाळ करण्यास सक्षम आहे का, हे सुद्धा पडताळून बघणार आहे. ते सक्षम नसल्यास त्यांना शिशूगृहात तसेच अनुरक्षणगृहात ठेवण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रकिया बालकल्याण समिती मार्फत करण्यात येणार आहे. पालकांच्या संपत्तीमधील बालकांचा वाटा या अनुषंगानेही तपासणी करण्यात येणार आहे.

बाॅक्स

दरमहा १ हजार १०० रुपयांची मदत

कोरोनामुळे आई-वडील दोघांचेही किंवा दोघांपैकी एकाचे

निधन झाले असेल, अशा बालकांचा शोध घेऊन त्यांच्या अडचणीनुसार त्यांना दरमहा १ हजार १०० रुपये अनुदान बाल संगोपन योजनेंतर्गत मदत केली जाणार आहे. यासाठी हयात असलेल्या पालकाने काही कागदपत्र बाल कल्याण समितीकडे देणे आवश्यक आहे. मृत पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र, मुलाचा रहिवासी दाखला, छायाचित्र, आधार कार्ड व तहसीलदारांचे प्रमाणपत्र समितीकडे द्यावे लागणार आहे. सोबतच बॅंक खात्याचा क्रमांकही द्यावा लागणार आहे.

कोट

कोरोनामुळे आई-वडील दोघेही किंवा दोघांपैकी एक गमावलेल्या मुलांचे शोध घेणे सुरु आहे.यासाठी संपूर्ण जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणांद्वारे माहिती गोळा करणे सुरु करण्यात आले आहे. सद्यस्थितीत काही बालकांची माहिती मिळाली असून त्यांची पूर्णपणे काळजी घेतली जाणार आहे.

-अजय साखरकर

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, चंद्रपूर

---

बाॅक्स

माहिती द्यावी

या बालकांचे नुकसान होऊ नये, ते शोषणास तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करीमध्ये बळी पडू नये यासाठी समाजातील जागृत नागरिकांनीही प्रशासनाला माहिती कळविणे गरजेचे आहे. यासाठी १०९८ या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क करून माहिती देता येते.