शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

काॅन्व्हेंट शिक्षकांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:21 IST

आठवडी बाजाराचा अनेकांना फटका चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्वच आठवडी बाजार बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, ...

आठवडी बाजाराचा अनेकांना फटका

चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्वच आठवडी बाजार बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे या बाजाराच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला मिळणारे उत्पन्नही घटले आहे. कोरोनाचे संकट लवकर दूर होऊन बाजार सुरू व्हावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

बेरोजगारांना सतावतेय चिंता

चंद्रपूर : स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय नोकरी मिळेल या आशेने जिल्ह्यातील बेरोजगार स्पर्धा परीक्षेकडे वळले. मात्र, कोरोनामुळे सर्वच बंद आहे. त्यामुळे भविष्यात स्पर्धा परीक्षा होतील की, नाही या चिंतेत सध्या ते पडले आहेत. दोन ते चार वर्षांपासून अभ्यास करूनही अद्यापही नोकरी न मिळाल्याने भविष्यात कसे जगायचे हा प्रश्न त्यांना सध्या सतावत आहे.

वीज वितरण कर्मचाऱ्यांना त्रास

चंद्रपूर : सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने वीज गुल होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यातच कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने बहुतांश नागरिक घरातच आहेत. परिणामी घरांमध्ये विजेचा वापर वाढला आहे. वीज गेल्यास महावितरणला फोनद्वारे माहिती देत दुरुस्तीची मागणी करीत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना तत्काळ येऊन दुरुस्ती करावी लागल आहे.

ग्रामीण भागात पाणी टंचाई

चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईचे सावट असून, प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेषत: डोंगरांवरील गावांमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे, तर काही गावांतील नळ योजना बंद असल्याने त्या गावातील नागरिकांनाही पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.

नदीपात्रात गर्दी वाढतेय

चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नदीपात्रामध्ये सायंकाळच्या सुमारास गर्दी वाढत असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. त्यामुळे याकडे ग्राम प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

जनावरांचेही सुरू आहेत हाल

जिवती : यावर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यांतून चारा आणता आला नसल्याने जनावरांचे चाऱ्याअभावी हाल होत आहेत. कसेबसे करून शेतकरी त्यांची सोय भागवत आहे. मात्र, आणखी अशीच काही दिवस परिस्थिती राहिल्यास मोठे संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महसूल कर्मचाऱ्यांना विमा सुरू करावा

चंद्रपूर : कोरोनामुळे सर्वत्र दहशत आहे. अत्यावश्यक सेवेतील नागरिक आपली जबाबदारी पार पाडत आहे. यातील काहींना शासनाने विमा लागू केला आहे. त्याच धर्तीवर महसूल तसेच इतर विभागांतील कर्मचाऱ्यांना विमा सुरू करावा, अशी मागणी केली जात आहे.

कृउबा समिती परिसरात गर्दी वाढली

चंद्रपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक गर्दी करीत आहेत. त्यामुळे या गर्दीवर आळा घालण्याची मागणी केली जात आहे. काही ग्राहक आपली वाहने रस्त्यावर लावत असल्याने येथे भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनांना अडचण होत आहे. यावर लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.