शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

जिल्ह्यात पावसाची संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 05:00 IST

उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. जुलै महिन्याच्या प्रारंभी थोडाफार पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आता पाऊस नियमितपणे येईल असा अंदाज बांधत कापूस, धान व सोयाबीन पिकांची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. पाऊस अचानक गायब होऊन उकाडा वाढायला लागला. त्यामुळे नागरिक पुन्हा वैतागू लागले. दुसरीकडे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पाऊस हवा असल्याने त्यांची झोपच उडाली.

ठळक मुद्देनदी-नाल्यांमध्ये पाणी साचले : आतापर्यंत ३७१.७ मिमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच मंगळवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यात बऱ्यापैकी पाणी जमा झाले असून नदी-नाले फुगू लागले आहेत. आतापर्यंत सरासरी ३७१.७ मिमी पावसाची जिल्ह्यात नोंद झाली आहे.हवामान खात्याने यंदा जून महिन्यातच मान्सूनचे आगमन होऊन दमदार पाऊस येथील, असा अंदाज वर्तविला होता. मात्र जिल्ह्यात जून महिन्यात तसा पाऊस आला नाही. उलट उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. जुलै महिन्याच्या प्रारंभी थोडाफार पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आता पाऊस नियमितपणे येईल असा अंदाज बांधत कापूस, धान व सोयाबीन पिकांची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. पाऊस अचानक गायब होऊन उकाडा वाढायला लागला. त्यामुळे नागरिक पुन्हा वैतागू लागले. दुसरीकडे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पाऊस हवा असल्याने त्यांची झोपच उडाली.अनेकांचे पऱ्हे जमिनीतच कोमेजू लागले. दुबार पेरणीचे संकट अनेक शेतकऱ्यांवर ओढवले. अशातच १० जुलैपासून पावसाने हजेरी लावणे सुरू केले. सोमवारी जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाला. त्यानंतर मंगळवारी रात्रीपासून चंद्रपूरसह जिल्हाभरातच संततधार पावसाला सुरूवात झाली.बुधवारी दुपारपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. संपूर्ण जिल्हाभरात सरासरी ३७१.७ मिमी पावसाची नोंद झाली.संततधार पावसामुळे आता जलसाठ्यात वाढ होत आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वर्धा, पैनगंगा, इरई, उमा, शिरणा या नद्यांच्या पात्रातही आता बऱ्यापैकी पाणी वाहू लागले आहे. हा पाऊस जमिनीत मुरल्याने शेतकऱ्यांच्या बांधातही पाणी जमा झाले आहे. यामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे.

टॅग्स :Rainपाऊस