शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

काॅन्व्हेंट शिक्षकांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:21 IST

आठवडी बाजाराचा अनेकांना फटका चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्वच आठवडी बाजार बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, ...

आठवडी बाजाराचा अनेकांना फटका

चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्वच आठवडी बाजार बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे या बाजाराच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला मिळणारे उत्पन्नही घटले आहे. कोरोनाचे संकट लवकर दूर होऊन बाजार सुरू व्हावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

बेरोजगारांना सतावतेय चिंता

चंद्रपूर : स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय नोकरी मिळेल या आशेने जिल्ह्यातील बेरोजगार स्पर्धा परीक्षेकडे वळले. मात्र, कोरोनामुळे सर्वच बंद आहे. त्यामुळे भविष्यात स्पर्धा परीक्षा होतील की, नाही या चिंतेत सध्या ते पडले आहेत. दोन ते चार वर्षांपासून अभ्यास करूनही अद्यापही नोकरी न मिळाल्याने भविष्यात कसे जगायचे हा प्रश्न त्यांना सध्या सतावत आहे.

वीज वितरण कर्मचाऱ्यांना त्रास

चंद्रपूर : सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने वीज गुल होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यातच कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने बहुतांश नागरिक घरातच आहेत. परिणामी घरांमध्ये विजेचा वापर वाढला आहे. वीज गेल्यास महावितरणला फोनद्वारे माहिती देत दुरुस्तीची मागणी करीत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना तत्काळ येऊन दुरुस्ती करावी लागल आहे.

ग्रामीण भागात पाणी टंचाई

चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईचे सावट असून, प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेषत: डोंगरांवरील गावांमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे, तर काही गावांतील नळ योजना बंद असल्याने त्या गावातील नागरिकांनाही पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.

नदीपात्रात गर्दी वाढतेय

चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नदीपात्रामध्ये सायंकाळच्या सुमारास गर्दी वाढत असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. त्यामुळे याकडे ग्राम प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

जनावरांचेही सुरू आहेत हाल

जिवती : यावर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यांतून चारा आणता आला नसल्याने जनावरांचे चाऱ्याअभावी हाल होत आहेत. कसेबसे करून शेतकरी त्यांची सोय भागवत आहे. मात्र, आणखी अशीच काही दिवस परिस्थिती राहिल्यास मोठे संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महसूल कर्मचाऱ्यांना विमा सुरू करावा

चंद्रपूर : कोरोनामुळे सर्वत्र दहशत आहे. अत्यावश्यक सेवेतील नागरिक आपली जबाबदारी पार पाडत आहे. यातील काहींना शासनाने विमा लागू केला आहे. त्याच धर्तीवर महसूल तसेच इतर विभागांतील कर्मचाऱ्यांना विमा सुरू करावा, अशी मागणी केली जात आहे.

कृउबा समिती परिसरात गर्दी वाढली

चंद्रपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक गर्दी करीत आहेत. त्यामुळे या गर्दीवर आळा घालण्याची मागणी केली जात आहे. काही ग्राहक आपली वाहने रस्त्यावर लावत असल्याने येथे भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनांना अडचण होत आहे. यावर लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.