शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कोरोनामुळे ग्रामीण व्यावसायिकांचीही झाली कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:21 IST

अत्यावश्यक सेवा वगळता ग्रामीण भागातील छोटे उद्योग व पूर्णत: कोलमडले आहेत. ग्रामीण लोकांच्या कुटुंबाचा आधार असलेल्या चहा टपऱ्या, भजी ...

अत्यावश्यक सेवा वगळता ग्रामीण भागातील छोटे उद्योग व पूर्णत: कोलमडले आहेत. ग्रामीण लोकांच्या कुटुंबाचा आधार असलेल्या चहा टपऱ्या, भजी विक्रेते, सलून दुकाने, इस्त्री करणारे, बुरूड कामगार, शिंपी, व्यावसायिक फोटो स्टुडिओ, शीतपेय विक्रेते अशा छोट्या व्यवसायांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. या व्यवसायांत अनेक निराधार, परित्यक्ता, विधवा महिलांचा समावेश आहे. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायांवर अवलंबून आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा याच व्यवसायांवर उभा आहे. कोरोना विषाणूच्या भीतीमुळे सारेच हतबल झाले आहेत. दरम्यान, शासनाने काहींना मदत जाहीर केली आहे. मात्र यातील बहुतेकांना त्याचा लाभच झाला नाही.

मागील दीड महिन्यापासून या संकटाचा सामना करताना अनेकांची दमछाक झाली आहे. बांधकाम मजूरही अडचणीत सापडले आहेत. हातांना काम नाही. त्यामुळे पैशांची चणचण भासू लागली आहे. वर्षभराचा कौटुंबिक खर्च याच कालावधीत मिळलेल्या उत्पन्नातून भागविण्यास मोठी मदत होत असताना मागील वर्षाप्रमाणेच लाॅकडाऊनमुळे संपूर्ण अर्थचक्र बिघडले आहे.

आता खरीप हंगाम आला आहे. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व कामे बंद झाल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. या सर्व अडचणींचा विचार करून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने शासन प्रशासनाने योग्य पावले उचलण्याची सध्या तरी गरज आहे.

बॉक्स

चूल कशी पेटणार?

कोराेनामुळे हातावर पोट असणाऱ्यांच्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. रोजचा व्यवसाय करून रात्री चूल पेटणाऱ्या घरात चिंता आहे. कोरोनाचा धोका कधी टळणार आहे, याबाबत काहीच कल्पना करता येत नाही. आता तर तिसऱ्या लाटेसंदर्भातही बोलले जात आहे. त्यामुळे या चिंतेत अधिकच भर पडत आहे.

रस्त्यांवर बसून विविध प्रकारच्या वस्तू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचा व्यवसाय बंद झाला आहे. रोज होणाऱ्या कमाईवर ज्यांचे पोट अवलंबून आहे, अशा छोट्या व्यावसायिकांचे जगणे सध्या तरी कठीण झाले आहे.

लहान व्यावसायिकांमध्ये हातगाड्यांबरोबरच पानटपऱ्या, चहाचे गाडे, छोटे हॉटेल, खाद्यपदार्थांचे गाडे, निरनिराळ्या वस्तूंचे किरकोळ विक्रेते, पंक्चर काढणारे, चप्पल शिवणारे, विविध वस्तू दुरुस्त करणारे, आदी व्यवसायांचा समावेश आहे. शहरात फिरून भीक मागून खाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. यांनाही रोजचे अन्न मिळणे कठीण झाले आहे.

बाॅक्स

मागील वर्षी काही सामाजिक संस्थांनी भोजन पुरवठा करून अनेकांना आधार दिला होता. मात्र या वर्षी असे उपक्रम बंदच आहेत. परिणामी भिकारी तसेच मागून खाणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.