शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

पाणी व कंत्राटाच्या मुदतवाढीवरून वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:00 IST

इरई धरणात पाणी असतानाही शहरात अनियमित केलेला पाणी पुरवठा व नाले सफाईच्या कंत्राटदाराला सरसकट सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या मुद्यावरून मनपाच्या आमसभेत चांगलीच खडाजंगी झाली. बाचाबाची एवढी वाढली की एक वेळ ही आमसभा आहे की युध्दाचे रणांगण हेच कळेनासे झाले होते.

ठळक मुद्देमनपाची आमसभा वादळी : नागरकर व देशमुख यांच्यात धक्काबुक्की

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इरई धरणात पाणी असतानाही शहरात अनियमित केलेला पाणी पुरवठा व नाले सफाईच्या कंत्राटदाराला सरसकट सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या मुद्यावरून मनपाच्या आमसभेत चांगलीच खडाजंगी झाली. बाचाबाची एवढी वाढली की एक वेळ ही आमसभा आहे की युध्दाचे रणांगण हेच कळेनासे झाले होते. दरम्यान, काँग्रेसचे नंदू नागरकर आणि सभागृहनेते वसंत देशमुख यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली. यात आणखी काही नगरसेवक गुंतल्याने रणक्रंदन माजले. विविध मुद्यांवरून उठलेले वादंग शांत होत नसल्याने अखेर काँग्रेसच्या व इतर नगरसेवकांनी सभात्याग करून आपला निषेध नोंदविला.पावसाळा संपायला आला तरी उन्हाळ्यापासून कपात केलेला पाणी पुरवठा पूर्ववत नियमित केला नाही. जाणीवपूर्वक चंद्रपूरकरांना पाण्यासाठी वंचित ठेवले जात आहे. मनपाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नगरसेवकांनी मडके घेऊनच सभागृहात प्रवेश केला. त्यामुळे आमसभा सुरू होताच वादळ उठले. पावसाळा सुरू झाल्यानंतर तो संपेपर्यंत पाणी पुरवठा नियमित का केला नाही, असे विचारत नगरसेवक नंदू नागरकर, नगरसेविका सुनिता लोढिया व इतर नगरसेवकांनी सभागृहातच मडके फोडले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. सत्ताधारी पक्षातील व विरोधी पक्षातील नगरसेवकांमध्ये खडाजंगी सुरू झाली.नाले सफाईच्या कंत्राटाची मुदत संपली आहे. त्यानंतर परत निविदा काढण्याऐवजी मनपाच्या स्थायी समितीत सदर कंत्राटाला सरसकट सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. याबाबत नगरसेवक नंदू नागरकर यांनी महापौर व स्थायी समिती सभापती यांना जाब विचारला. स्थायी समितीची सभा दर आठवड्यात होते. त्यामुळे आठवड्याची किंवा एक महिन्याची मुदतवाढ द्यायला हवी होती. मात्र सरसकट सहा महिन्यांची मुदतवाढ कोणत्या निकषावर देण्यात आली, असे नागरकर यांनी म्हटले. त्यानंतर सभागृह नेता वसंत देशमुख आणि नंदू नागरकर यांच्यामध्ये खडाजंगी सुरू झाली. दोघेही एकमेकांवर धाऊन गेले. दरम्यान नगरसेवक संदीप आवारी, सुरेश पचारे, दीपक जयस्वाल व काही नगरसेवकांनी मधे येऊन दोघांनाही सावरले. तरीही यात चांगलीच धक्काबुक्की झाली. दरम्यान, यावेळी नगरसेवक नंदू नागरकर, सुनिता लोढिया, दीपक जयस्वाल, अशोक नागापुरे, प्रहारचे पप्पु देशमुख यांनी सभागृह नेता वसंत देशमुख हे मद्य प्राशन करून असल्याचा आरोप करीत त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली. हा गोंधळ जवळपास १५-२० मिनिटे सुरूच होता. त्यामुळे महापौर अंजली घोटेकर यांनी दहा मिनिटांसाठी सभा तहकूब केली व त्या सभागृहाबाहेर निघून गेल्या. काही वेळानंतर सभा पूर्ववत सुरू झाली. त्यानंतर इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जेल मार्गाचे शहीद बाबुराव शेडमाके मार्ग असे नामकरण करण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. यासोबतच डेंग्यूवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असे महापौर यांनी सांगितले.‘पाणी द्या महापौर’ आंदोलनआमसभा सुरू असतानाच महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मडके घेऊन ‘पाणी द्या महापौर’ आंदोलन करण्यात आले. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात मुबलक जलसाठा आहे. धरणाचे दोन दरवाजे काही दिवसांपूर्वी उघडावे लागले. तरीही चंद्रपूरकरांना दररोज पाणी दिले जात नाही. हा चंद्रपूरकरांवर अन्याय आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी बँड पथकही आणण्यात आले होते. यावेळी कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, सुनिता लोढिया, अमजद खान व काँग्रेस नगरससेवक उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकेच्या धोरणाचा निषेध करण्यात आला व निदर्शने देण्यात आली.गांधी जयंतीपासून पाणीसभा सुरू झाल्यानंतर काही वेळातच महापौर अंजली घोटेकर यांनी २ आॅक्टोबर गांधी जयंतीपासून चंद्रपुरात दररोज पाणी पुरवठा केला जाईल, अशी माहिती दिली. या संदर्भात पाणी पुरवठा करणाºया उज्ज्वल कंस्ट्रक्शन कंपनीला आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.