शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
4
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
5
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
6
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
7
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
8
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
9
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
10
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
11
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
12
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
13
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
14
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
16
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
17
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
18
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
19
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
20
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा

कांद्याच्या भाववाढीवरून सर्वत्र आक्रोश, मोबाईल रिचार्जबाबत मात्र ग्राहक गप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 06:00 IST

कांद्याच्या भावाने शंभरी पार केली, या भाववाढीने महिलांच्या डोळ्यात पाणी आले. कुटुंबाचे बजेट बिघडले आहे. सामान्यांच्या जेवणातून कांदा हद्दपार होत आहे. यासाठी या भावनाढीविरोधात विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी आवाज उठविला आहे. या भाववाढीने सामान्य जनता त्रस्त आहे. यासाठी आक्रोश करणे समजण्यासारखे आहे. यामुळे कांद्याच्या अवैध साठेबाजांना आळा बसेल व कांदा स्वस्त होऊ शकतो मात्र, याच दिवसात काही मोबाईल कंपन्यांनी मोबाईल रिचार्जमध्ये मोठी वाढ केली आहे.

ठळक मुद्देजनजागृतीची गरज : सुज्ञ नागरिक व्यक्त करताहेत आश्चर्य

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. स्वयंपाकघरातील कांदा हा आवश्यक घटक असल्याने त्याची भाववाढ सर्वसामान्य जनतेच्या चिंतेचा विषय आहे. त्याविरुद्ध आवाज उठणे समजण्यासारखे असले तरी काही कंपन्यांनी मोबाईल रिचार्जमध्ये मोठीे वाढ केली आहे. मोबाईलदेखील आवश्यक घटक आहे. एका कुटुंबात तीन ते चार मोबाईल आहेत. रिचार्जमध्ये एवढी मोठी वाढ होऊनही समाजामध्ये या विरोधात कुठेही आक्रोश नाही. मात्र काद्यांच्या भावाबाबतच एवढी चर्चा का, असा प्रश्न आता काही सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत.कांद्याच्या भावाने शंभरी पार केली, या भाववाढीने महिलांच्या डोळ्यात पाणी आले. कुटुंबाचे बजेट बिघडले आहे. सामान्यांच्या जेवणातून कांदा हद्दपार होत आहे. यासाठी या भावनाढीविरोधात विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी आवाज उठविला आहे. या भाववाढीने सामान्य जनता त्रस्त आहे. यासाठी आक्रोश करणे समजण्यासारखे आहे. यामुळे कांद्याच्या अवैध साठेबाजांना आळा बसेल व कांदा स्वस्त होऊ शकतो मात्र, याच दिवसात काही मोबाईल कंपन्यांनी मोबाईल रिचार्जमध्ये मोठी वाढ केली आहे. विद्यमान परिस्थितीत मोबाईल फोनदेखील आवश्यक घटक झाला आहे. प्रत्येक घरी कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे स्वतंत्र मोबाईल फोन आहे. रिचार्जमध्ये भाववाढ झाल्याने प्रत्येक कुटुंबाना मोठा आर्थिक भुर्दंड पडणार आहे. कांद्याचे वाढलेले भाव भविष्यात कमी देखील होऊ शकतात, अनेकदा शेतकऱ्यांना कांद्याच्या पडलेल्या भावामुळे कांदा रस्त्यावर फेकून द्यावा लागतो.यावेळी शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी कुणीच पुढे येत नाही. मोबाईल रिचार्जचे वाढलेले भाव भविष्यात कमी होण्याची शक्यता नाही. मग, तात्पुरत्या कांद्या भाववाढीविरोधात गल्लीपासून दिल्लीपर्यंत जनआक्रोश पाहायला मिळत असताना मोबाईल रिचार्ज भाववाढीविरोधात समाजामध्ये चकार शब्द देखील ऐकायला येत नाही. प्रत्येक जण शेतकºयांप्रती सहानुभूती दाखवितात. मात्र भाव वाढीनंतर एवढा आक्रोश कशासाठी, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :onionकांदा