शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
5
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
6
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
7
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
8
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
9
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
10
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
11
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
12
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
13
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
14
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
15
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
16
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
17
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
18
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
19
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
20
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार

काॅन्व्हेंट शिक्षकांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:21 IST

आठवडी बाजाराचा अनेकांना फटका चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्वच आठवडी बाजार बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, ...

आठवडी बाजाराचा अनेकांना फटका

चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्वच आठवडी बाजार बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे या बाजाराच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला मिळणारे उत्पन्नही घटले आहे. कोरोनाचे संकट लवकर दूर होऊन बाजार सुरू व्हावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

बेरोजगारांना सतावतेय चिंता

चंद्रपूर : स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय नोकरी मिळेल या आशेने जिल्ह्यातील बेरोजगार स्पर्धा परीक्षेकडे वळले. मात्र, कोरोनामुळे सर्वच बंद आहे. त्यामुळे भविष्यात स्पर्धा परीक्षा होतील की, नाही या चिंतेत सध्या ते पडले आहेत. दोन ते चार वर्षांपासून अभ्यास करूनही अद्यापही नोकरी न मिळाल्याने भविष्यात कसे जगायचे हा प्रश्न त्यांना सध्या सतावत आहे.

वीज वितरण कर्मचाऱ्यांना त्रास

चंद्रपूर : सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने वीज गुल होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यातच कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने बहुतांश नागरिक घरातच आहेत. परिणामी घरांमध्ये विजेचा वापर वाढला आहे. वीज गेल्यास महावितरणला फोनद्वारे माहिती देत दुरुस्तीची मागणी करीत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना तत्काळ येऊन दुरुस्ती करावी लागल आहे.

ग्रामीण भागात पाणी टंचाई

चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईचे सावट असून, प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेषत: डोंगरांवरील गावांमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे, तर काही गावांतील नळ योजना बंद असल्याने त्या गावातील नागरिकांनाही पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.

नदीपात्रात गर्दी वाढतेय

चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नदीपात्रामध्ये सायंकाळच्या सुमारास गर्दी वाढत असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. त्यामुळे याकडे ग्राम प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

जनावरांचेही सुरू आहेत हाल

जिवती : यावर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यांतून चारा आणता आला नसल्याने जनावरांचे चाऱ्याअभावी हाल होत आहेत. कसेबसे करून शेतकरी त्यांची सोय भागवत आहे. मात्र, आणखी अशीच काही दिवस परिस्थिती राहिल्यास मोठे संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महसूल कर्मचाऱ्यांना विमा सुरू करावा

चंद्रपूर : कोरोनामुळे सर्वत्र दहशत आहे. अत्यावश्यक सेवेतील नागरिक आपली जबाबदारी पार पाडत आहे. यातील काहींना शासनाने विमा लागू केला आहे. त्याच धर्तीवर महसूल तसेच इतर विभागांतील कर्मचाऱ्यांना विमा सुरू करावा, अशी मागणी केली जात आहे.

कृउबा समिती परिसरात गर्दी वाढली

चंद्रपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक गर्दी करीत आहेत. त्यामुळे या गर्दीवर आळा घालण्याची मागणी केली जात आहे. काही ग्राहक आपली वाहने रस्त्यावर लावत असल्याने येथे भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनांना अडचण होत आहे. यावर लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.