लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : विद्युत वितरण कंपनीने रविवारपासून वीजबिल वाटपाला सुरुवात केली आहे. तीन महिन्यांचे एकत्रीत बिलाचा आकडा पाहून ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण सुरु असताना मोठ्या रक्कमेचे बिल हाती पडल्याने ग्राहकांना शॉक बसत आहे.कोविड-१९ चा प्रकोप रोखण्यासाठी शासनाने २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरु केले. त्यामुळे अनेक छोटे-मोठ्या कंपन्या व्यवसाय, उद्योगधंदे बंद पडले. त्यामुळे सर्वांनी आपल्याकडील जमापूंजी उदरनिर्वाहासाठी खर्च केली. मार्च महिन्यापासून सुरू झालेले लॉकडाऊन पुढे-पुढे वाढत गेले. या दरम्यान सामाजिक संघटनानी प्रशासनाकडे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्याचे घरगुती वीज बिल माफ करण्याची मागणी केली. या तीन महिन्याच्या काळात कंपनीने वीज बिलाचे वितरण केले नाही.मात्र २२ जुनच्या सकाळपासून घरोघरी बील वाटपाला सुरुवात झाली. ज्या ग्राहकांना ३०० ते ४०० रु. वीज बिल यायचे त्यांच्या माथी तीन महिन्याचे बिल चार ते पाच हजार रुपये बिल आले. त्यामुळे ऐवढी रक्कम कोठून भरायची असा प्रश्न पडत आहे.भद्रावतीत तहसीलदारांना निवेदनभद्रावती : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे बंद झाले. अनेकजण बेरोजगार झाले. त्यामुळे कुटुंबाचे उदरनिर्वाह करणे अडचणीचे जात आहे. यातच महावितरणाच्या वतीने तीन महिन्यांचे विद्युत बिल नागरिकांच्या घरी पाठविले आहे. आर्थिक संकटात असताना आलेले हे वीज बिल भरायचे कसे असा प्रश्न नागरिकांपुढे पडला असून विद्युत बिल माफ करावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान, अमित गुंडावार, आशिष पोट, श्रीपाद भाकरे, प्रदीप लोणकर, अमर महाकुलकर, अमन सिंग, योगेश खोब्रागडे, गोलू शेख, क्रिष्णा बोमनवार, विक्रम सिंग, प्रफुलल चामोटे आदी उपस्थित होते.
तीन महिन्यांच्या वीज बिलाचा ग्राहकांना शॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST
कोविड-१९ चा प्रकोप रोखण्यासाठी शासनाने २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरु केले. त्यामुळे अनेक छोटे-मोठ्या कंपन्या व्यवसाय, उद्योगधंदे बंद पडले. त्यामुळे सर्वांनी आपल्याकडील जमापूंजी उदरनिर्वाहासाठी खर्च केली. मार्च महिन्यापासून सुरू झालेले लॉकडाऊन पुढे-पुढे वाढत गेले. या दरम्यान सामाजिक संघटनानी प्रशासनाकडे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्याचे घरगुती वीज बिल माफ करण्याची मागणी केली. या तीन महिन्याच्या काळात कंपनीने वीज बिलाचे वितरण केले नाही.
तीन महिन्यांच्या वीज बिलाचा ग्राहकांना शॉक
ठळक मुद्देग्राहकांमध्ये रोष व्यक्त : वीज देयक माफीसह विविध मागण्यांची निवेदने